शनिवार, ११ एप्रिल, २०२६

मातृभू इस्रायल पितृभू भारत

 ज्यू लोकांचा आणि भारताचे नाते ऐतिहासिक आहे. विशेषतः १९४० च्यादशकात बरेचसे ज्यू लोक भारतात शरणार्थी म्हणून आले होते. महाराष्ट्रात कोकणात होते कोल्हापूरात होते. उत्कृष्ट मराठी बोलणारे इस्रायली लोक आहेत. आंध्रात आणि नॉर्थ ईस्ट स्टेटस मध्ये पण इस्रायली लोक आहेत खूप वर्षांपासून. भले ते वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात. कित्येक ज्यू लोकांना भारतीय सरकार मध्ये किंवा आर्मी मध्ये देशसेवा करायला संधी मिळाली. इस्रायल देश स्थापन झाल्यावर बरेचसे लोक भारतातून तिकडे गेले. त्यांच्या साठी भारतदेश पितृभू म्हणजेच फादरलॅंड तर इस्रायल मातृभू म्हणजे मातृभूमी मदरलॅंड.  हा संदर्भ खूप ऐतिहासिक आहे. कित्येक ज्यू इतिहासकार किंवा संशोधक, इस्रायली नेते नागरिक भारताच्या बाबतीत असणारी ही भावनिक नाती अभिमानाने जपतात. हा संदर्भ लक्षात घेऊन मोदींनी फादरलॅंड मदरलॅंड वगैरे भाषणबाजी केली होती हे लक्षात ठेवावे. 


त्यामुळे ज्यू लोकांना भारताने फादरलॅंड म्हटलं आणि इस्रायल हा मदरलॅंड म्हटलं तर काहीही फरक पडत नाही. फरक पडतो तो फ्रस्ट्रेटेड झालेल्या पुरोगामी लोकांना. त्यांना सगळा इतिहास भूगोल माहीत असतो. मध्य पूर्वेत कैक दशकांपासून होणाऱ्या युद्धात भारत कधीच मध्यस्थी करत नव्हता हे पण माहीत आहे. पण काहीही करून भारतात कुठेही काही झाले की मोदींच्या नावाने टाहो फोडून काही उपयोग होत नाही हे समजल्यावर जगात काही झाले की मोदींच्या नावाने आकांडतांडव करून नवीन टुलकीट सुरू झाले आहे.


बिचारे मोदी विरोधी, मोदीद्वेष्टे आणि मोदीबिंदू व मोदीव्याध झालेले रूग्ण हेच खरेखुरे मोदींना मोठे करणारे आहेत!


(ता. क. मोदीबिंदू म्हणजे कोणत्याही गोष्टीत मोदींचीच चू आहे असे दिसणारी मंडळी आणि मोदीव्याध म्हणजे चांगली गोष्ट मोदींमुळेच झाली हे मान्य आहे पण अपचन झाल्यामुळे बुडाला आग होणारी मंडळी)


©️भूषण वर्धेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मातृभू इस्रायल पितृभू भारत

  ज्यू लोकांचा आणि भारताचे नाते ऐतिहासिक आहे. विशेषतः १९४० च्यादशकात बरेचसे ज्यू लोक भारतात शरणार्थी म्हणून आले होते. महाराष्ट्रात कोकणात हो...