लग्न आणि प्रेम
लग्न आणि प्रेम एकदा लग्न आणि प्रेम यांच्यात कडाक्याचं भांडण झालं लग्न म्हणाले मीच महान प्रेम म्हणाले मीच महान वाद काही संपेना कोणी कोणाला जुमानेना मग त्यांनी ठरवलं त्रयस्थाला विचारावं मान-अपमान समोर दिसले सगळं ऐकून घेउन मान-अपमान म्हणाले आम्ही दोघे सावत्र भाऊ मान ठेवणारा आणि अपमान करणारा उगाच आमच्यात शत्रुत्व निर्माण करतात प्रेमात अपमान बहुधा होत असतो लग्नात मान ठेवला जात नाही म्हणूम मी तुमच्यात काही बोलणार नाही पुढे दोघांना दुःख दिसले, धडधाकट-सुदृढ दोघांचे ऐकून ते म्हणाले, जगात माझी सारखी मागणी वाढत आहे. प्रेमात दुःख सहन करणारे सापडत नाहीत आणि लग्नात दुःख देणारे भरपूर म्हणून मी काही निर्णय देणार नाही पुढे दोघांना दिसले सुख, निपचित पडलेले कृश आणि अशक्त, कमकुवतपणे म्हणाले माझी जगात फार कमतरता आहे लोकांमध्ये राहण्याची माझी फार ईच्छा असते पण राहता येत नाही आणि प्रेमात मला दिलं जात नाही तर लग्नात नेहमीच ओरबडला जातो म्हणून मी काही निर्णय देत नाही पुढं दोघांना आदर आप्पा दिसले, स्वच्छ टापटीप सगळं ऐकून आप्पा म्हणाले मी असतो जीवनसत्वांसारखा, कमी पडलो तर आजारी करतो आणि