सोमवार, १८ मार्च, २०१९

परवा, आमचा पोपट वारला!

परवा, आमचा पोपट वारला!
- एक दृष्टिकोन

डॉ. चंद्रशेखर फणसळकर यांनी लिहिलेल्या 'परवा, आमचा पोपट वारला' या उपहासात्मक कथेचे अभिवाचन अतुल पेठे यांनी केले आहे. हा नाट्य-अभिवाचन प्रयोग म्हणजे प्रेक्षकाला अंतर्मुख करायला लावणारा आहे. भावनिकदृष्ट्या जोडला गेलेला सजीव (पोपट पक्षी) आणि त्याच्या मृत्यूआधी व नंतर आलेल्या अनुभवांची हलकी- फुलकी गोष्ट म्हणजे 'परवा, आमचा पोपट वारला'.
फणसळकरी नाट्यशैलीतील 'ब्लॅक कॉमेडी' प्रकारात लिहिलेल्या कथेचे अतुल पेठेंनी तितक्याच दमदारपणे मिश्कीलशैलीत अभिवाचन केले आहे. अभिवाचनाला एक सांगितिक मैफलीसारखी बैठक आहे. मुख्य आकर्षण म्हणजे अतुल पेठेंनी वाचनादरम्यान वाजवलेली शीळ ! ही एक नकळतपणे नाट्यवाचनाचा अविभाज्य भाग होऊन जाते. लेखकानं लिहिलेल्या 'बिटवीन दी लाईन्स' मधला नर्मविनोद प्रेक्षकाला विचार करायला भाग पाडतो. मध्यमवर्गीय मानसिकतेची अध्यात्मिक आंधळी ओढ आणि त्यातील रितेपणा यावरचा समर्पक विनोद लेखकाने गोष्ट स्वरुपात मांडलाय. मात्र तोच विनोद बेरकीपणे हेरून अतुल पेठेंनी निरनिराळ्या पात्रांची चपखल व्यक्तीमत्वे वाचिक अभिनयाद्वारे जिवंत केली आहेत. वैचारिक पातळीवरचे समज, भाबडेपणा आणि विसंगती मधून निरनिराळ्या पात्रांची उकल होते. गोष्ट सांगणाऱ्या मध्यमवर्गीय निवेदकाचा पाळलेला पोपट मरतो मग पोपट जीवंत असताना, आजारी असताना आणि मेल्यानंतर आलेले नानाविध व्यक्तींचे अनुभव निवेदक सांगत जातो अन् एक एक प्रसंग हसवताना प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो. फणसळकरांनी ज्या ताकदीने हलका फुलका विषय जगण्याच्या वेगवेगळ्या पातळीवर घडणाऱ्या घटनांना हेरुन लिहिला आहे तितक्याच ताकदीने पेठेंनी नाट्यवाचनातून जिवंत केलाय. हे करताना अभिवाचन कुठेही रटाळ होणार नाही याची खबरदारी पेठेंनी जातीने घेतलीय. मुळात अतुल पेठेंचा पिंड हा नाटकाचा. त्यामुळे हे अभिवाचन करताना पेठेंनी विविध पात्रे खुमासदार पद्धतीने उभी केली आहेत. विशेषकरून निवेदकाला पडणारे प्रश्न आणि त्या प्रश्नांची इतरांकडून मिळणारी उत्तरे असे प्रसंग पेठेंनी मोठ्या खुबीने सादर केले आहेत. सोबत शीळ आणि गाणी याची सादरीकरणाला असलेल्या संगतीमुळे अभिवाचनाला नाद, लय प्राप्त होते. असे सादरीकरण करताना लेखकाला नेमकेपणे जे सांगायचे आहे ते सडेतोड पण तितक्याच मिश्कीलपणे पेठेंनी प्रेक्षकांसमोर मांडले आहे. वर वर पाहता ही एक हलकी फुलकी कथा वाटत असली तरी लेखकाने व्यवस्थेला जे प्रश्न विचारले आहेत ते प्रश्न प्रेक्षकाला अंतर्मुख करतात. आयुष्यात घडणारी कोणतीही घटना असो त्या घटनेशी निगडीत असलेले सामाजिक, राजकिय, वैज्ञानिक, अध्यात्मिक आणि व्यवहारी प्रश्न एकमेकांशी सुसंगत असले तरी मध्यमवर्गीय मानसिकता त्यातील विसंगतीत अडकते. सारासार विचार, विवेक न करता रुढ अर्थाने अस्मितेच्या दृष्टीने, भावनिकदृष्ट्या वा ढोंगी परंपरेच्या परिप्रेक्ष्यातून हल्लीचा मध्यमवर्ग गुरफटला गेलाय. कथा लिहिताना लेखकाने शब्दबंबाळ विनोद, वर्णने होणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतली आहे. काही प्रसंगनिष्ठ विनोद  हे केवळ हसण्यासाठी न राहता बुरसटलेल्या व्यवस्था या जुनाट कपोलकल्पित आस्थांना जखडून कशा राहतात आणि त्यांचे अंधानुकरण करणारी सुमार मानसिकता कशी असते याचे प्रत्यय देतात. एकूण भावनिक पातळीवर सर्वसामान्य माणूस परिस्थितीला बळी पडतो आणि मग या परिस्थितीचा वापर करून पैसे कमावणारे बाजारबुणगे जेष्ठ-श्रेष्ठ नकळत सर्वसामान्य माणसाच्या जगण्यात येतात आणि नाहकपणे खर्चिक होऊन जातात. सहवासाने जवळीक झालेला सजीव पक्षी आपल्या डोळ्यासमोर मरतोय ही भावना निश्चितपणे व्याकूळ करणारी आहे. मग या भावनेच्या भरात सद्सद्विवेकबुद्धी गहाण टाकून शरण जाणारी मध्यमवर्गीय मानसिकता आणि त्यातून उकलत जाणारी वैचारिक विसंगती हा मूळ गाभा या कथेचा आहे. यात विशेषतः मनाला भिडणारे वेगवेगळ्या व्यक्तींचे अजब तर्कट आपलं रोजचं आयुष्य किती आणि कैक वेडगळ वा भाबड्या समजुतीने व्यापलेलं आहे याची झटकन जाणीव करून देतात.  कोणत्याही विचारसरणीच्या जुनाट टाकाऊ आस्था, अस्मिता उगाच नको त्या ठिकाणी डोके वर काढू लागल्या की कसं हसं होतं याचं समर्पक विश्लेषण कथेत फणसळकरांनी व्यक्त केले आहे. हे तितक्याच खुबीने पेठेंनी प्रेक्षकांसमोर ठसवले आहे. सध्याच्या काळात मध्यमवर्ग आदळणाऱ्या चलचित्र माध्यमांनी वेढलेला आहे. मग त्यात गुरफटून स्वतःचे आस्तित्व शोधणारा सुख-दुःख-नैराश्याच्या बंदिस्त चौकटीत अडकलेला भावनाविवश निवेदक आणि त्याचा वारलेला पोपट प्रेक्षकांना नक्कीच भानावर आणतो. कळत-नकळतपणे आपण सगळेच विचार- विवेकाचा कसलाही मागमूस न घेता नॉस्टॅल्जिक बंधनात गुंतत जातो. हे सर्व उभं करताना पेठेंनी अभिवाचन हे माध्यम निवडले. तसं पाहता या कथेचं नाट्यरुपांतर करता येऊ शकतं पण अभिवाचनातून जो परिणाम साधला जातोय तो परिणाम कदाचित नाटकात  विस्कटून जाईल. अभिवाचन करताना केवळ पोपटाची शीळ संगीत म्हणून तर निरनिराळ्या पात्रांचे आवाज हा वाचिक अभिनय एवढेच काय ती साधनं पेठे वापरतात. त्यामुळे प्रेक्षकाचे संपूर्ण लक्ष केंद्रीत होते ते गोष्टीचा विषय, त्यातला आशय व वेगवेगळ्या स्तरांवरील कमकुवत श्रद्धा आणि यातून निर्माण होणारा निखळ विनोद या बाबींवर. रुपककथेचा जसा एक छुपा ध्वन्यर्थ असतो तसाच या कथेच्या सादरीकरणाचा एक विचार प्रवर्तक लौकिकार्थ आहे. साधं एक पोपट आख्यान रोजच्या जगण्यातले नानाविध पातळीवरचे किर्द अनुभव लोकांच्या समोर मांडतं तर अशा असंख्य गोष्टींनी माणसाचं आयुष्य कमी अधिक प्रमाणात व्यापलेलं असतं. विवेकी माणसाला हा विचार नक्कीच शिवून जातो की माणसाचं भूत, वर्तमान आणि भविष्य हे कितीतरी ढोंगी, बाजारू रुढींनी व्यापलेलं आहे कारण शास्त्रशुद्ध आणि तर्कशुद्ध विज्ञानविषयक विचार आपण पचवू शकत नाही पटत असला तरी चिकटलेल्या जाणीवा त्या विचारांकडे कानाडोळा करायला भाग पाडतात. सर्वार्थाने 'परवा, आमचा पोपट वारला' ही एक गुंतवून ठेवणारी मिश्कील मैफल किमान एकदा तरी अनुभवावीच अशी आहे.

© भूषण वर्धेकर, हैद्राबाद
१४ अॉगष्ट २०१८
रात्रौ ११:३०

एकदा एक लेखकराव

एकदा एक लेखकराव जगणं समजून घ्यायला निघाला
मग झाला सज्ज हाती धरून लेखणी
खरडली गेली तगमग पानोपानी
वाचून पाहतो तर काय..
लिहीली गेली न संपणारी कथा…
नायक नायिका आणि त्यांचं आयुष्य..
विचारधारा तेवढी राहिली…
परंतु एकच अडचण वैचारिक भूमिका कोणती…
सामाजिक.. राजकिय.. आर्थिक..
मानसिक.. वैज्ञानिक.. अध्यात्मिक..
धार्मिक.. ऐतिहासिक.. सर्वकालिक..
मग लौकिकार्थाने सभोवतालं धुंडाळीत राहिला
सगळ्या विचारसरणीत गुरफटून गेला
मग सुरू झाले साक्षेपी आकलन..समीक्षण
मग केले अवलोकन.. सिंहावलोकन..
अखेरीस जन्मापासून ते आजवरचं सगळंच पडताळून पाहू लागला…
प्रत्येकवेळी समृद्ध होऊ लागला..
मग हर्षोऊल्हासित काल्पनिक लिहू लागला..
परत एके ठिकाणी अडखळला..
कृत्रिमपणे लिहितोय अस वाटून हिरमुसला…
नवीन शक्कल लढवून प्रत्यक्षातले प्रसंग वेगळ्या दृष्टिकोनातून हेरू लागला..
असं झालं तर .. तसं झालं तर.. जर.. तर.. ने सगळाच खेळखंडोबा झाला…
तोवर बराच काळ निघून गेला बऱ्याच घटना घडून गेल्या
क्षणभर वैतागला.. मग ठरवलं खुप वाचू..
अन् मग काय जे मिळेल ते वाचू लागला
हे चूक ते बरोबर असं स्वतःच ठरवू लागला..
स्वतःच्या मतांचा अविर्भाव घुमू लागला
बिनधोकपणे स्वतःचेच निर्णय देऊ लागला..
एकाएकी त्याला आपण विचारवंत झालोत असं वाटू लागले..
मग खडकन जाग यावी तसं भाराभार लिहू लागला…
स्वतःचीच रोखठोक भूमिका मांडू लागला…
शाश्वत जगात इवलाश्या अनुभवाचे गाठोडे उघडू लागला
जागतिक अस्मितांवर भाष्य करू लागला..
उथळ माथ्याने समाजात वावरू लागला पण….
आजूबाजूचे कोणीच लक्ष देईनासे झाले
कारण हा कोणत्याच विचारधारेचा पुरस्कर्ता नव्हता
मग एक एक विचारसारणी सूक्ष्मपणे पाहू लागला
सगळ्यांचेच राग रंग आजमावू लागला
प्रत्येकाचा तोकडेपणा नजरेत खटकू लागला..
एकेकाचे दंभ पाहून तिटकारा येऊ लागला
सांगोवांगी अभिव्यक्तीचे ढोंग पाहू लागला
मग एकेकाची पोकळ निष्ठा विष्ठेसमान वाटू लागली
सरतेशेवटी नाद सोडून माणूस म्हणून तार्किकपणे व्यक्त होऊ लागला
अशा तऱ्हेने लेखकराव होण्याच्या पलिकडे दृष्टिआड झाला…

------------------------------
भूषण वर्धेकर
४ ऑगस्ट २०१६
हडपसर, पुणे
-------------------------------

The evening

The evening is rising
For rest of days burnt
In the crowdy loneliness
Involved in spare time

Good deeds blessed
While missed hurts
Nothing is permanent
Change is esteemed

Though the mind hails
For the unavoidable rejections
Acceptance must justifiable
Reluctant in deep insecurity

Rest all is well, in life
Says teared eyes
Gone with the destiny
Suffered with the hopes

Lost in scarcity of dreams
Taken by unfulfilled desires
In the realm of uncertainty
Mind is full of forbidden fruits

________________________
© Bhushan Vardhekar
09:30 PM
17 March 2019
Hyderabad
________________________

सोमवार, ४ मार्च, २०१९

सत्ता, पैसा और डर

एक मर्तबा सत्ता , पैसा और डर
आपस मे रहे थे लड़
यू हुआ की ऐसे,
सत्ता को लगा मै बलवान
मै अज़ीम, पैसा और डर मेरे गुलाम।

पैसा बौखलाहटकर बोला,
मै कैसा  गुलाम?
दुनिया मुझसे चलती है,
जो मै चाहू करवा सकता हूँ,
तो काहे का मै गुलाम, मै सिकंदर।

पैसा हँस पडा, कहने लगा
मै हूँ दुनिया मे इसलिए
सत्ता तू तो रौब जमाता है,
मेरा गुलाम तो डर है,
जो मै चाहू उससे करवाता हूँ।

सत्ता झिझककर बोला,
मै न होता तू कैसे बढ पाता,
तेरी आन-बान-शान मुझसे है,
मेरा जब तक है तख्त़,
तब तक तू है सख्त़।

डर बोला, बस करो
अगर मै न फैलता,
तुम होते कमज़ोर
तुम लोगों का पुख्ता साम्राज्य
मेरी वज़ह से है दमदार।

सत्ता और पैसा हँस पडे,
हम है तो तेरा आस्तित्व है,
हमसे ही तेरी गरिमा है
डर तू तो हम दोनों का गुलाम है
हमारे पाले में ही तेरी किंमत है।

डर हँसकर बोल पडा,
मेरे तो कई रुप है,
मै ही एकमात्र ज़रिया हूँ,
पैसों से सत्ता पाने का
मेरे सिवा तुम्हे कौन पुँछता?

दुनिया मे हूँ मै सर्वशक्तिमान,
मेरी वज़ह से सत्ता होती है क़ाबिज़
पैसा कमाने की मुझसे ही है आगाज़,
मै हूँ तो, सत्ता तेरा टिका है तख्त़,
मै न होता, पैसो का बढ़ना है मुश्क़िल

पैसा खो जाने का होता है ड़र
सत्ता न मिलने का होता है ड़र,
इस दुनिया मेरे बिना
न पैसो से सत्ता हासिल होगी
न सत्ता से पैसा बढा पाओगे।

इस विश्व की चराचर मे बसा हूँ मै,
मौत, इज्ज़त और धर्म के
आधारपर डटकर खडा हूँ मै,
जिल्ल़त की जिंदगी मे भरा हूँ मै,
बुलंद हौसलोंको कोंचता हूँ मै।

महज़ मेरे सिवा क़ाबू मे
न रख पाओगे दुनिया को
डर है विश्व का अंतिम सत्य
सत्ता और पैसा है ज़रिया
अब्तर अवाम पर राज करने का।

----------------------------------
भूषण वर्धेकर
२३ फरवरी २०१९
हैद्राबाद.
----------------------------------

गुरुवार, १६ ऑगस्ट, २०१८

वैचारिक - २

आरक्षणे देऊनही एखादा समाज शैक्षणिकदृष्ट्या सक्षम होईल याची सध्याच्या काळात खात्रीपूर्वक सांगता येत नाही. कारण भारतीय शैक्षणिक व्यवस्था म्हणजे मराठीत इंडियन एज्युकेशन सिस्टीम बुरसटलेली आहे. म्हणजे ही व्यवस्था बदलायला मूळातच
सुधारणा करून आणायला पाहिजे.
महाराष्ट्रात शिक्षण सम्राटांनी जो धुमाकूळ घातलाय गेल्या वीस एक वर्षात ते अख्खा महाराष्ट्रानं पाहिलेय. कायमस्वरूपी विनाअनुदानित महाविद्यालय, इंजिनिअरिंग, एमबीए कॉलेजेस, सीबीएसई स्कूल वगैरेची दुकानदारी तेजीत चालू होती. शिक्षकांचा पगार सहीने वेगळा तर हातात त्यापेक्षाही कमी मिळणार, अशी एक पिढी पोटापाण्यासाठी जोडधंदा म्हणून शेती, जमीनीचे व्यवहार, पॉलिसी एजंट अशा गोष्टी करण्यात गर्क होती. बेरोजगारीसाठी भाजपाला जबाबदार धरण्यापेक्षा रोजगारक्षम स्किल्ड युवक का तयार झाले नाहीत याचा विचार करायची गरज आहे. बेरोजगारी वाढण्यामागे शैक्षणिक व्यवस्थाच कारणीभूत असते. उगाच मोदीविरोधात आवई ठोकून मोकळं होण्यात काही अर्थ नाही.  भाजपा नक्कीच व्यवस्था परिवर्तन करेल मात्र आमचं हित सांभाळून करा नाहीतर मनुवादी सरकार म्हणून आम्ही शिक्का मारू अशी विरोधकांची मानसिकता झाली आहे. तुम्हाला पायजे तो बदल करा पण आमची दुकानदारी चालूच राहिली पाहीजे अशा मानसिकतेमुळे देशाचे नुकसान होतेय हे कळत नाही लोकांना. जे विचारवंत आहेत त्यांना हे चांगलं समजंत पण भाजपा हा त्यांचा नावडता पक्ष मग त्यांनी चांगलं केलं तरी त्यात खोड ते काढणारच. विरोधकांची त्यांच्याच कर्मामुळे नाचक्की झाली आहे.
राजकारणाचा भाग सोडला तर शिक्षण व्यवस्था मजबूत असेल तरच देश अग्रेसर होतो. वर्षाकाठी अमुक एवढे डॉक्टर, इंजिनिअर भारतात तयार होतात पण त्यांचे गुणात्मक मुल्यांकन केले जाते का?
आजकाल डिग्री घेऊनसुद्धा लाखभर रुपये भरून प्रोफेशनल जॉब ओरिएंटेड कोर्सेस करावे लागतात. बेरोजगारी वाढतेय याला कारण सरकार नसून सध्याची शिक्षण व्यवस्था आहे. स्किल्ड प्रोफेशनल आणि एम्प्लॉएबल म्हणजे रोजगारक्षम युवक सध्याची शिक्षण व्यवस्था तयार करत नाही. विद्यापीठे आणि शाळा कॉलेजमध्ये केवळ पाट्या टाकून पोरांना पास करून स्वतःचे आस्तित्व अनुदानासाठी टिकवणे हेच काम चालू आहे. कायमस्वरूपी विनाअनुदानित कॉलेज, शाळा तर हमखास शिक्षकांची पिळवणूक करतात. संस्थाचालक दुकानदारी चालवण्यासाठी शाळा कॉलेजेस आहेत असे वाटते. समस्या खूप आहेत मात्र जेवढ्या समस्या, अडथळे पार करू तेवढेच क्वॉलिटीचे परिवर्तन होइल. उगाच आपली जो तो उठतो आणि आरक्षण मागतो नाही दिले तर एकूण व्यवस्था, सरकार यांना जेरीस आणूश स्वतःची आस्तित्वात नसलेली सो कॉल्ड संघटना प्रस्थापित करू पाहतो याला काही अर्थ नाही. जे सत्तेत नाहीत असे अल्पसंतुष्ट आत्मे अशा संघटनांच्या बेअक्कल युवकांना फूस लावतात. अर्थात असे सत्तापिसासू बांडगूळे महाराष्ट्रात गल्लोगल्ली आढळतात. एखादा समाज वैचारिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्टीने मागास राहतो याचे एकमेव कारण म्हणजे उपलब्ध असलेल्या सोयीसुविधांचा प्रभावी वापर थेट जनतेपर्यंत न जाता मधल्या साखळीतील लोकांच्या घशात जातो. विशेषतः हीच साखळी सरकार किंवा विरोधकांना येनकेनप्रकारेण अर्थपुरवठा करत असतात स्वतःची दुकानदारी राजरोस चालू ठेवण्यासाठी. गेली कित्येक वर्षे हेच चालू आहे. शिकला सवरलेला तरूण जेव्हा बेरोजगार राहतो मग त्याची व्यवस्थेवरील चीड, राग अराजक माजवण्यासाठी कसा करायचा याचे तथाकथित तंत्र आपल्या येथील राजकारण्यांना चांगलेच अवगत आहे. माझी मक्तेदारीला कुणालाही धक्का लावून देणार नाही. सरकारात कसो वा नसो आमचे पत्ते हुकुमाचे हेच दाखवायचे असते यांना. यासाठी वाट्टेल ते करू पण जनसामान्यांना वेठीस धरु हीच भूमिका असते. सद्सद्विवेकबुद्धी, बुद्धिप्रामाण्यवाद, सारासार विवेक वगैरे गहाण ठेऊन जातपातधर्माचे राजकारण करणाऱ्यांची नवी पिढी तयार करण्यात येते आहे. भीषण आणि करूण आहे हे सगळं. (क्रमशः)

© भूषण वर्धेकर

शनिवार, ३० जून, २०१८

वैचारिक -१

कॉंग्रेस, भाजपा सारखे राष्ट्रीय पक्ष हे केवळ लोकशाहीचे मुखवटे आहेत. खरा देश चांडाळ चौकटी चालवत आहे. या चांडाळ चौकटीत देशातील व परदेशातील गुंतवणुकदार, कार्पोरेट  व इंडस्ट्रियल लॉबी, मेडिया हाउसेस मँनेज करणारे आणि तथाकथित धर्माचे ठेकेदार असे सगळे येतात. त्यामुळेच मतदानाच्या वेळी सर्वाधिक ध्रुवीकरणासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जातपातधर्म. त्याचा वापर पुरेपूर करुन घेण्यासाठी राजकारणी नेहमीच तयार असतात. शिकले सवरलेले पण याला बळी पडतात. घडलेल्या घटनांचा केवळ जातपातधर्म यावर आधारित उल्लेख करणारे स्वतःला धर्मनिरपेक्ष वगैरे म्हणवून घेतात. आजचा काळ खऱ्या अर्थाने सदैव सतर्कतेचा आहे कारण व्यक्त झालेले संवाद आणि लेखणीतून झिरपलेले शब्द कुठेना कुठे नोंद केला जातोय हे ध्यानात ठेवले पाहिजे. समाजमाध्यांचा अविरतपणे केला जाणारा भडीमार याला कारणीभूत आहे. विशेषतः अमुक एका गटाला लक्ष्य करून वृत्तांकन केले जाणे हे सुसंस्कृत समाजाचे लक्षण नाही. मग ते वृत्तांकन विरोधाचे असो वा समर्थनार्थ. एखाद्याविषयीची भूमिका सांगणं आणि कसलीही शहानिशा न करता सरळसरळ त्याला गुन्हेगार वा देवदूत ठरवणं हे सध्याच्या काळातील अत्यंत कलंकित गोष्ट आहे. यात येनकेनप्रकारेण आपण सर्वजण सहभागी होतोय कळतनकळतपणे. देशात प्रत्येक घडणाऱ्या घटनेला जातपातधर्माच्या चष्म्यातून पहाणे आणि त्यावर आपापल्यापरीने सोयीनुसार भूमिका वा मत व्यक्त करणे हे धोक्याचे आहे. हे करून केवळ आपण कसे संवेदनशील वगैरे आहोत हे दाखवणे म्हणजे वैचारिक नतद्रष्टेपणाचे लक्षण आहे. भारत हा सार्वभौम देश आहे त्याचा भौगोलिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पसारा हा विविधांगी आहे. त्यामुळे भारतात होऊ घातलेली स्थित्यंतरे, केले वा लादले जाणारे सामाजिक बदल हे एका दिवसात होणे शक्य नाही. स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात अनेक बदल या देशाने अनुभवलेत. काही बदल सरकारातील चांगल्या योजनांमुळे झालेत तर काही सत्तापिसासू वृत्तीने लादल्यामुळे. काही बदल तर परकीय शक्तींच्या दबावापोटी देशावर लादले गेले आहेत. आपल्या देशात अजूनही कित्येक प्रश्न, समस्या आहेत ज्यांना केवळ जबाबदार नसून आपण भारतीय नागरिक म्हणून देखील जबाबदार आहोत. जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे असे मिरवून काही उपयोग नाही. अमुक एक पक्ष लोकशाही संपवायला आलेत वा लोकशाहीचा गाभा म्हणजे संविधान बदलले जाईल असे भितीदायक वातवरण करून आडकाठी करण्यात काही अर्थ नाही. बाबासाहेबांनी देशाला दिलेली लोकशाही इतकी कमकुवत नाही की कोणीही यावे आणि बदल करावे. त्यासाठी संविधानिक निती, नियम आणि पद्धती आखीवरेखीव आहेत. त्यानुसारच देश चालतो. लोकशाही संकटात म्हणून जनतेची दिशाभूल करणे २०१८ मध्ये तरी थांबवावे. सरकारने आणि विरोधकांनी मिळून देशाची लोकशाही अबाधित ठेवली पाहिजे. लोकशाही सुदृढ ठेवायची असेल तर प्रत्यक्षपणे नागरिक म्हणून प्रत्येकाचेच योगदान गरजेचे आहे. त्यासाठी आपण जे निवडणूकीत मतदान करतो ते प्रामाणिकपणे आणि कसल्याही जातपआतधर्माच्या निकषांवर आधारित नसावे. कित्येक पक्ष निवडून येण्याची क्षमता असलेले म्हणजे पैसा ओतणारे उमेदवारांना तिकीटे देतात आणि ते निवडून येतात ही चूक मतदान करणाऱ्यांची. इथे लोकशाहीचा आणि पर्यायाने त्याच्या साधनांचा, आयुधांचा गैरवापर होतो.
आपल्या व्यवस्थेचा गिचका झालेल्या परिस्थितीला केवळ सरकार वा विरोधक हेच जबाबदार नसून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपणही आहोत. नकारात्मक वातावरण निर्मिती करून निवडणुका आपल्या पथ्यावर पाडून कशा घ्यायच्या हे राजकीय पक्षांना चांगलेच ठाऊक आहे. महत्वाच्या प्रश्नांना वा समस्यांना फाटा देऊन नको त्या गोष्टींची चिकित्सा करण्यात माध्यमांची जूनी खोड आहे. जे खपले जाते ते आम्ही विकतो ही निव्वळ सौदेबाजी सध्या राजरोसपणे चालूय. (क्रमशः)

© भूषण वर्धेकर

मंगळवार, २४ एप्रिल, २०१८

असिफा, निर्भया आणि कोपर्डीची सुकन्या

असिफा, निर्भया आणि कोपर्डीची सुकन्या
होय तुम्ही तिघी फार भाग्यवान आहात
तुमच्यावर झालेल्या पाशवी अत्याचाराला वाचा फुटली
सगळी माध्यमं तुमच्या अत्याचाराच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेत,
भारतातील प्रत्येक सर्वसामान्य नागरिक या घटनेचा निषेध करतोय पण,
स्वार्थी, भांड मेडिया तुमच्या घटनांचा तपशील टिरापीसाठी रवंथ करतोय
हुकलेले बिनडोक राजकारणी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून संधी साधून घेताहेत
संधीसाधू विचारवंत, कलावंत आपापली सोशल सेन्सेस जागरूक ठेवण्यासाठी सिलेक्टिव्ह निषेधाची नौटंकी करत आहेत
सद्सद्विवेक बुद्धी बाजूला ठेवून बरबटलेले ज्ञानी महात्मे जातपातधर्माच्या कुंठीत अस्मिता धारदार करतायत
एक माणूस म्हणून सध्याचा समाज गाभडत चाललाय
सत्तापिसासू परमपूज्य थुकरट माननीय सत्ताधारी आणि विरोधक दोघेही एकमेकांच्या उखळ-पाखळ काढण्यात व्यस्त आहेत
ज्याला त्याला आपापली दुकानदारी चालवून प्रतिमा स्वच्छ करायचीय
घृणास्पद आणि निर्घृण हे शब्द पण रुसलेत
स्वयंघोषित संस्कृतीरक्षक अजूनही आदेशाची वाट पाहत बसलेत निषेधासाठी
षष्प झाल्या संवेदना अन् विकृतीचे उदात्तीकरण
इथे सगळ्यांनाच न्यायालयाने आपापल्या सोयीनुसार निकाल द्यावा असे वाटते
कहर करतात मनासारखा निकाल नाही लागला तर
सोयीनुसार संविधान बचाव अन् निषेध यांच्या मोर्च्याचे पेड इव्हेंट होतात
तरीदेखील
असिफा, निर्भया आणि कोपर्डीची सुकन्या
होय तुम्ही तिघी फार भाग्यवान आहात
मी मात्र नाही....
मी कोण ?
मी एक अशीच पिडीत दूर्दैवी, हवालदिल स्त्री, अल्पवयीन मुलगी अन् म्हातारी
मी एक कधी शोषित तर कधी सो कॉल्ड उच्चभ्रू परंतू कायमस्वरुपी दुर्लक्षितच माध्यमांपासून, विचारवंतापासून, असंतुष्ट राजकिय गटातटापासून
मी एक अशीच सार्वभौम भारतातील प्रत्येक ठिकाणी होणाऱ्या अत्याचारातील एकमेव अमुक तमुक प्रधान संस्कृतीतील अभागी अबला
मी एक अशीच सोयीस्कररित्या जातपातधर्मात वाटली गेलेली कुटुंबवत्सल
मी एक अशीच भोगासाठी आसुसलेल्या नामर्द नजरा सहन करणारी
मी एक अशीच समाजाने लादलेल्या चालीरितीत रूतल्याने स्वत्व हरवलेली
------------------------------------
©भूषण वर्धेकर
१५ एप्रिल २०१८
हैद्राबाद
------------------------------------

नास्तिकतेची वल्कलं

घेऊन निधर्मीवादाचा झेंडा पेटवून इहवादाचा डंका झालाय एकजण नवखा नास्तिक बिथरला पाहून बहुसंख्य आस्तिक कोणता सच्चा धार्मिक यावर करू लागला गहन वि...