पोस्ट्स

एप्रिल, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुरस्कार

पुरस्कार - विडंबन (मूळ कविता केशवसुतांची - तुतारी) एक पुरस्कार द्या मज आणुनि मिरवीन मी जो मुक्तकंठाने भडकूनी टाकिन सगळी माध्यमे प्रदीर्घ ज्याच्या त्या चित्काराने असा पुरस्कार द्या मजलागुनी शासनाच्या परीटघडीचे व्यवहार असे जे आजवरी होतील ते मला सत्वरी भाषणे देता त्या समयी कोण पुरस्कार तो मज देईल? इकोसिस्टिम त्यांची खंबीर प्रशासन आंदण तुम्हाला हळूच ढापती लीलया महामेळावा जनसागराला पुरस्काराचे समालोचन हवे तर? सत्कार! ते बक्षिसे घेऊनी सुंदर, सोज्ज्वळ मोठी शिल्पे अलिकडले टीकाकार ते ओरडती धरुनी आपटूनी बोटे चित्कार करुद्या सर्वांना निषेध जाऊ द्या वाऱ्यावरती फेकुनी किंवा दुर्लक्ष करा न कळता प्रतिमा उंचवा हळूच! ठरवा पुढचे पुरस्कार कंपूत चला डोकं बुडवूनी सांप्रत काळ हा मिरवण्याचा सोशल मेडिया आहे साथीला गर्जूनी त्यावर फॉरवर्ड करा बसल्या जागी व्हायरल करा दिखाऊ पणा करु चला तर! लाळ घुटमळूनी सैल संचार गावोगावी हिंडून मैलभर गत इतिहासाची मढी उकरुन रक्तरंजित वसा उगाळून पाहिजेत रे! पुरस्कारांची रीघ जातपातधर्माचे भांडणं लावून जनसेवेला आणिती अडथळे एकामागोमाग सैरभैर मुद्दे अनैतिकता पदसिद्ध भले पुरस्कारार्थी ह

गावगोष्टी #१

एका गावात मोठी पाण्याची टाकी होती. टाकीचा उपयोग पाणी साठवण्यासाठी आणि लोकांना दैनंदिन जीवनात गरजेप्रमाणे पाणी पुरवठा करण्यासाठी पाइपलाइन ची सर्वोत्कृष्ट व्यवस्था उभी करण्यात आली होती. गावाची सगळी उपजिविका शेतीवरच होती. छोटेमोठे गावातले उद्योग होतेच. पण ते तुटपुंजे होते. तसं सांगितलं गेलं होतं ही व्यवस्था गावातील गोरगरीब जनतेसाठी उभी करण्यात आली आहे. शेतीसाठी, रोजच्या दैनंदिन वापरासाठी पाण्याची व्यवस्था केली आहे. त्याची देखरेख आणि पाणीपुरवठा अंमलबजावणी साठी गावातील जनताच काही लोकांना निवडून देत होती. असे निवडून येणारे लोक मात्र पाणीपुरवठा व्यवस्थेचे मालक असल्यासारखे वागत होती. एकाच कुटुंबातील लोकांना पिढ्यानपिढ्या जनतेने निवडून दिल्यामुळे त्यांचा गोड गैरसमज झाला होता की ही व्यवस्था आमचीच. आम्हीच ही व्यवस्था राबवली, उभी केली. त्यांचा पुढचा काल्पनिक समाजमान्य गैरसमज असा होता की आम्हीच फक्त लोकांचे कल्याण केले आहे. आमच्यामुळेच गावातील गोरगरीब जनतेला पाणीपुरवठा झाला आहे. प्रत्यक्षात मात्र पाणी शेवटच्या घटकांपर्यंत कधीच पोचले नव्हते. ते कायमच दुर्लक्षित राहतील याची तजवीज चाणाक्ष निवडून येणाऱ

काव्यमय वडापाव

काळ्याकुट्ट मातीत मुळाशी गाडलेला टुम्म फुगीर रुंद बटाटा पसरलेला घाऊक बाजाराच्या रचलेल्या पोत्यातून भल्यामोठ्या पातेलात रटारटा शिजवून ठेचून चेंदामेंदा झालेली लक्तरे कांदा मिरची मसाल्याचे फवारे गोलमटोल गोळे पीठात बुचकळून ओतीव कढईतल्या तेलात उकळून लालचुटुक चुराचटणी कणीदार घोटलेल्या चिंचेचा अर्क पाणीदार मऊ लुसलुशीत पावात कोंबून चवीला मीठमिरची कांदा कापून अटक मटक खवय्यांची चटक तहानभूक भागवायचं मिथक दंत ओष्ठ्य जीव्हा खाण्यात दंग  उदरभरण नोहे अखंड अभंग ©भूषण वर्धेकर २२ मार्च २०२२

भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा विजय असो!

स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सगळेच लढले कोणी दक्षिणेकडे कोणी पश्चिमेकडे लढले उत्तरेतील, पुर्वेकडील कैक फासावर चढले अनेकांनी देशासाठी हौतात्म्य पत्करले काही जीवानिशी मेले काही होरपळले विस्कटलेल्या चळवळीत कैक बिथरले बंड पुकारून कैक त्वेषाने निकराने लढले राष्ट्रवादी लेखणीचे चित्कार सर्वदूर पोचवले गेले  परदेशांतून जहालांनी हादरून सोडले ब्रिटिशांना देशातलेच मवाळ बरे वाटू लागले हुशारीने राजे राजवाडे आधीच ताब्यात घेतले संस्थानिकांना हेरून करारबद्ध गुलाम केले बेरकीपणे काही आंदोलने प्रॉक्टर्ड केली लोकसहभागातून काही उस्फुर्त झाली दुसऱ्या महायुद्धात वाताहत अंगलट आली संभाव्य लष्करी उद्रेकामुळे पाचर बसली ज्वलंत राष्ट्रवाद्यांच्या जरबेने गांगारुन गेले मवाळांतील सत्तापिपासू हेरले गेले ब्रिटिशांनी धर्माधिष्ठित राष्ट्रास बळ दिले सर्वधर्मसमभावाचे कंबरडेच मोडले सगळ्यात आधी ब्रिटीशांनी वापरले नंतर कॉंग्रेसने सत्तेसाठी मिरवले सर्वदूर सत्य अहिंसा ठसवले गेले प्रत्यक्षात अहिंसा असत्य वठवले गेले कित्येक दशकं गांधी बिचारे वापरले गेले जाज्वल्य सावरकर अडगळीत फेकले गेले सुटाबुटातून संविधान अंमलात आणले गेले बाबासाहेब ज