शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२०

मुंबई कुणाची?

मुंबई कुणाची गं बाई कुणाची?
लढणाऱ्यांची की लुटणाऱ्यांची?
मुंबई कुणाची ?

बकाल झोपड्यांची की गगनचुंबी सोसायट्यांची
किनाऱ्यावरच्या आगरी कोळ्यांची की शेठ लोकांची
फसवलेल्या कामगारांची की धूर्त कारखानदारांची
मुंबई कुणाची गं बाई कुणाची?
कष्टकऱ्यांची की लुबाडणाऱ्यांची?
मुंबई कुणाची ?

गोरगरीब भैय्यांची की खंगलेल्या भूमिपुत्रांची
अलिशान बंगल्यांची की जीर्ण झालेल्या चाळींची
झगडणाऱ्या कलाकारांची की मुजोर घराण्यांची
मुंबई कुणाची गं बाई कुणाची?
विस्थापितांची की प्रस्थापितांची?
मुंबई कुणाची ?

बुजलेल्या मध्यमवर्गीयांची की फुगीर उच्चभ्रू वर्गांची
बरबटलेल्या नाल्यांची की गजबजलेल्या वस्त्यांची
विस्तारलेल्या पश्चिमेची की पसरलेल्या पुर्वेची
मुंबई कुणाची गं बाई कुणाची?
व्हेजवाल्यांची की नॉनव्हेजवाल्यांची?
मुंबई कुणाची ?

गब्बर गुंतवणूकदारांची की लढवय्या संघटनांची
कोंडलेल्या घरांची की गुर्फटलेल्या कुटुंबांची
विदीर्ण जंगलांची की आत्ममग्न उपनगरांची
मुंबई कुणाची गं बाई कुणाची?
महत्वकांक्षांची की अपेक्षाभंगांची
मुंबई कुणाची ?

कीर्द कल्लोळ्ळाची की कोंदट वातावरणाची
लब्बाड आश्वासनांची की कर्कश भूलथापांची
उपऱ्या लोंढ्यांची की घाटावरल्या माणसांची
मुंबई कुणाची गं बाई कुणाची?
फसवणाऱ्यांची की फसलेल्यांची
मुंबई कुणाची ?

उर्मट कार्यकर्त्यांची की उद्धट पुढाऱ्यांची
अट्टल भांडवलदारांची की कृश समाजवाद्यांची
करपलेल्या अस्मितांची की चिघळलेल्या जखमांची
मुंबई कुणाची गं बाई कुणाची?
एकल भाषिकांची की बहुभाषिकांची
मुंबई कुणाची ?

निगरगट्ट ठेकेदारांची की बनेल मध्यस्थांची
प्रशासकीय अधिकाऱ्यांची की राजपत्रित बाबूंची
केविलवाण्या निषेधांची की उग्र आंदोलनांची
मुंबई कुणाची गं बाई कुणाची?
संप करणाऱ्यांची की बंद करणाऱ्यांची
मुंबई कुणाची ?

दर्जेदार सेवासुविधांची की तुंबलेल्या गटारांची
कष्टाच्या घामाच्या धारांची की रक्तरंजित संघर्षांची
भैसाटलेल्या नेत्यांची की भरकटलेल्या मंत्र्यांची
मुंबई कुणाची गं बाई कुणाची?
राडा संस्कृतींची की ऐतिहासिक वारश्यांची
मुंबई कुणाची ?

मुंबई सगळ्यांचीच...
हाल-अपेष्टा, सुख-दुःख, स्वप्न, ईच्छा-आकांक्षा
उराशी बाळगून अहोरात्र अजस्र महानगरी चालवणाऱ्यांची...
जीवाची मुंबई करणाऱ्यांची...
मुंबई देशाची... मुंबई महाराष्ट्राचीच...!

© भूषण वर्धेकर,
२० नोव्हेंबर २०२०,
दौंड

रविवार, १८ ऑक्टोबर, २०२०

AI ML Data Science in Education field

A.I., M. L. And data science

© Bhushan Vardhekar


AI, ML, Data Science related courses are currently considered as the most appropriate job oriented courses. At present, the overall education policy is being changed at the national level and the online virtual marketplace for teaching programming, coding, etc. becoming hyper to attract parents and their children. This is definitely at a loss for school going children. What once was in the field of engineering colleges, or even worse, will be in the field of AI, ML, data science such trendy courses. Because of the way in which marketing is being done there is no option other than AI, ML, Data Science courses to get new high paying jobs. This is a kind of blind propaganda. My personal opinion is that long ago in Maharashtra MSCIT courses were conducted and failed to cope up with ongoing job demand then. Same way these AI, ML, Data Science courses will be going to decline to cope up with new trends in the upcoming job market. This is because of the background that is required to understand AI, ML, data science is not often overlooked. Whether you know how to code or program to solve problem using coumputer, you are taught temporary tricks on how to use some popular libraries and how to operate on which data to get results. Similarly likewise MS Office packages many office tools are present. Any basic computer course teaches us how to use those tools and what to do using the office utilities for typical desktop office work. The courses for AI, ML, Data Science would taught such similar workaround usage of existing tools. Nowadays there are stereotype data models being taught and built in project or in application.


Today, people in any field are building many libraries to find out if some implementation can be done through AI, ML, Data Science for research and make many changes in it and make it available for others to use on open platform. Basic researchers are making invaluable contributions. These libraries are used to solve new questions every day. Some application specific frameworks are used to solve specific problems. Some programming languages ​​offer supportive and derived packages. They can be used to solve real time problems after customization in existing libraries. Of course those who have already used a programming platform to solve a real life problem do not need to learn much new just AI, M.L. Corresponding algorithm or technique could be learned and used. At the same time, if you understand many basic concepts of mathematics, you can use them to create solutions then AI ML is much easier to deal with. Considering all this, there are two main factors that needed to be considered, such as how to use AI, ML, etc., and the details of the field in which real life problems exist. The current market is engaged in building an army that is only aware of AI, ML, data science, etc., without considering the basics. Those who have completed their college education have been tempted by this virtual market, can have such job oriented courses for getting jobs. Not needed for kids at all. But at present, after the national education policy is in picture many portal claiming every child has to learn coding from childhood as future job market is full of such requirements. it is not true that most of the next generation jobs needed only AI ML support. Many parents are being trapped by the pull of advertisements of coding genius. Basically in India only urban educated people are often deceived because they are effectively hypnotized as they have a lot of purchasing capacities. The overall system has been developed such that the people in the urban then from rural areas always got looted. People who are suffering from poverty is never aware of such so called waves in education. This will affect those who can spend extra amount for child education. At an age when brain improvements are happening so such period is not for feeding plug n play course content of AI ML and Data Science. They needed to be explored in other activities to nurture their overall growth. Imposinng forcefully to coding will rise intellictual slavery in future. If this persists, the next generation of donkey workers will start to emerge with only clerical programming "Do as Directed" type jobs. Understanding questions, root cause analysis of the problems needed to be taught for AI ML aspirants. School going children are never suitable for these things. To learn about the causes of a problem and different methods to solve them at least formal education of respective field is much needed. The stupid companies working in education sector ruining the overall aspect of coding and programming. Claiming coding genius would be created in low age upto 15 years after teaching AI ML Data Science courses. It is always worst thing for that generation. Situation and requirement is most important to learn a particular problem. Then solution or resolution can be found based on the earlier experiences. School going children needed to be explored for fundamental aspects of respective fields. Languages, Maths and science basics would be good to teach. Efforts should be made for the children growth in all aspects of fields. In future an army of coding genius would be used as AI ML model to solve the problems. The Indian market is one of the best in the world to dump anything that is not needed for rest of the world. In such an environment, it is not possible to live without the turmoil in the education field.


In fact Education sector is supposed to be Service but it became Business and all wrong things started happening. Take a look at a simple example. Many video tutorials on various topics related to school education are available for free on YouTube. Although there is a lot of similar content available on many similar portals, web channels for free of cost, many online portals claim that they have created and set up exclusive educational content into the market. In fact most of the content is regenerated or recreated by copying existing setup. During the Corona period, there was a flood of such things. Many competitive websites are available for free for coding practice. Who study with proper planning and emphasis on the essentials strategies, can have good utilization of such open source material. Children going to school needed to ask to use proper available content under parental guidance. The prospective customers are nothing but these parents who are cheated by so called coding genius advertisements. In the future, urban school children will be the biggest consumer market. The impact will be less in rural areas as the good internet system, which will run continuously, has not yet arrived. Current is based on mobile internet in villages.


In places like Pune, people come from rural areas to prepare for MPSC UPSC and then become permanent customers of this market. Due to influence of the motivational speeches delivered by eminent personalities students from rural areas motivativated to come to the city and get dumped in the intrusion of competition. Something similar will happen in the future of certified unemployed like AI, ML, Data Science aspirants. Just as a gang of contractors arrives at the labor base in the morning and picks up the laborers like the wholesale goods as required, some of the certified labor bases in the IT sector will be seen at the crossroads. So called Coding Expert in children will be in the same situation as a certified coder who is immersed in urban industrialization. The basic concepts of a field should be well understood and taught how to use it, how to solve problems in daily life and how to find solutions differently from retrospective experience. But we do not know the difference between blind imitation and following. The most important part of AI, ML Data Science is the study of how to use experience data, categorized data and processed data to create models. Based on this, we have to understand the models made by experts in different fields to study and develop something new. This requires comprehension and minimum academic proficiency. For that, it is important to have basic knowledge of any field. Being certified and being qualified are two different things. A new generation of slaves is being formed by creating a pull of coding genius as donkey workers. The natural way of thinking should be cultivated. Such a process is formed and implemented in school life. It needs to happen. Time and attention is must to mature the brain, thought process and decision making sense. Parents are falling prey to delusions and throwing their children into the pit of future insecurity.


Knowledge of the computer science field is not the only requirement for AI, ML, Data Science. The study (or at least understanding) of disciplines like psychology, biology, health sciences, logic is much necessary. People who understand multi-disciplinary branches can solve problems in this area very well. People with clerical knowledge of programming can only temporarily provide solutions or resolution to the problems faced. Such clerical masses can look for different options of education depending on the different paths ahead. Because today's clerical masses are at least degree holders. These masses can try their luck in different areas of employment. But in the future, a generation of coding geniuses will be less likely to try their luck. The future effects of Digital India's rate are not to be overlooked. After Corona, there is a huge market for online education, internet-based employment opportunities and more. The available customers have been taken into consideration. It is not a new thing in our country to trap our customers in a fraudulent market by showing the lure of prosperity. Accompanied by self-proclaimed experts, the chances of fraud are strong. It is important to think about what is needed and what is required. However, the current market formula is to force customers to buy the things. People with a lack of understanding and a society with so much useless attention always fall victim to exploitation.


As far as education is concerned, no one is looking back to spend more for better and strong career options in future. Especially the parents having capacities to spend more are a prime source of customers for companies to focus. To take advantage of this, greedy traders in the hollow market set up traps and sit down to pick such stupid blind customers. Society's prestige is one another aspect of such parents to show off their children are getting good facilities. Impressing people on social media is not so difficult these days. This is more dangerous for the middle class who are always influenced by comparing oneself to others. The biggest market share of such business strategies to influence such prospective customers by different tactics.


Today, the situation is such that virtual education is trying to emerge like coding and programming is one and only field of career for future. In fact it is not true in all sense. Programming and coding is needed to solve the problems using computers. While all areas are in a state of decline due to corona situation. Many capitalists looking this as a business opportunity to grab attention spreading fake news regarding national education policy are demanding coding and programming in school education. School education business is a never ending field as everyone wants to have a good education for their children.

As Industry 4.0 is emerging and trying to fix its roots in developing countries so the whole world is demanding AI ML Data Science related experts. It is purposefully spreaded that AI ML will be ultimate career options for the future. It is true that Industry 4.0 is going to revolutionize the world. But it is very cruel to make a business model to trap kinds and their parents in the name of coding genius. After any industrial revolution, there was an upheaval in the society. It has some advantages and disadvantages. The branches of art, commerce and science have once been very influential for many generations. Therefore, in accordance with Industry 4.0, appropriate changes have been made in our national education policy. They are certainly welcome. But it is not right to force children to learn coding. There are so many demerits of such enforcement.


The two branches of mathematics (Pure and applied) and science will reach the grassroot level to build qualified professionals. The main focus of any education system to deal with right implementation of such teaching and learning strategies in school education. In the current scenario only private schools offer good science and math education in schools for high costs. Government aided schools fail to nurture kids in schooling. This is the fault of our systems. It is important to create expert teachers to teach them first. It is a great tragedy of our country that our plans are very revolutionary but they fall short in implementation. In the case of kids going to acting workshops at summer vacation camps, there is a sweet misconception among parents that my kid will grow up as a very good actor, and somehow, as shown in a coding genius advertisement these days, parents think my kid will grow up and innovate remarkable things in IT and Computer field and became future Bill Gates or Steve Jobs and so on. This is ridiculous. Everything that was invented at that time was based on that situation and its necessity. The available conditions and tools were studied. Therefore, it is important to learn what tools can be used to analyze the root causes of the problems we currently have. Among those tools AI, ML Data Science related tools that can be used. AI ML filed is so vast and huge. It has been developing since decades. To understand its importance and its application to society the formal education of any field is must. A thorough study of what is available before that is needed. If someone is working in the field of marketing, then digital marketing for business growth could be the next domain to explore and would have exponentially grown. In such cases the study of how to reach more people using these new tools having AI ML applications is good to be taught. It is necessary to study and teach how to use existing frameworks and the limitations of the same so that new innovations would happen. In order to learn some things, one has to have an innate understanding and from time to time he has to come to it. Only then will people take advantage of the opportunities available for that skill. This awareness comes to everyone. Some people  do through introspection and plan for kid education. But In India blind followers run a big chunk of the market. This will ruin the future generation in the name of so called geniuses in AI ML. Give time for the intellectual growth of the children. At present it is not advisable to push kids into the rat race for coding.


गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०

ए.आय., एम. एल. आणि डेटा सायंस

ए.आय., एम. एल. आणि डेटा सायंस
©भूषण वर्धेकर

सध्याच्या काळात सर्वात जॉब ओरीएन्टेड कोर्सेस म्हणून एआय, एमएल, डेटा सायंस कडे पाहिले जाते. सध्या एकूण राष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक पॉलिसी बदलत आहे आणि त्याच अनुषंगाने लहानमुलांना प्रोग्रामिंग कोडिंग वगैरे शिकवण्यासाठी जी ऑनलाईन आभासी बाजारपेठ तयार होत आहे त्यामुळे भविष्यात नक्कीच तोटा होणार आहे. जे कधीकाळी इंजिनीअरिंग क्षेत्राचे झाले होते तसेच किंवा त्याहून भयंकर एआय, एमएल, डेटा सायंस या क्षेत्राचे होईल. कारण ज्या पद्धतीने एक मार्केटिंग केले जात आहे की नव्या भरपूर पगारांच्या नोकऱ्या मिळवण्यासाठी एआय, एमएल, डेटा सायंस चे कोर्सेस केल्याशिवाय पर्याय नाही. हा एक प्रकारचा आंधळा प्रचार केला जातोय. माझे व्यक्तिगत मत असे आहे की एम. एस. सी. आय. टी. चे कधीकाळी जसे तुडुंब कोर्सेस चालत होते तसेच काहीसे या एआय, एमएल, डेटा सायंस चे होईल. कारण एआय, एमएल, डेटा सायंस समजून घेण्यासाठी जी पार्श्वभूमी असावी लागते ती बहुतेक वेळा  बघितली जात नाही. तुम्हाला कोडिंग येते का नाही येत यापेक्षा तुम्हाला काही पॉप्युलर लायब्ररीज कश्या वापरायच्या आणि कोणत्या डेटा वर कशा पद्धतीने ऑपरेशन करायचे एवढेच कामचलाऊ क्लृप्त्या शिकवल्या जातात. 

एम. एस. ऑफिस मधले टुल्स कसे वापरावेत एवढे शिकवले की कार्यालयीन कामकाजासाठी जे जे गरजेचे आहे ते कसे करावे ह्याची शिकवण मिळते तसंच काहीसा प्रकार आगामी काळात एआय, एमएल, डेटा सायंस वगैरे कोर्सेस बद्दल होईल. आज कोणत्याही क्षेत्रातील लोक संशोधनासाठी एआय, एमएल, डेटा सायंस च्या माध्यमातून काही इंप्लीमेंटशन करता येईल का यासाठी बऱ्याच लायब्ररीज तयार करत आहेत आणि वापरुन त्यात बरेच बदल करून ईतरांना वापर करण्यासाठी उपलब्ध करून देतात. त्यात मूलभूत संशोधन करणारे खूप मोलाचे योगदान करत आहेत. रोज नवनव्या येणाऱ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी या लायब्ररीज वापरल्या जातात. काही एप्लीकेशन स्पेसिफीक फ्रेमवर्क ठरावीक प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्यासाठीच वापरले जातात. काही प्रोग्रामिंग लँग्वेजेस मध्ये सपोर्टिव्ह आणि डिराइव्ह्ड पँकेजेस उपलब्ध असतात. त्यांचा उपयोग करून प्रश्न सोडवता येतात. अर्थातच ज्यांनी एखाद्या रिअल लाईफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी प्रोग्रामिंग प्लॅटफॉर्मचा वापर केला असेल तर त्यांना फार काही नवीन शिकण्याची गरज नाही फक्त एआय, एम.एल. निगडित अल्गोरिदम किंवा टेक्निक वापरता आली पाहिजे. सोबत गणिताच्या बऱ्यापैकी मूलभूत संकल्पना नीट समजल्या असतील तर त्यांचा वापर करून सोल्युशन तयार करता येते. या सगळ्यांचा विचार केला तर इथे एआय, एम.एल वगैरेंचा वापर कसा करावा याची जाण असणारा आणि ज्या ज्या क्षेत्रातील रिअल लाईफ प्रॉब्लेम्स आहेत त्या क्षेत्रातील बारकाव्यांची जाण असणारा असे दोन घटक प्रामुख्याने गरजेचे आहेत. 

सध्याची बाजारपेठ मूलभूत घटक क्षेत्रातील गोष्टींचा विचार न करता केवळ एआय, एम.एल, डेटा सायंस वगैरेंची जाण असणारी फौज तयार करण्यात गुंतलेली आहे. महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण झालेल्यांना इतके दिवस ही आभासी बाजारपेठ आमिषे दाखवून बळी पाडत होती. पण सध्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानंतर लहानपणापासून कोडिंग शिकलंच पाहिजे नाहीतर काही खरं नाही पुढच्या पिढीचे वगैरे जुमलेबाजी करून जी जीवघेणी जाहिरात करून लोकांना फसवलं जातंय त्याचा अतिरेक झालाय. मुळात भारतात शहरी शिक्षित लोकच बरेचदा फसवले जातात कारण त्यांना प्रभावीपणे हिप्नोटाईज केले जाते. कारण त्यांची क्रयशक्ती खूप असते. ग्रामीण भागातील जनता आणि गरीबीमुळे पिचलेल्या लोकांना इथली व्यवस्थाच फसवत आलेली आहे. ज्या वयात प्रश्नांची समज यायला हवी, समस्या कशामुळे तयार झाल्यात त्यावर शिक्षण व्हायला हवे त्या वयात केवळ कारकुनी प्रोग्रामिंग शिकवणी देऊन गाढवी कामे करणाऱ्या भावी पिढीचे कारखाने उभे राहू लागतील. सध्या गल्लीबोळातून उभ्या झालेल्या इंजिनिअरिंग कॉलेजेस मधून जी रोजगारक्षम नसलेल्या इंजिनिअर बेरोजगारांची फौज आहे त्यांच्या साठी प्रयत्न व्हायला हवेत.भविष्यात कोडिंग जिनियस पोराटोरांची फौज तयार होईल. जाहिरात क्षेत्रात सुखवस्तु कुटुंबातील लोकांना फशी पाडून वाट्टेल ते गळ्यात मारण्याच्या कलेत खूप लोक मातब्बर आहेत. भारतीय बाजारपेठ तर यासाठी जगात अव्वल आहे. अशा वातावरणात लहाग्यांचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही. साधे उदाहरण बघा युट्युबवर खान एकाडेमी चँनेलवर शालेय शिक्षणाशी निगडीत वेगवेगळ्या विषयांवर मौलिक व्हिडीओ ट्युटोरियल्स मोफत उपलब्ध आहेत. तशाच प्रकारच्या कित्येक चँनेल्सवर बऱ्यापैकी साधर्म्य असलेला खुप कंटेंट उपलब्ध आहे तरी पण कित्येक ऑनलाईन पोर्टल शिक्षणाचा बाजार मांडून बसलेत. कोरोनोच्या कालावधीत तर अशा गोष्टींचा महापूर आलाय. 

कोडिंग सरावासाठी कित्येक स्पर्धात्मक वेबसाईट मोफत उपलब्ध आहेत. फक्त योग्य नियोजन आणि आवश्यक गोष्टींवर भर देऊन अभ्यास करणाऱ्या लोकांना हे करणे शक्य आहे. शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना याची गोडी लावणे गरजेचं आहे. त्यांचे प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर प्रॉडक्ट करू नये. भविष्यात शहरीभागातील शालेय मुले हीच मोठी ग्राहकांची बाजारपेठ होणार हे नक्की. याचा फटका ग्रामीण भागात कमी प्रमाणात बसेल कारण निरंतर चालेल अशी इंटरनेट व्यवस्था अजून पोहोचली नाही. जी आहे ती मोबाईलवर आधारलेली आहे. शहरीभागातील सुविद्य आणि सुशिक्षित पालकांची लोकलाजेस्तव स्युडो कोडिंग जिनियस स्पर्धेत उतरून फसगत होण्यासाठीची व्यवस्था तयार केली जातेय. ह्याचे फायद्यांपेक्षा दुष्परिणाम जास्त होतील. खूप पूर्वी मेडिकल ट्रान्सक्रिप्शन वगैरे क्षेत्रात काही कोर्सेस ने जो धुमाकूळ घातला होता आणि नंतर तो शमला तसा काहीसा प्रकार एआय, एम.एल. डेटा सायंस वगैरे कोर्सेसच्या बाबतीत होईल असे वाटते. दहावी, बारावी आणि नागरी सेवा परिक्षा तयारी साठीचे भुलवणारे आणि फसवणारे कोर्सेस हे राष्ट्रीय उत्पन्नात कैक दशके आघाडीवर आहेत. त्यांची बुरूजे हल्ली एआय., एम.एल, डेटा सायंस वगैरे कोर्सेसमुळे ढासळतील अशी सध्याची परिस्थिती आहे.

पुण्यासारख्या ठिकाणी खेडोपाड्यातून लोक एमपीएससी युपीएससी च्या तयारीसाठी येतात नंतर इथल्या या बाजारपेठेचे कायमस्वरूपी गिऱ्हाईक होऊन जातात. उमेदीच्या काळात केवळ मोटीव्हेशन स्पीकर्सला बळी पडून शहरात येऊन स्पर्धापरिक्षेच्या घुसमटीत अडकून बेजार होतात. तशीच काहीशी अवस्था एआय, एम.एल, डेटा सायंस वगैरे सर्टिफाईड बेरोजगारांची भविष्यात होईल. मजूर अड्ड्यावर जसे सकाळी सकाळी एक ठेकेदारांची गँग येते आणि गरजेनुसार घाऊक माल उचलावा तसे मजूर घेऊन जातात तसेच काहीसे आयटी क्षेत्रातील सर्टिफाईड मजूर अड्डे चौकाचौकात थाटले जातील. गावागावातून आलेला एखादा तरूण शहरी औद्योगिकीकरणाच्या रेट्यात भरडला जातो तशीच अवस्था कोडिंग एक्सपर्ट पोराटोरांची होईल. एखाद्या क्षेत्रातील मुलभूत संकल्पना नीट समजून त्याचा वापर कसा करावा, रोजच्या जगण्यातले प्रश्न कसे सोडवावेत आणि पुर्वलक्षी अनुभवातून वेगळ्या प्रकारे सोल्युशन कसे शोधावे ह्यांचे लौकिकार्थाने शिक्षण दिले गेले पाहिजे. मात्र आपल्याला अंधानुकरण आणि अनुसरून एखादी गोष्ट करणे यातला फरकच कळत नाही. एआय. एम.एल डेटा सायंस वगैरेसाठी सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे एक्सपिरियन्स डेटा, कँटेगाराईज्ड डेटा आणि प्रोसेस्ड डेटा निर्मिती कशी असते याचा अभ्यास होय. त्यावर आधारित वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञांनी बनवलेली मॉडेल्स समजून, अभ्यासून नवीन काही विकसित करुन पुढे गेले पाहिजे. यासाठी आकलनशक्ती आणि किमान शैक्षणिक प्रगल्भता गरजेची आहे. त्यासाठी चिंतन मनन करणे महत्त्वाचे आहे. गाढवी कामे करणाऱ्या लोकांची फौज तयार करून नवी गुलामांची पिढी तयार होतेय. नैसर्गिक विचार करण्याची पद्धत जोपासली गेली पाहिजे. तीची एक प्रोसेस शालेय जीवनात तयार होत असते. ती होणे गरजेचे पण आहे. भूलथापांना बळी पडून पालक आपल्या मुलांना भविष्यातील असुरक्षिततेच्या खाईत लोटत आहेत. 

एआय, एम.एल, डेटा सायंस साठी केवळ संगणकीय क्षेत्राचेच नॉलेज पाहिजे असे काही नाही. मानसशास्त्र, जीवशास्त्र, आरोग्यशास्त्र, तर्कशास्त्र वगैरे विद्याशाखांचा अभ्यास (किंवा किमान समज) पण तेवढाच गरजेचा आहे. मल्टी डिसिप्लेनरी ब्रँचेस समजणारे लोक या क्षेत्रातील प्रॉब्लेम्स खूप चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकतात. कारकुनी नॉलेज असणारे लोक केवळ मलमपट्टी सारखेच कामचलाऊपणे स्लॉव्ह करू शकतात. अशी कारकुनी जनता पुढे वेगवेगळे चोखंदळ मार्ग अवलंबून शिक्षणाचे वेगवेगळे पर्याय धुंडाळू शकतात. कारण ही आजची कारकुनी जनता किमानपक्षी डिग्री होल्डर आहे. रोजगाराच्या वेगवेगळ्या क्षेत्रात ही मंडळी आपले नशीब आजमावून बघू शकतात. मात्र भविष्यात कोडिंग जिनियस पिढी तयार होईल ती असे नशीब आजमावून पाहू शकतील याची शक्यता कमी असेल. 

डिजिटल इंडियाच्या रेट्यामुळे भविष्यात होणारे दुष्परिणाम कानाडोळा करण्यासारखे नाहीत. कोरोनानंतर ऑनलाईन शिक्षण, इंटरनेटवर आधारित क्षेत्रात भरपुर शिक्षणाच्या संधी वगैरेंनी मोठी बाजारपेठ उभी राहत आहे. यात उपलब्ध  ग्राहकांना तर कचाट्यात घेतलेच आहे. भविष्यातील ग्राहकांच्या बेजमीसाठी धुष्ट पुष्ट आयुधे तयार केली जात आहेत. भरभराटीची आमिषं दाखवून फसव्या बाजारपेठेत ग्राहकांचा हकनाक बळी देणे आपल्या देशात काही नवे नाही. सोबत स्वयंघोषीत तज्ञ मंडळी असतील तर फसवणुकीची शक्यता पराकोटीची असते. काय गरजेचे आहे आणि काय आवश्यक आहे याचा विचार करणे महत्वाचे असते. मात्र माथी मारून बळजबरीने ग्राहक बनवणे ही सध्याच्या बजारपेठेचे सूत्र. त्यामुळे ए. आय, एम. एल. डेटा सायंस क्षेत्रातील कोर्सेस बद्दल वेळीच अंकुश ठेवला पाहिजे. समज कमी असणारे आणि नको इतकी जास्त समाज असणारे लोक नेहमीच बळी पडतात आणि टाहो फोडतात. 

शिक्षणक्षेत्राचे म्हणाल तर कोणीही मुलांच्या भविष्याची काळजीपोटी जास्त खर्च करून चांगल्या शिक्षणासाठी खर्च करायला मागेपुढे पाहत नाही. याचाच फायदा घेण्यासाठी बोकळलेल्या बाजारपेठेतील हापापलेले व्यावसायिक सापळे रचून सावज टिपायला बसलेले असतात. समाजमाध्यमाच्या कचाट्यात आलेल्या लोकांना प्रभावित करणे हल्ली तसे फारसे अवघड राहिले नाही. यात भरडला जातो तो पामर मध्यमवर्ग इर्षेपोटी सतत तुलना करण्यात गर्क असल्यामुळे.
आज परिस्थिति अशी आहे की कोरोनामुळे सगळीच क्षेत्रे मोडकळीस आलेली असताना उगाचंच फुगलेल्या बेडक्यासारखे व्हर्च्युअल एज्यूकेशन उभे राहू पाहत आहे. त्यात इंडस्ट्री ४.० म्हणून आता सगळीच दुनिया ए. आय., एम. एल. आणि डेटा सायंस वगैरे गोष्टीमय होऊन जाणार आहे असा एक दूधखुळा प्रचार केला जातोय. इंडस्ट्री ४.० मुळे अवघ्या जगात उलथापालथ होणार आहे हे अगदी खरे आहे. पण त्यासाठी लहान मुलांना बकरा बनवणे आणि व्यावसायिक संधी साधणे हे खूप क्रूर आहे. कोणत्याही औद्योगिक क्रांतीनंतर समाजात उलथापालथ होतेच. त्याचे काही फायदे आणि तोटे असतात. कला वाणिज्य आणि शास्त्र शाखांचा कधीकाळी बऱ्याच पिढ्यांवर खूप मोठा प्रभाव राहीला आहे. त्यामुळे इंडस्ट्री ४.० ला अनुसरून आपल्या एज्युकेशन पोलिसिमध्ये योग्य ते बदल केले आहेत.  ते स्वागतार्ह नक्कीच आहेत. मात्र त्यासाठी लहान मुलांना कोडिंग शिकण्याची बळजबरी करणे योग्य नाही. तश्या आजकाल जाहीराती पण खुपश्या येऊ लागल्या आहेत.  गणित आणि विज्ञान या दोन विद्या शाखा जेवढ्या तळागाळापर्यन्त पोचतील आणि ते शिकवणारे तज्ञ शिक्षक तयार करणे हे महत्वाचे आहे सर्वात पहिले.  

आपल्या देशाची खूप मोठी शोकांतिका आहे की आपल्या योजना खूप क्रांतीकारी असतात मात्र इंप्लीटेशन मध्येच लोच्या असल्याने फसतात. सर्वसामान्य समज असणाऱ्या लोकांना आजुबाजूला तरी असेच दिसते आहे की भविष्यात फक्त आणि फक्त  ए. आय. एम. एल. डेटा सायंस वगैरे हेच राहणार आहे.  उन्हाळी सुट्टीच्या शिबिरात अभिनयाच्या कार्यशाळेत जाणाऱ्या लहान मुलांच्या बाबतीत जो एक गोड गैरसमज आईवडिलांचा होत असतो की माझा बबड्या मोठा होऊन खूप चांगला अभिनेता होईल तसंच काहीसा प्रकार हल्लीच्या कोडिंग जिनियस म्हणून लहान मुलांच्या आई वडिलांना वाटते की माझा बबड्या मोठा होऊन बिल गेट्स किंवा स्टीव्ह जॉब्स वगैरे होईल. हे हास्यास्पद आहे. पण याला बळी पडणाऱ्यांची कीव करावी तितकीच कमी आहे.  त्या त्या काळी जे जे शोध लावले गेले ते त्या त्या गरजेतून. त्यासाठी उपलब्ध परिस्थितीचा आणि साधनांचा अभ्यास केला गेला. त्यामुळे सध्याच्या आपल्या ज्या समस्या आहेत त्याचे रूट कॉज एनालिसिस करून कोणती साधणे वापरता येतील याचा अभ्यास करण्याची शिकवण गरजेची आहे. त्या साधनांपैकी ए. आय. एम. एल. डेटा सायंस वगैरे  शाखांचा उपयोग होऊ शकेल ही शिकवण महत्वाची. त्याआधी जे उपलब्ध आहे त्याचा पुरेपूर अभ्यास गरजेचा आहे.  

जर कोणी मार्केटिंग च्या क्षेत्रात काम करत असेल तर डिजिटल मार्केटिंग साठी कोणी व्यवसाय वृद्धी साठी काही काम करत असेल तर या नव्या साधनांचा उपयोग करून जास्त लोकांपर्यंत जाता येईल याचा अभ्यास, कित्येक क्षेत्रात प्रेडिक्शन अनालिटिक्स साठी ए. आय. एम. एल. चा उपयोग कसा करावा याचा अभ्यास आणि शिक्षण  देणे गरजेचे आहे. तसे शिक्षण जो तो गरज पडेल तेव्हा घेतोच आहे. स्किल अपग्रेड करण्यासाठी हे गरजेचेच आहे आणि सध्यातरी तेच योग्य आहे.  त्यासाठी लहान मुलांना कोडिंग जिनियस बनण्यासाठी दावणीला बांधून ठेवणे योग्य वाटत नाही. काही गोष्टी शिकण्यासाठी  उपजत समज यावी लागते आणि वेळोवेळी ज्याला त्याला येत असते. तेव्हाच त्या त्या स्किल साठी उपलब्ध संधीचा फायदा लोक घेतात. त्यातही त्याच तेच काम करून सँच्युरेशन आल्यावर आहे त्याच क्षेत्रात पुढील वाटचालीसाठी एआय, एम.एल वगैरेंचा काही  उपयोग आहे का? ही जाण प्रत्येकाला येते. काही जण कम्फर्टेबल झोनमधून बाहेर पडू शकत नाहीत तर बाहेर पडून नवनवे चोखंदळ मार्गाने पुढे जातात. प्रगती होते ती अशी. आत्मनिरिक्षणातून. लहान मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी वेळ द्यावा. नाहीतर ती वेल ट्रेन्ड होती एखादी गोष्ट वापरण्यात. त्याचा तोटाच अधिक असेल. सध्यातरी लहान मुलांना कोडिंग साठी रॅटरेस मध्ये ढकलणे योग्य नाही.

गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२०

कोरोनाने काय शिकवलं?

कोरोनाने काय शिकवलं?

२०२० ची सुरुवातीच्या काळात चीनच्या कोण्या एका प्रातांत वुहान नावाच्या शहरात कोव्हिड-१९ नावाच्या विषाणूने धुमाकूळ घातलाय एवढेच वाचण्यात आले होते. तथापि त्यासाठी लॉकडाऊन वगैरे केलेल्या शहरांबद्दल तत्सम बातम्या येत होत्या. भारतात पहिला रूग्ण  सापडला तो केरळात आणि मग अवघ्या देशातील एकेका शहरात संक्रमित होण्यास कोरोनाला वेळ लागला नाही. मग अवघा भारत कोरोनामय, लॉकडाऊन सँव्ही आणि हेल्थ कॉशस वगैरे झाला. भारतातील आरोग्याच्या कोलमडून गेलेल्या व्यवस्थेची लक्तरे यानिमित्ताने मांडली गेली. मुळात कोरोनाचा प्रसार हा रोखण्यासाठी संंसर्ग होऊ नये वा कमी प्रमाणात व्हावा अशा प्रकारची उपाययोजना करणे आवश्यक होती. काही ठिकाणी ती व्यवस्थित राबविली गेली तर काही ठिकाणी तीचे तीन तेरा झाले. संसर्ग ह्या एकमेव तात्काळ फैलावणाऱ्या गोष्टीबद्दल जी विशेष खबरदारी घ्यायला हवी होती ती न जमल्याने कोरोनाचा प्रसार बिनधोक झाला. मुळात आपल्या देशात संसर्ग हा कोणताही असो वैचारिक वा साथीच्या आजारांचा फैलावला की फैलावतोच. त्याच्यावर ताबा मिळवणे महाकठीण. कारणं अनेक आहेत. त्यापैकी एक म्हणजे आपला भलामोठा देश जो उभा आडवा वेगवेगळ्या भौगोलिकदृष्ट्या भागात पसरलेला आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती मुबलक मिळाल्याने त्याचा जिथे तिथे राहणाऱ्या लोकांवर विशेष प्रभाव. खाण्यापिण्याच्या हर एक वेगवेगळ्या तऱ्हा.  हवामानाचे वेगवेगळे पट्टे. या सगळ्यांचा कळत नकळत इथल्या आरोग्यविषयक प्रश्नांवर आणि त्यांच्या उत्तरांवर वेगवेगळे परिणाम आहेत. कदाचित सर्वच बाबतीत विविधता असल्याने भारतीयांच्या इम्युनिटीची पातळी पण विशेष उल्लेखनीय. आजूबाजूच्या वातावरणाचा तेथील खाण्यापिण्यावर प्रभाव आहेच. शिवाय आपल्याकडे पिकवली जाणारी शेती उत्पादने आणि त्यातून मिळणारे पोषणमूल्य याचा हमखास प्रभाव कोव्हिड-१९ वर झालेला असणार. इथल्या लोकांना जागरूक करण्यासाठी शैक्षणिक आयुधे जेवढी महत्वाची तेवढीच त्यांची आकलन क्षमता वाढण्यासाठी केले जाणारे प्रयत्न गरजेचे. लोकांपर्यंत माहिती पोचल्यावर त्यावरील उपाययोजना आमलात आणण्यासाठी केले जाणारे प्रयत्न हेही महत्त्वाचे. जनता कर्फ्यु, लॉकडाऊन, अनलॉक, कंटेंटमेंट झोन, सोशल डिस्टन्सिंग वगैरेंच्या वेगवेगळ्या तऱ्हेने सगळे उपाय करून देखील कोरोनाग्रस्त वाढतंच गेले. साधं सोप सुटसुटीत कारण म्हणजे अनियंत्रित वाढत जाणारी लोकसंख्या. इतर देशात लोकसंख्या कमी असल्यामुळे आमलात आणलेल्या योजना काही प्रमाणात यशस्वी ठरल्या. त्यामुळे रुग्ण वाढ कमी झाली. मात्र भारतात लोकसंख्येच्या मानाने केल्या गेलेल्या उपाययोजना तोकड्या पडल्या. सुरुवातीला शहरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाने खेडेगावात, गावागावात शिरकाव करुन जनतेला आणि पर्यायाने व्यवस्थेला जेरीस आणले. या सर्वातून नक्की बोध काय घ्यावा तर परकीय आक्रमणांपासून सुरक्षित राहण्यासाठी जशी सरहद्दीवरील सुरक्षा बले कायमस्वरूपी तैनात असतात. वेल ट्रेन्ड असतात. सरकार नियंत्रित व नियुक्त जशा संरक्षण व्यवस्था व संस्था सदैव तत्पर असतात देशाच्या संरक्षणासाठी. तशीच सरकार नियंत्रित व नियुक आरोग्यविषयक व्यवस्था व संस्था उभारल्या गेल्या पाहिजेत. आरोग्यक्षेत्र मुळात भारतातील लोकसंख्येच्या तुलनेत प्रचंड मागास आहे. अजूनही इंग्रजांनी सुरु केलेल्या इस्पितळात कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी अवलंबून रहावे लागले. रुग्णसंख्या वाढल्याने खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु झाले. मग कोरोना हा एक आजार न होता बाजार होऊन गेला.  ज्याची पैसा खर्च करण्याची क्षमता त्यावर योग्य ते उपचार. गरिबांवर उपचार हे रामभरोसेच होते. कागदोपत्री फक्त रोज नवनवे आकडे येत होते. परिस्थिती मात्र ती तशीच दळभद्री. आपल्या देशाची सर्वात मोठी शोकांतिका हीच की इतर देशात राबवली गेलेली तिथली उत्कृष्ट मॉडेल्स आपण जशीच्या तशी आपल्याकडे राबवतो. अंधानुकरण करणे आणि फसगत करूण घेणे. आपण एखाद्या समस्येचे रूट कॉझ एनालिसिस करत नाही. जे उपलब्ध असेल ते आमलात आणण्याचे नाहक खटाटोप करतो. २०१४ नंतर केलेल्या गोष्ट मिरवण्याची एक नवी भक्तसंस्कृती उदयास आलेली आहे. जर का ती फसली तर जनतेचा डायव्हर्टिंग मोड अॉन करून पुन्हा नवा तोच खेळ. प्रयोग दुसरा अंक पुढचा.  
मुळात आपली व्यवस्था ही कोणताही संसर्ग जास्तीत जास्त कसा फैलावला जाईल यावर जास्त फोकस करते. अंतर्गत सुरक्षा आणि आरोग्य विषयक सुविधांसाठी जी आंतरराष्ट्रीय मानके वा मापदंड आहेत उदा. अमुक हजार लोकांमागे तमुक इतके घटक (आरोग्यविषयक असो वा सुरक्षेविषयी) वगैरे आपण आपल्या देशात कशाप्रकारे लागू करतो? त्यात सरकार नियंत्रण किती? खाजगी नियंत्रण किती? सगळ्यांची योग्य ती सुव्यवस्था आहे का? यावर सध्याच्या काळात लागू पडतील असे नियम, कायदे वा योजना राबवण्यासाठी व्यवस्था सक्षम आहे का? अशा एक ना अनेक प्रश्नांचा धांडोळा शोधावा लागेल. जर्जर झालेल्या जखमेवर केवळ मलमपट्टी करून भागणार नाही. जखम होऊ नये म्हणून घ्यावयाची योग्य काळजी आणि जखम झाल्यावर करण्याजोगी उपाययोजना ही कणखरपणे राबवली गेली पाहिजे. देशातील कोणत्याही व्यवस्था ह्या केवळ शोषण करण्यासाठीच कशा राबवील्या जातील याची दक्षता घेतली गेली. या भ्रष्ट व्यवस्थेचा संसर्ग तळागाळातील सरकार नियंत्रित घटकांकडे पोसला गेला. मुळातच आपण संसर्ग रोखण्यासाठी केलेले तोकडे प्रयत्न आणि कोरोनाने त्रस्त झालेल्या जनतेला लॉकडाऊन अनलॉक वगैरेंच्या खेळात ढकलून देऊन फार मोठा हलगर्जीपणा केला आहे. काही प्रमाणात जनता पण त्यास कारणीभूत आहे. गर्दी करू नका सांगितले असेल तर गर्दी झाली आहे की नाही हे बघायला बाहेर पडून येणारी निर्बुद्ध लोक आपल्या देशात काही कमी नाहीत. झोपडपट्टी भागातून कोरोना कंटाळून निघून गेला असावा. कारण मोठमोठ्या शहरात अस्ताव्यस्त वाढलेल्या बकाल झोपडपट्टीत सोशल डिस्टन्सिंग राखणार तरी कसे? सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणाऱ्या भागांत कोरोना वाढणारच. त्याचे निर्मूलन थोडेच होणार आहे? एकमेकांना दोष देऊन काहीही साध्य होणार नाही. एक दोन दिवस समाज माध्यमातून झळकणे वगैरे सोपस्कार साजरे होतील. मुख्य प्रश्न तसेच आ वासून उभे ठाकणार. व्यवस्थेतील दोष. मग त्यात बदल कायमस्वरूपी करावे का तात्पुरते आणि कोणाच्या सोयीनुसार करावे हा कळीचा मुद्दा. अल्पसंतुष्ट लोकांना होणाऱ्या लाभापोटी लागणारी संसर्गाची लागण वेगवेगळी. सत्तेचा हव्यास यातून सुटणार तरी कसा? कैक वर्षे मलमपट्टी करून जर जखम चिघळत असेल तर गँगरीन होणारच. तसेच व्यवस्थेचे आहे. संसर्ग आणि बाजारपेठा समप्रमाणात वाढत जातात तर संसर्ग आणि जनजागृती ह्यांचे नेहमीच व्यस्तप्रमाण असते. कोरोनाचा हाहाकार शिथिल झाल्यावर फक्त न्यु नॉर्मल, किंवा रिस्टार्ट करून भागणार नाही. तर महत्त्वाचे मूलभूत गरजा भागविण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी शाश्वत यंत्रणा आणि सक्षम प्रशासन तयार करणे गरजेचं आहे. सगळ्याच क्षेत्रातील लोकांना भेडसवणारे जगण्याचे मूलभूत प्रश्नच सर्वात पहिल्यांदा सोडवायला हवेत. आरोग्याच्या बाबतीत जागरूकता आली आहेच आणि आता तर बाजारपेठेत पण त्यातील उपलब्ध संधीचा वापर वाढलाय. एवढ्याश्या सुक्ष्म कोरोनाच्या विषाणूने भल्यामोठ्या अर्थव्यवस्था कशा मोडकळीस आणल्या ह्याचा सोशो-ईको-पॉलिटिकल बाजूने विचार करणे गरजेचं आहे. कृतीवर भर देऊन योग्य त्या उपाययोजना करणे हेच द्रष्टेपणाचे ठरेल. देशाची अर्थव्यवस्था जर एवढ्याश्या किटाणूने डळमळीत होत असेल तर आपल्या देशातील नागरिकांची आरोग्य सुरक्षा किती महत्वाची हे समजून घेतलं पाहिजे. तसेच किमानपक्षी दोन महायुद्धानंतर जसा जागतिक बदल झाला तसाच बदल कोरोनानंतर अपेक्षित आहे. कोरोना संक्रमणामुळे देशातील उपलब्ध व्यवस्था कशी कुचकामी आहे यावर आरोप-प्रत्यारोप किंवा हेवे-दावे करण्यापेक्षा सांप्रत कालानुरूप आणि नव्या बदलांना अनुकूल असे व्यवस्थेचे पुनःनिर्माण गरजेचे आहे. कोरोनाने असे एकही क्षेत्र सोडले नाही ज्याची वाताहत झाली नसेल. दुसऱ्यांपेक्षा आपली वाताहत कमी झाली असे मानून फुशारक्या मिळवून काहीही साध्य होणार नाही. सध्याचे केंद्रीय नेतृत्व आम्हीच आमुक केलं तमुक करू वगैरे बोलून दाखवतात. मुळात काहीतरी वेगळं आणि शाश्वत करण्यासाठीच सक्षमपणे सत्ता बहाल केलीय जनतेने. मग टेंभा मिरवण्याची गरजंच काय? आधीच्या नोकराने कामचुकारपणा केला कामात केलेल्या दिरंगाईमुळे त्याला काढून टाकले. नव्या नोकराला कामे करण्यासाठीच सेवेत घेतला आहे. त्याने निक्षून कामेच केली पाहिजेत. मी पणा मिरवून काय साधणार आहात? अर्थात हे सद्सद्विवेक असणाऱ्यांनाच लागू पडते. भक्त आणि गुलाम यांना   या ज्वलंत प्रश्नांचे काही घेणे देणे नाही. अर्थव्यवस्थेविषयी बोलायचे झाले तर, 'कोरोना बदनाम हुआ इकॉनॉमी तेरे लिए' असे म्हणावे लागेल. फुकाचे लाखोंच्या कोट्यवधीच्या आकड्यांची रेलचेल समाजमाध्यमात झळकण्यासाठी ठिक. पण प्रत्यक्षात काय? भुकेल्यांना पंचपक्वान ताटाचे फोटो दाखवून पोट भरता येत नाही. देशपातळीवर जे निर्णय घेतले जातील ते केंद्र सरकार करेल तेव्हा करेल. मात्र कोरोनाने आत्मपरीक्षण करण्यासाठी पोषक वातावरण तयार केले हे नक्कीच. आणीबाणीच्या काळात शाश्वत टिकेल अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी व्यक्तीगत निर्णय फार महत्त्वाचे आहेत. मग हे निर्णय कौटुंबिक पातळीवर कसे परिणाम करतील याचा उहापोह करणे गरजेचं आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जसे दोन कालखंडाचे आपण तुलनात्मक भाग पाडतो स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर तसेच कोरोनापूर्व आणि कोरोनोत्तर कालखंडात आपल्याला विभागणी करावी लागेल. न्यू नॉर्मल म्हणून होणाऱ्या बदलांना नव्या दमाचे कोंदण जरी दिले तरी बदल आत्मसात करणे थोडेसे अवघड जाणार आहे. कारण कोणत्याही बदलाला माणूस सहजासहजी सामोरा जात नाही. एकतर त्याला नाईलाजाने किंवा व्यवस्थेसमोर हतबल होऊन बदल स्विकारावे लागतात. कोरोनानंतर आदळणाऱ्या गोष्टींची हीच गत होणार आहे. सगळ्याच पातळीवर कमी जास्त प्रभाव दीर्घकाळ राहणार आहे. व्यक्तीगत पातळीवर किमान गोष्टी आपण बदलू शकतो कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय. उगाचंच केले जाणारे खर्च अटोक्यात आणू शकू. मात्र कोणताही होणारा खर्च दुसऱ्याचे उत्पन्न असते. एक विदारक सत्य असे पण आहे की माणूस फक्त आणि फक्त मुलभूत गरजांसाठी खर्च करू लागला आणि चैनीच्या गोष्टींना मुरड घातली तर बाजारपेठेत काही प्रमाणात मंदीसदृश्य परिस्थिती तयार होते. कारण भारतात गेल्या काही वर्षांत एक मोठा वर्ग चैनीच्या गोष्टींची खरेदी सहजगत्या करू लागला. कधीकाळी एका ठराविक वर्ग चैनीसाठी खर्च करीत असे. जागतिकीकरणामुळे हा एक झालेला लक्षणीय बदल गेल्या एक दोन दशकात झालेला जाणवतो. समाजवादी विचाराने अशा बाबींकडे वेगवेगळ्या दृष्टीने बघितले जाऊ शकते. मात्र कोरोनाने सगळ्या विचारसरणीच्या थिअरीज लोळागोळा करून ठेवल्यात. कोरोनामुळे व्यक्तिगत आरोग्यासाठी जसा एक मोठा वर्ग जागरुक झाला आहे तसाच मानसिक स्वास्थ्यासाठी पण जागरूक होण्याची गरज आहे. नैराश्याने केवळ एका घटकाचे नुकसान होत नसते तर त्याच्याशी निगडित वेगवेगळ्या समाजघटकांना पण मोठी झळ बसते. हल्लीच्या काळात व्यक्तीगत नैराश्य मॉब सायकॉलॉजी प्रभावीत करायला धष्टपुष्ट आयुधं तयार झालेली आहेत. त्यात समाजमाध्यमाचा खूप मोठा वाटा आहे. कोरोनानंतर जगण्याची पर्यायी व्यवस्था कोणती आणि कशी असावी यावर मतमतांतरे असू शकतात. मात्र कोणाचेतरी शोषण करून अशी व्यवस्था उभी करणे समाजहितासाठी चांगले नाही. कोरोनानंतर जर शाश्वत व्यवस्था उभी करायची असेल तर जागरूक राहूनच करावी लागेल. कोणीतरी अमुक असे केले म्हणून आपण करून बघू हा दुधखुळा प्रयत्न हानीकारक होईल. मुळातच आपण भारतीय अंधानुकरण करण्याला प्रतिष्ठा देऊन टाकतो. सध्यातरी सेल्फ रियलायझेशन होणं गरजेचं आहे. कोरोना हे केवळ एक निमित्त झालंय आपल्या तोकड्या असलेल्या व्यवस्था समजायला. आता असे समाजभान आलेच असेल तर योग्य ती कार्यवाही देशपातळीवर आणि व्यक्तिगत पातळीवर केली जावी हीच अपेक्षा.

©भूषण वर्धेकर

शुक्रवार, ३ जुलै, २०२०

Takeaway of Covid-19 and Lockdown

Takeaway of Covid-19 and Lockdown

New Year 2020 started with a lot of hopes and expectaions. Wuhan city located in China far away from us was locked down for 3 months as it has been found that the outbreak of Corona virus started from same city. No one were aware of that such small virus having size in hundreds of nanometers could shook the hundreds of crores population worldwide. Now we are in mid of 2020 and having uncertainty of overall aspects of life. Bookish positive quotes and inspirational thoughts are spreaded to gear up the morals of badly affected people in the begining. Now everyone is in the mood of bursting mode as nothing can be controlled. All govt medical infrastructres which were introduced were britishers badly impacted by outbreak of corona positive. All public admin strategies got stuck. In the realm of politics allegations and claims reached to peak of hypocrisy. The biggest pain of this covid19 was immigrant suffering. The challenges to reach their belonging villages is one the biggest blocker. But good hope seen when many people served food and basic needs to them as a cause of humanity. This is true India when system fails, the true integrity among the Indian opens the doors of humanity. This lockdown can be witnessed the recarnation of socio eco political aspects of India. The limits of our efforts to cope up with such grievous situation taught life lesson every individual. Due to this many people lost their jobs also newly started businesses lost their hopes. I am one of those people who lost their jobs due to Covid-19 pandemic crisis.
First of all this is not an inspirational article. Whatever difficulties I faced during these days only I know and I am not at all interested to elaborate those feeling using enriched inspirational quotes. Everyone is having that typical endurance to face such unavoidable situation. Main motive of this writting is Self Realization. Due to sudden layoff in companies gives me a realistic wisdom of life. Every moment we decide about future and plan to fulfill our dreams but never get to know What will be served in our dish by destiny. After all such attacks are part of life and teaches us how to face life. We used to try to fit ourself into comfortable zones. People around us are always going to support us in difficult situation  but real struggle start from inside when we are in the middle of loosing hope. We are familiar with famous quote "Hope for the Best". But life is always put you in a such dramatic blackout where Self Realization only gives us a breakthrough. This self realization provides a wide spectrum of analysis of our decisions taken in the past and its consequences in present. Future always lies in our thoughts and respective deterministic actions. The lockdown era gave me the life lesson on how to prioratize the day to day activities. As usual like others my day start with typical nostalgic TV serials and its so called doses of ethics and cultured heroic lessons. In 2020 society needs right attitude towards drastic changes in life and relationships and our surroundings is fully filled with spiritual aspects of nostalgic dramatized mythological stories and epics. We need scientific attitude towards life and practical approach in culture. I used to occupy with WFH assigned tasks and list of web series and films to watch in the lockdown period. After loosing a job Self Realization plays vital role in my life to understand my importance in all sense. My overall focus was in prepartion of interviews and hands on practise in coding. These days taught me how to handle any situation by following self disciplined activities. In the lockdown while searching job and preparing for interviews I trully understood the practical importance of Priority matrix and pomodoro technique. Earier while studying to clear backlogs in college exam period I used these methods. After a decade I found same situation in my life facing unavoidable incidents. Today I am writing this because after getting a job in good product company and after finishing the onboarding formailties in I got time to interrogate myself. In a relax mind I found things and tasks achieved by me in last couple of months. I think this is a life lesson of Self Realization and Self Disciplined which can tackle any situation in life by putting right efforts in right direction. I truly learn what to avoid and what to focus to get better results. To summarize I would say its a greatest takeaway of entire lockdown.
Thanks for reading.
©Bhushan Vardhekar
3 July 2020

शुक्रवार, १० जानेवारी, २०२०

काश्मिरी पंडितांचे प्रश्न

पुढच्या महिन्यात विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित शिकार चित्रपट प्रदर्शित होतोय. काश्मिरी पंडितांनी ९० च्या दशकात शेवटाला जे भोगलेय त्याचं चित्रण केलेले आहे. अर्थातच बॉलिवूडपट असल्याने लव्हस्टोरी विथ मसाला मुव्ही व्हाया इमोशनल ड्रामा वगैरे असेलच. माझ्या या लिखाणाचा हेतू सिनेमविषयी नसून, काश्मिरी पंडितांच्या शिरकाणाबद्दल आहे. एकूण हिंदुत्ववादी गटाचा आवडता विषय म्हणजेच काश्मिरी पंडितांना सहन कराव्या लागलेल्या हाल-अपेष्टा. ज्याच्या जोरावर धर्मीय ध्रुवीकरण हमखास केले जाते. अर्थात तत्कालीन सरकार कॉंग्रेसप्रणीत होते त्यामुळे त्यांचे हे अपयश होते आणि आहे हे मान्य करायलाच हवे. ३७० रद्दबातल केल्यामुळे जो कांगावा केला जातोय आणि ज्यांच्याकडून केला जातोय ती चतुर मंडळी काश्मिरी पंडितांच्या शिरकाणाबद्दल कधीही बोलणार नाहीत. आता तर दोन पंथ मोदीभक्त आणि मोदीद्वेष्टे हे सरसकटपणे सगळ्याच क्षेत्रात झालेत. त्यामुळे सगळीकडेच आनंदीआनंद आहे. मुळ मुद्दा हा आहे जर गुजराती दंगली, बाबरी मस्जिद पतन वगैरे वगैरे घटनांचा पाठपुरावा केला जातो, या घटनांसाठी भाजपाला किंवा एखाद्या तत्कालीन जबाबदार व्यक्तीला जसे टार्गेट केले जाते तसे "मेडिया कव्हरेज" काश्मिरी पंडितांना मिळाले नाही. ना कोणत्याच सरकारने निर्वासित पंडितांच्या पुनर्वसनासाठी भक्कमपणे योजना राबविल्या. जो तो पक्ष आणि सरकारे काश्मिरी पंडितांना राजकीय फायद्यासाठी वापरत आलेले आहेत. मला तर कौतुक याचे वाटते की शोषितांच्या नावाने गळे काढणारे विचारवंत, समाजसेवक, पुरोगामी वा डाव्या विचारसरणीचे नेते कधीच पंडितांसाठी आक्रमक भुमिका घेताना दिसत नाहीत. जाहिरपणे पंडितांच्या बाजूने संघर्ष करताना दिसत नाहीत मग तर संशय अधिकच बळावतो. जुन्या गोष्टी कशाला उकरुन काढता असे बोलणारा स्युडो सेक्युलर मात्र गांधीहत्यापासूनचे सगळे साग्रसंगीत तपशील धुंडाळून उजव्या विचारसरणीच्या समर्थकांना आणि नेत्यांना आयतेच कोलीत मिळवून देतो ध्रुवीकरणासाठी. लेचीपेची आणि सोयीनुसार भुमिका घेण्यात भारतीय नेते, विचारवंत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यायाने समर्थक, विरोधक या जगात सगळ्यात जास्त भारतातच अग्रेसर आहेत. घातपात वा हल्ला झाला तर लागलीच एकमेकांच्या जातपातधर्माची चिरफाड करण्यात वाकबगार मंडळी तरबेज आहेत. माणूस म्हणून वा नागरिक म्हणून व्यक्त होणे वा विचार करणे आता दुरापास्तच झाले आहे. टँग, हँशटँग आणि ट्रोल यांच्या रडारवर लगेच येतात अशा गोष्टी. राजकीय पक्ष आता प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या झाल्यात. लोककल्याण या कधीच प्रत्यक्षात न येणाऱ्या ध्येयासाठी सर्वपक्षीय मंडळी सर्वसामान्य नागरिकांना मुर्खात काढतात. नेत्यांना, पक्षांना, संघटनांना आणि फालतू अस्मितांना अवास्तव महत्व देऊन भारतीय स्वतःच्याच अधोगतीला कारणीभूत आहेत. आतातर नवा पायंडा पाडला जातोय या देशात. वर्षानुवर्षे भिजत, रखडत, पडलेली वा ठेवलेली कामे, योजना, कायद्यातील बाबी जर लागू करायच्या असतील तर होऊ नये म्हणून उगाचच अमुकतमुक धर्माविरुद्ध वा जातीविरुध्द आहे म्हणून लोकांना भडकवलेय जातेय. आधीच भारतीय अडाणी प्रतिसादापेक्षा प्रतिक्रिया देण्यावर भर असलेला आपला समाज येनकेनप्रकारेन ज्या त्या गटातटाच्या खुंटीला बांधला जातोय. हिंसक आंदोलने, जाळपोळ आणि सुरळीत चालू असलेले व्यवहार विस्कळीत करतोय. का, कशासाठी, कोणासाठी तर केवळ कोणाच्यातरी व्यक्तीगत फायद्यासाठी, मतपेढीसाठी. हा विचका कशामुळे झालाय तर तो एकमेव कारणामुळेच ते म्हणजे नको त्या गोष्टींना अवास्तव महत्त्व दिल्याने. आपण आणि आपला समुह कोणीतरी त्यांच्या सुप्त हेतूंसाठी परस्पर वापरत आहेत याची सद्सद्विवेकबुद्धी नसावी हीच शोकांतिका आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणातील घटना बघितल्यावर एक लक्षात येते की युएसएसआर चा वाद संपल्यावर काश्मीर प्रश्न एकाएकी कसाकाय जगाचे लक्ष वेधून घेतो? मक्तेदारी टिकवण्यासाठी, दुकानदारी चालू राहण्यासाठी कोणीतरी दोन देशातील जनतेला होरपळण्यासाठी सोडून देतो आणि त्याच्यावर देखरेखीसाठी पगारदारी एजंट राज्यकर्ते नेमतो हे २१ व्या शतकातील सर्वाधिक क्रूर गोष्ट आहे. रोजगार हमीवर काम करणारे मजूर एखादं काम संपलं की दुसरीकडे रोजगाराच्या शोधात जातात तसा काहीसा हा प्रकार आहे. आतंकवादी संघटना आणि त्यांचे प्रशिक्षित अतिरेकी इकडून तिकडे ठरवून दिलेली काम करतात. काही धर्माच्या नावाखाली तर काही जागतिक व्यवसायात मक्तेदारी मिळवण्यासाठी. भीतीचे वातावरण तयार करणे आणि त्याचा आर्थिक, राजकीय सत्तेसाठी वापर करणे हेच मुलभूत धोरण लागू झालेय. त्याचे परिणाम हे सर्वसामान्य जनतेलाच भोगावी लागतायत. मग देश, राज्य कोणतेही असो. काश्मिरी लोकांच्या व्यथा ह्या ह्याच कारणामुळे चिघळल्या गेल्या. त्यामध्ये धर्माच्या एकलशाहीचा प्रासंगिक तडका आणि स्युडो सेक्युलरिझम चा बागुलबुवा आलाच. स्वतःच्याच देशात निर्वासित होण्याची वेळ आलेल्या काश्मीरी पंडितांसाठी कोणीही वाली नाही. कोणत्याही काळात राजकीय वा सामाजिक गळेकाढू आंदोलने ही कधीच जनतेसाठी नसतात. आंदोलनाचे नेतृत्व हे नेहमीच बायस्ड झालेले असते. मग राजकीय फायद्या-तोट्याची गणिते, ठोकताळे करून विभागणी होते. आजकाल तर सामाजिक माध्यमं एवढी बोकाळली आहेत की लोकांमध्ये डायव्हर्जन करणे चुटकीसरशी झाले आहे. भूतकाळातील गोष्टींचा उहापोह करण्यापेक्षा सध्याच्या काळाचे २०२० चे ज्वलंत प्रश्न आणि सामाजिक समस्या काय यावर साधकबाधक चर्चा, कृती व्हायला पाहिजे. ते होत नाही आणि आम्ही खेळणं होऊन जातो दुसऱ्यांची दुकानदारी चालू राहण्यासाठी. 
----------------------
©भूषण वर्धेकर
१० जानेवारी २०२०
पुणे
------------------------

तू बोल मराठी

तू बोल मराठी, आवेशपूर्ण अस्मितेसाठी  तू फोड डरकाळी, एकवटून शक्ती सगळी तू कर राडा, एकीचा शिकवू चांगलाच धडा तू हाण कानफटात, उमटू दे बोटं घराघर...