पोस्ट्स

2021 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे शोषितांसाठी लढले  कामगारांसाठी हाल सोसले लाल बावट्यांनी त्यांना उचलून धरले विळा हातोड्याचे पताके फडकवले ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले जे जे वंचितांसाठी लढले दुर्लक्षितांसाठी अतोनात झुरले निळ्या पावट्यांनी त्यांना उचलून धरले अशोक चक्रांचे पताके फडकवले ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले जे जे वर्चस्वासाठी लढले फुटीरवाद्यांना घेऊन एकवटले क्रांती धुरीणांनी त्यांना उचलून धरले विजयी उत्सवाचे पताके फडकवले ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले जे जे स्वराज्यासाठी लढले गुलामांना धर्माखाली बांधले सत्तातुरांनी त्यांना डोक्यावर उचलून धरले सुखवस्तूंनी स्वातंत्र्याचे पताके फडकवले ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले जे जे समाजासाठी लढले ऐहिक कल्याणासाठी टिकले चाणाक्षांनी बेरकीपणे त्यांना उचलून धरले स्वतःच्या विचारांचे मुकुटमणी बनवले ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले जे सर्वांगीण विकासासाठी लढले संधीसाधूंनी त्यांना मिरवले ढोंगी क्रांतीचे बेमालूम प्रणेते बनवले सत्ताधीश बनून सरंजामीत रमले ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले जे जे उपेक्षितांसाठी लढले रोजीरोटीसाठी रक्त आटवले समाजसेवेच्या आड धर्मांतरीत गुलाम केले अल्

अस्मितावाद्यांनी ठोकून काढलं

अस्मितावाद्यांनी ठोकून काढलं एकदा मी मराठ्यांवर  विद्रोही कविता केली महाराष्ट्रातल्या अस्मितावाद्यांनी मला ठोकून काढलं मग मी गुजरात्यांवर  विद्रोही कविता केली गुजराती अस्मितावाद्यांनी मला ठोकून काढलं नंतर मी सरदारांवर विद्रोही कविता केली पंजाबी, हरियाणातील अस्मितावाद्यांनी मला ठोकून काढलं मग मी चिडून हिंदी भाषिकांवर विद्रोही कविता केली उत्तरेतल्या अस्मितावाद्यांनी मला ठोकून काढलं थोडसं सावरून तमिळींवर विद्रोही कविता केली तमिळनाडूतल्या अस्मितावाद्यांनी मला ठोकून काढलं त्वेषाने तेलुगू लोकांवर विद्रोही कविता केली आंध्रा, तेलंगणातल्या अस्मितावाद्यांनी मला ठोकून काढलं नंतर मी मल्याळींवर विद्रोही कविता केली केरळी अस्मितावाद्यांनी मला ठोकून काढलं त्यानंतर बंगाली, ओरिया लोकांवर विद्रोही कविता केली तिथल्या अस्मितावाद्यांनी मला ठोकून काढलं शेवटी मी ईशान्येकडील लोकांवर  विद्रोही कविता केली तिकडल्या अस्मितावाद्यांनी पण मला ठोकून काढलं सरतेशेवटी मी भारतीयांवर विद्रोही कविता केली एकदम सगळ्या सेक्युलरांनी  माझं कौतुकच केलं मात्र राष्ट्रवाद्यांनी शोधून मला ठोकून काढलं - भूषण वर्धेकर

जय भीम - एक सुन्न करणारं वास्तव

जय भीम - एक सुन्न करणारं वास्तव दिवाळीत अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेला जय भीम चित्रपट म्हणजे व्यवस्थेत बऱ्याचशा ठिकाणी होणाऱ्या अमानुष छळाचं प्रातिनिधीक  भयाण वास्तव आहे. चित्रपटासारखे प्रभावशाली माध्यम संवेदनशील घटना लोकांसमोर मांडण्याचा एक यशस्वी प्रयोग आणि पायंडा कैक वर्षापासून चालत आलेला. सध्याच्या समाजमाध्यमांच्या जगात असे चित्रपट आले की चर्चा होतात, वेगवेगळे लेखनप्रपंच केले जातात व्यवस्थेतील त्रुटींवर. मग नवा काहीतरी मुद्दा येतो आणि पुन्हा ज्या विषयांवर घटनेनुसार बदल व्हायला हवेत त्या गोष्टी बासनात गुंडाळल्या जातात. समस्या जैसे थे राहतात आणि बिनकामी चर्चा, आरोप, प्रत्यारोप, तर्क, वितर्क आणि राजकीय लबाड आश्वासने निरंतर चालूच राहतात. समस्येवर तोडगा काढण्यापेक्षा इतर गोष्टी व्यवस्थेत रेंगाळत राहतात. जय भीम मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तामिळनाडूतील तत्कालीन दुर्लक्षित आदिवासींच्या होणाऱ्या छळाची गोष्ट सांगितली आहे. चित्रपट बघितल्यावर मन सुन्न होते. निष्पाप लोकांचा झालेला हिंसक छळ कोणालाही सुन्न करतोच. मात्र तेच निष्पाप लोक जातपातधर्माच्या चौकटीत अडकवले की व्यवस्थेचे खरे स्वरूप उघ

सरदार उधम: एकमेव संकीर्ण स्वातंत्र्यपूर्व एकाकी लढा

ऑक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित झालेला सरदार उधम हा चित्रपट नक्कीच न चुकवण्यासारखा आहे. शुजित सरकारचे दिग्दर्शन आणि विकी कौशलचा अभिनय अफाट आहे. एकूण स्वातंत्र्य मिळण्याआधीची पार्श्वभूमी ज्या पद्धतीने उभी केलीय त्याला तोड नाही. हा नसिनेमा आजच्या काळात महत्त्वाचे विधान करतो. सध्याचा काळ हा श्रेयवादासाठी आसुसलेल्या पक्षांचा, त्यांच्या बगलबच्च्यांचा आहे. हा सिनेमा भारतीय स्वातंत्र्य लढ्याची जी गोष्ट सांगतो ती फार महत्त्वाची आहे. सरदार उधम यांचा एकाकी लढा, सूडाची भावना आणि त्यामागची कारणमीमांसा जबरदस्त कन्व्हीक्शनने मांडलेली आहे. १९४७ पर्यंतचा स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास निरखून बघायचा असेल तर एलन ह्यूम ने जे कारनामे केलेत त्यापासून सुरुवात करायला पाहिजे. १८५७ चा लढा आणि नंतरचे झालेले लढे. १९४२ च्या लढ्याला असलेले वेगवेगळे कंगोरे समजून घेणे गरजेचं आहे. त्यासाठी त्याकाळच्या कम्युनिस्ट नेत्यांची भुमिका अभ्यासणे फार महत्त्वाचे आहे. समांतर पणे बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष पण महत्त्वाचा आहे. नंतर टिळकांच्या आधीचे लढे टिळकांच्या नंतरचे लढे फार महत्त्वाचे आहेत. आणि हो सोब

कुणी गांजा घ्या, कुणी चरस घ्या

कुणी गांजा घ्या, कुणी चरस घ्या  या रे येड्यांनो, या रे या  झिंगलेला हा आनंद घ्या  हर्बल तंबाखूचा सुंगंध घ्या मनात फुलावी कडक चांदण्या, नबाब रे बरळतो महाराष्ट्राच्या भाग्य उद्याचे मुठीत नाचवितो  गंजेकसांना का हुंगुन रे दहशत हा भरतो  हर्बलफुलाचा  महाविकास घ्या  वसुलीआघाडीचा सुहास घ्या  चार दिशांचे चौखूर सुंदर आघाडीचे पाळणी  मंत्र्यांचे मुखकमल हे डुलत्या तुरुंगसदनी  बरळा बोंबला फुरोगाम्याला जो जो ग गाउनी  युगायुगाचा अंमल घ्या, नवक्रांतीचा हा आरंभ घ्या  © विडंबन- भूषण वर्धेकर

भारत माता की जय!!!

पुर्वीच्या काळी फक्त आणि फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोनच दिवशी राष्ट्राभिमान वगैरेंची जाणीव होत असे. मग सार्वभौम देशाचा सजग नागरिक म्हणून झेंडावंदन करून आल्यानंतर देशासाठी आगळं वेगळं कर्तव्य पार पाडल्यासारखे वाटायचं. मात्र आता अशी राष्ट्रभक्ती दाखवण्याची वेळ दैनंदिन व्यवहारात आली आहे. नोटबंदीनंतर बँकेच्या रांगेत तासनतास उभे राहून वीररसयुक्त देशभक्ती नँशनल ड्युटी केल्यासारखी वाटत होती. पण सरकारने दयाळू लोकांना असा फिल रोजच्या जगण्यात दिला. हल्ली तर दरवेळी पेट्रोल भरताना क्रांतिकारी कार्य केल्याचा अभिमान वाटतो. वाणसामानाची यादी घेऊन दुकानात गेलो तर गरजेपुरता किरणा घेण्यातच सगळा पैसा खर्च होतो. गोळ्या बिस्किटे चिक्की टाईमपास खाऊ साठी पैसेच शिल्लक राहत नाहीत. पुन्हा एकदा राष्ट्रीय कर्तव्य निभावल्याचा फिल येतो. मग मनाशीच विचार येतात की सरकारनेच ठरवलेलं दिसतंय लोकांनी फक्त गरजेप्रमाणे सकस व पौष्टिक खावं म्हणून महागाई केलीय. ससटरफटर खाल्याने वजन वाढतं मग आजार वाढतील म्हणून जंकफूड नकोच नको. अहाहा काय अद्वितीय सरकार आहे. गरीबातील गरीब जनतेसाठी किती तो कळवळा. याआधीचे सरकार कमी महागाई वाढवं

हिजाब घालणारी बिकिनीतील मुलगी...

एकदा एका जाहिराती साठी स्पर्धेचे आयोजन केले होते. जाहिरात एका घरगुती वापरणाऱ्या वस्तुची करायची होती त्यासाठी जो चांगल्या जाहिरातीची संकल्पना मांडेल त्याला बक्षिस देऊन तीची चित्रीकरणासाठी निवड होणार होती. ठरल्याप्रमाणे पुण्या मुंबईतील जाहिरात कंपन्यांनी झुंबड केली स्पर्धेत. कारण सर्वाधिक इंटेलिजंट कंटेट पुण्या मुंबईतूनच तयार होतो असा त्यांचा फुकाचा अतिआत्मविश्वास आहे. मग इतर भागातील जाहिरात कंपनीच्या प्रतिनिधींना तुच्छतेने वागवणे वगैरे बाष्कळ प्रकार तिथे झाले. शंंभरहून अधिक संकल्पनांची एन्ट्री झाली. सगळ्यांनी आपापल्या बुद्धीमत्तेचा पिट्टा पाडून एकेक संकल्पना मांडली होती. जेव्हा परिक्षकांकडे सगळ्या कल्पना गेल्या तेव्हा प्रत्येक संकल्पनेवर चर्चा, छाननी, वाद झाले. मग किमान समान विषय अधिकृतरीत्या ठरवले गेले. त्यापैकी एक होता भारतीय कुटुंबातील एकजूट दाखवून जाहिरातीत घरगुती वापराच्या वस्तूचे प्रमोशन करणे. दुसरा म्हणजे नेहमीचाच महिलांचे सबलीकरण आणि ती घरगुती वस्तू वापरून मिळणारे तिला तिचे हक्काचे स्वातंत्र्य. तिसरा विषय घरगुती वस्तू वापरल्याने देशातील सर्व गोरगरिबांना होणारा फायदा दाखवणे. असे

युद्ध नावडे सर्वांना

युद्ध नावडे सर्वांना... © भूषण वर्धेकर मे २०२१ आजकाल आंतरराष्ट्रीय युद्धाच्या घटनांचा भारतातील समाज माध्यमांवर सुळसुळाट जोरात चालू आहे. मग अशा वेळी मानवतावादी म्हणवून घेणाऱ्या विचारवंतांच्या फॉरवर्डेड लेख, स्फुटं, ऐतिहासिक नोंदी व्हायरल होत आहेत. तशाच गोष्टी कट्ट विचारसरणीतील मंडळीपण बिनधोक पणे पसरवतात. पीडीत कोण आवडता की नावडता हाच कळीचा मुद्दा आहे जणू! अशी युद्धे, जमीन बळकावून हस्तगत करणे हे परंपरागत चालत आलेल्या ऐतिहासिक घोडचूका आहेत. आंतरराष्ट्रीय घटनांमध्ये युद्धाचा आलेख बघितला तर पैसा, जमीन आणि सत्ता मिळवण्यासाठीच युद्धजन्य परिस्थिती तयार केली जाते. एखाद्याला गुलाम करणे ही जशी मानवी प्रवृत्ती आहे तसेच कमी शक्तीशाली देशाला किंवा समुहाला येनकेनप्रकारेण सोयी सवलती देऊन प्रसंगी धमकीवजा इशारे देवून काबूत ठेवले जाते. विस्तारवादी धोरणात हाच दुर्गुण आहे. वॉर मिनिस्टर किंवा डिफेन्स मिनिस्टर प्रत्येक देशात असतोच असतो. संरक्षण ही सामाजिक मुलभूत गरज आहे. मग ते संरक्षण देशाचे असो वा समुहाचे. मग अशावेळी जो आपला तारणहार असेल त्याचा उदोउदो ठरलेलाच. त्याच्या चुका, घोडचूका किंवा अनंत अपराध सगळे पो

भारतातील आंदोलने, चळवळी आणि संप हायजॅक झाली आहेत काय?

भारतातील आंदोलने, चळवळी आणि संप हायजॅक झाली आहेत काय? सरसकटपणे सगळीच आंदोलने ही हायजॅक करण्यासाठीच केली जातात किंवा काही आंदोलने केल्यानंतर हायजॅक होतात. भारतात तर आंदोलने, संप आणि चळवळी वगैरेंचा विचका झालेला आहे. कारण ज्याच्या त्याच्या राजकीय, सामाजिक गरजेनुसार आंदोलने, चळवळी आणि संप वापरले गेले. शोषितांच्या संघटना तर राखीव नेत्यांच्या राखीव प्रश्नांच्या मुखवट्या आडून पडीक नेतृत्व पुनर्वसन करण्यासाठीच वापरल्या गेल्या. एकेकाळी लोकांच्या रोजच्या जगण्यांच्या प्रश्नांना भिडून प्रशासनाला नडून आंदोलने यशस्वीपणे केली जात होती. यात कधीकाळचे अस्सल मातीशी निगडीत कम्युनिस्टांचा दबदबा होता. त्यांच्याकडे एकेकाळी खरीखुरी इहवादी विचारसरणी होती जी सर्व समस्यांवर साधकबाधक चर्चा विमर्श वगैरे करून बौद्धिक झाडून उपाययोजना करीत होती. लढत होती. मात्र भारतातील अस्ताव्यस्त पसरलेल्या भूखंडात कानाकोपऱ्यात रुजली पण फोफावली कधीही नाहीत. कापराप्रमाणे संप्लवन होतेय खरीखुरी कम्युनिस्ट विचारसरणी. भारतातील सर्वात मोठी चळवळ म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीसाठीची. जिच्यातून वेगवेगळ्या संघटना उदयास आल्या. पण  टिकली, टिकवली गे

शूर आम्ही दंगलखोर

शूर आम्ही दंगलखोर आम्हाला काय कुणाची भीती संघटना, जात अन् धर्मापायी हत्यार घेतलं हाती शूर आम्ही दंगलखोर आम्हाला काय कुणाची भीती बेरोजगारीच्या खाईत उमगली दगडफेकीची रीत गल्लीतल्या नेत्याची संगत अन्  जडली येडी प्रीत करोडोंची नासधूस करून येईल अशी शक्ती संघटीत संघटना, जात अन् धर्मापायी हत्यार घेतलं हाती तोडफोड वा जाळपोळ करावी हेच आम्हांला ठाव नियतीच्या लाथाबुक्क्या खाणे हेच आम्हांला ठाव जातीधर्मापायी सारी इसरू माया ममता नाती संघटना, जात अन् धर्मापायी हत्यार घेतलं हाती शूर आम्ही दंगलखोर आम्हाला काय कुणाची भीती ------------------------------------- विडंबनात्मक ©भूषण वर्धेकर ३ जानेवारी २०१८ रात्रौ ११:१५ हैद्राबाद -------------------------------------