शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०१५

देवा तुझी कमाल आहे

देवा तुझी कमाल आहे
भक्तांचीपण धमाल आहे
राजरोस उपास आहेत
उपासनेचा वाणवा आहे

प्रत्येक वार ज्याचा-त्याचा
उर्वरीत खेळखंडोबा
उत्साही लोकांचा महापूर
चंगळवाद भौतिकवादी

खाबुगिरीसाठी धर्मदाय संस्था
सोन्या चांदीचा ढीग
पैशांचा जोर दररोज
तोंडदेखलेपणा समाजसेवांचा

भक्तीचा अलौकिक गजर
कार्यकर्त्यांच्या ताफ्यात DJ वगैरे
फ्लेक्स मात्र डोंगराएवढे
कर्तृत्वाची बंद कवाडे

ज्याचा-त्याचा धर्म, पंथ
ज्याचा-त्याचा महापुरुष
जयंत्या पुण्यतिथ्या आधी व नंतर
साप्ताहिक सोहळे सुरुच

गर्दी खेचण्याची स्पर्धा
रेलचेल करमणूकप्रधान कार्यक्रमांची
विचारवंतांचा वाणवा
बजेट सँक्शन करणाऱ्यांचा
जलसा. . मिरवणुका. . सत्कार. .

गल्लोगल्ली हीच बोंब
तरूण म्हातारे सगळे एकछत्राखाली
महिलांसाठी आघाड्या
स्त्री सुरक्षा रामभरोसे

जगात आपणच भारी
आपला महोत्सव भारी
यांतच युवा नेते  जुंपले
विचार आचार  आशय वगैरे
गतकाळापुरते राहिले

आता केवळ संख्यात्मक पाठबळ
टक्केवारी निरंतर
जात पात कागदोपत्री
लिफाफे लालफिती धुळखात

धांगाड-धिंगाचा कळस
हिशेबाचा ना ताळमेळ
खर्च बिनभोबाट
नंतर आहेच खंडणी वर्गणी वगैरे

कहर झालाय समाजात
तुटत चालले दूवे
दैनिकांची बोटचेपी भूमिका
जहिरातींसाठी हेवेदावे

महापुरुषांचा देवदेवतांचा
अजब धांडोळा
या देशी पुन्हा पुन्हा
सामाजिक परिवर्तन पाठ्यपुस्तकी
वार्षिक परिक्षांसाठी

भूषण वर्धेकर, दौंड
4-4-2015
8:15 PM

पत्र क्रमांक नऊ

आज मी असे लिहितोय या मागे केवळ एकच उद्देश आहे, तो म्हणजे माझ्या मनातील वेदना मोकळ्या होणे. तसेही ह्या बाबतीत कोणाशीच बोलू शकत नाही. गेले १५ दिवस मला कळत नाही कसली तरी अनामिक ओढ तुझ्याकडे खेचतेय. मी याला प्रेम म्हणून शकत नाही कारण ते दोन्ही बाजूने असेल तरच घडते. एरवी क्रश किंवा एकतर्फी गुंतणे असावे असे वाटते. मला नक्की आठवतेय गेले वर्षेभर मी कधीच तुला पाहून अशा पद्धतीने व्यक्त होत नसे. कारण तेव्हा तुझ्याकडे पाहून मला कसलीच हूर हूर वाटत नव्हती. मात्र जसे मी IPL सामना पाहून आलो आणि त्या नंतर एकूण माझ्या जगण्यात प्रवाहाचे वारे वेगळेच वाहू लागले. म्हणजे अगदी गेल्या १५ दिवसात  एकाएकी तुझ्याकडे आकर्षिले गेलोय. एरवी तू फोनवर कोणाशी बोललीस, ऑफिसमध्ये कोणासोबत बोललीस, अगदी मित्रत्वाच्या नात्याने तरी मला काहीच वाटत नसे. मात्र गेले १५ दिवस तुला पहिले की फारच हूर हुर ,धडधड आणि हात पाय कंप पावतात. तुला कोणासोबत बोलताना पाहून फार बेचैन होतोय. कदाचीत खूप खोलवर जाऊन तुझा असा लाईफ पार्टनर म्हणून मी विचार केलाय का? कळत नाही.  कारण मला अफेअर वगैरे आवडत नाहीत चिरकाल टिकणारी नाती आवडतात. आणि महत्वाचे म्हणजे माझ्या मनातील माझी बायको कशी असावी त्या फ्रेम मध्ये तू अगदी तंतोतत बसतेस. अजून गुंतून पडून  त्रास होऊ नये म्हणून लागलीच काही गोष्टी स्पष्ट करतोय. का कुणास ठाऊक तूच का ती मुलगी असावीस वाटते माझी लाईफ पार्टनर म्हणून.. असो मी जास्त लिहित नाही उगाच महाकाव्य वगैरे लिहायचो तुझ्यावर.... तू जर कमिटेड असलीस तर प्रश्नच येत नाही माझ्या या भावनिक गुंतागुंतीचा. मात्र तुला जर माझ्याबद्दल काही वाटत असेल तर नक्की सांग कृपया या पत्राचा गैरार्थ घेऊ नकोस. मला फारच त्रास होत आहे म्हणून हे पत्र तुला पाठवतोय. प्रत्यक्षात बोलायचे होते. पण  खूप घाबरतोय प्रत्यक्ष बोलायला. पण माझे असे लिखित का होईना तुला कळणे गरजेचे वाटले म्हणून हा पत्रप्रपंच.  तुझ्यात खूप गुंतून पडू नये यासाठीच हा प्रयत्न. नाहीतर उगाच त्रास होतो. तुझे जे उत्तर असेल ते स्वीकारायला माझे मन तयार आहे. कधीतरी वेळ मिळाला तर भेटून यावर सविस्तर बोलूच. पण काही म्हण कदाचित तुला माझा हा मूर्खपणा वाटेल पण मला तुझ्याशी बोलायला आवडेल. उगाच मनात एक भाव ठेऊन तुझ्याशी इतरांसारखे खोटे बोलता येत नाही. जे आहे ते स्पष्टपणे बोलणारा व लिहीणारा माणूस आहे मी. मग कोणाला राग येवो अथवा न येवो मला त्याचे काही देणंघेणं नाही. तुझ्यासोबत एक बोलायचं आणि तुझ्या मागाहून तुझ्याबद्दलच वेगळं बोलायचं असा तोंडपुजलेपणा मला जमत नाही आणि जमणं अशक्य आहे. अमुक कोणाला चांगलं वाटेल वाईट वाटेल म्हणून माझं अभिव्यक्त होणं मी सिमित करू ईच्छित नाही. तुला माझ्या या पत्राने काय वाटेल यापेक्षा माझं व्यक्त होणं मी महत्वाचे मानतो. तू याची दखलच घ्यावीस असा माझा अट्टहासदेखील नाही. एकूणच आजकाल तुला अमेरिकेतून फोन येतो आणि तो आल्यावर तुझं कामात दुर्लक्ष होतं यावर सध्या उगाच गॉसिप चालू आहे. तुझ्यासमोर एक बोलणारे माझ्यासमोर मात्र तुझ्याबद्दल वेगळंच बोलतात. याची मला चीड पण येते आणि अशा लोकांची किव पण येते. मनातून झूरत असल्याने कदाचित असा तुझ्याबद्दल त्रास होत असावा. एकूण मेंदूत अशा काही रासायनिक अभिक्रिया होतात ज्यामुळे आवडणाऱ्या व्यक्तीबद्दल अशी हूरहूर वाटणं सहाजिकच आहे. हे सगळं नैसर्गिक आहे. आकर्षण आहे की एकतर्फी प्रेम हे तुझ्याशी बोलूनच स्पष्ट होईल. अर्थातच तुझी इच्छा असेल तरच. तुझ्या नकाराधिकाराचा मी निश्चितच आदर करेन. होकार किंवा नकार हे निष्कर्ष माझ्या दृष्टीनं महत्त्वाचे नाहीत. आत्ता जे जगतोय, जे अनुभवतोय याची मला जमेची बाजू वाटते. मानवी संवेदना कधी उफाळून येतील याचा काही नेम नाही.  त्यात कळत नकळतपणे तुझ्याकडे ओढला गेलो याचं मला नवल वाटतं. एकाएकी कोणाविषयी तरी असं वाटणं स्वाभाविक आहे. पण तसंच मनात ठेवणं आणि नंतर बोलायला पाहिजे होत अन् तसं करायला पाहिजे होतं असं घुसमटीत अडकण्याला काही अर्थ नाही. तुझ्याबद्दल मला अत्यंत आदर आहेच. तटस्थपणे विचार करणारी तू मुलगी आहेस हे मी जाणतो. तुला माझ्याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यासाठी मी असं लिहीत नसून माझं आत्मगत तुजबद्दलचं लिहीत आहे. एक माणूस म्हणून व्यक्त होणं याला प्राध्यान्य मी देतो. चूक की बरोबर ज्याचं त्यानं ठरवावं हे माझ्या जगण्याचं तत्वज्ञान आहे. तू एक सुस्वभावी सून म्हणून माझ्या घरात नक्कीच सामावशील. मी कुटुंबव्यवस्थेवर निस्सीम श्रद्धा असलेला मनुष्य आहे. लग्नासाठी मन जुळावी लागतात त्यात तुझ्या लग्नाची बोलणी, मुलं पाहणं वगैरे घरी चालू आहे असे कळले म्हणून असा खटाटोप करतोय. माझ्याबाबतीत सकारात्मक जर विचार केलास तर माझी निवड करून चूक केली अशी खंत तू उभ्या आयुष्यात तुला होऊ देणार नाही याची हमी मी देतो. उगाच हिरोगिरी म्हणून मी हे बोलत नाही तर जे चांगले करेन ते केवळ तुझ्यासाठीच करेन आणि तुला कसलेही दुःख होणार नाही याची जीवापाड काळजी घेईन. असो हा जर तर चा मामला आहे. तसही या जर तर वरंच माणसाचं सगळं आयुष्य अवलंबून असतं. योग्य वेळी व्यक्त होऊन मन पाण्यासारखे स्वच्छ असावे. उगाच नंतर हुरहुर वाटून काय उपयोग?  एकूण मी जगण्याकडे प्रवाही पद्धतीने पाहतो. यथार्थपणे आस्तित्ववादाशी माझ्या जगण्याची नाळ जोडली गेली आहे. असो मी माझं जगण्याचं तत्वज्ञान सांगण्यासाठी हा पत्रप्रपंच करीत नाहीए. लौकिकार्थाने माझ्या मनातील माजलेलं काहूर शांत करण्यासाठी असं लिहू लागलोय. सर्वार्थाने तुझ्या बाबतीतच मला का असे वाटू लागलेय याचे मला कमालीचे आश्चर्य वाटते बुआ! वय जसं वाढत जातं पसं आपण एकाकी आहोत अशी उगाच एकल जाणीव होऊ लागते. अन् तसंही गद्यपंचवीशी उलटल्यावर संसार लगन याकडे नैसर्गिकपणे आकर्षिले जातोच मनुष्य! त्यात एक सामाजिक व कौटुंबिक जाणीव असतेच. अखेरीस तारूण्यसुलभभावना ह्या असताततच की? अशा मनस्थितीत तुझ्याकडे आकर्षित झालो एवढेच! यात काही मला गैर वाटत नाही. आणि एक महत्वाचे मला सांगायचे आहे की आपण एकाच गावातील असल्याने तुझ्या कुटुंबियांना माझे घरातले बऱ्यापैकी ओळखतात. जर तुला माझ्याबद्दल खरंच काही वाटत असेल तर मी रीतसर लग्नाची मागणी घालायला तयार आहे. माझ्या घरातल्यांना तू पसंत पडणार हे नक्की! शिवाय सध्या माझ्या लगनासाठी मुली पाहणे वगैरे सुरु होईलच. तुझी हरकत नसेल तरच ह्या गोष्टी पुढं नेता येईल. एकंदरीत आयुष्याची गंमत आहे बघ एरवी लगनाचा विषय निघाला की मी टाळाटाळ करतो. पण तू जशी मला आवडू लागलीस तशी लग्नाळू स्वप्नं पडू लागलीत!तसा त्यात एकतर्फी रमलोय सुद्धा ! मजेशीर आहे बाबा हे आयुष्य ! कलाटणी देणाऱ्या घटना कधी घडतील याचा काही नेम नाही. कदाचित मी भावूक झालोय यामागे आपण गाववाले आहोत हेही कारण असू शकते. कारण एकाच गावाशी निगडीत असल्याने लाईफ पार्टनर बद्दल असणारी असुरक्षितपणाची भावना तुझ्याबाबतीत राहिली नाही.  नाहीतरी हल्ली जो तो असुरक्षित मानसिकतेचा बकरा बनलाय.  माझा जोडीदार कसा असेल, त्याच्या कसल्या भानगडी वगैरे तर नसतील ना, तो स्वभावाने कसा असेल असे एक ना अनेक मध्यमवर्गीय प्रश्न सगळ्यांनाच पडतात. त्यातून मी ही सुटलेलो नाही.  जेव्हा तुझा विचार करतो तेव्हा वेगळ्याच रोमॅन्टिसिझममध्ये असतो मी! का कुणास ठाऊक असे मी आजवर कधी अनुभवले नव्हते. तसा माझा भविष्यावर विश्वास नाहीए. पण हल्ली रोज भविष्य वाचण्याचे वेडगळ प्रकार चालू आहेत.  कुठेतरी मनपसंत जोडीदार मिळेल असं वाचलं की सातवे आसमानपर असतो मी!! तसा हा वेडपटपणाच आहे हा. पण शेवटी माणूस म्हटलं की असं होतं असतेच. कोणी याला नावे ठेवतो तर कोणी टाळत असतो. मी मात्र या जगण्याचा मनापासून आनंद घेतोय! रोज नवे कपडे घालून येतोय. पहिल्यांदाच असं प्रेझेंटेबल राहतोय. असो माझ्यात होणारे बदल हे मला चांगलेच लक्षात येऊ लागलेत. जगण्याची मौज अनुभवतोय ! नियतीने काय वाढून ठेवलंय हे काही कोणीच सांगू शकत नाही. मनासारखं घडलं तर आनंदाने जगायचं अन् नाही घडलं तर त्रयस्थपणे जगण्याकडे पाहत पुढं जायचं या पलीकडे जाऊन आपण काही करू शकत नाही. जे आहे ते तसंच आहे असं स्विकारून जगण्याचे मौलिक जाणणारा मी एक मितभाषी माणूस आहे. अशी माझ्या जगण्याची स्पंदनं आहेत असं म्हण हव तर ! काळाच्या पुढे नतमस्तक होऊन त्याच्यानुसार होणाऱ्या बदलांशी समन्वय साधून आजवर जगत आलोय. आयुष्याकडे खूप सकारात्मकतणे पाहतो मी. असो एवढेच सांगतो की एकदा विचार करून तर बघ  निराश तुला कधीच होऊ देणार नाही.  तुझ्यासाठी मी एक अखेरची संधी नक्कीच असेन. डिअर ईज अ पर्सन हू गिव्ह्स लास्ट चान्स अगेन ऍण्ड अगेन
तुझा होण्याची वाट पाहत बसलेला  एक...  एकटा... एकलकोंडा...
1 मे 2015 

पत्र क्रमांक सहा

अनाहूत असे पत्र लिहितोय त्याबद्दल क्षमस्व !
सर्वप्रथम हे जाहीर करतो की, प्रस्तुत लिखाण म्हणजे रुढ अर्थाने प्रेमपत्र वा तत्सम कसलाही प्रकार अजिबात नाही. केवळ माझ्या मनातील भावनांना मोकळी वाट करुन द्यावी या साठी केला गेलेला हा पामर प्रयत्न आहे.

एक महत्वाची बाब मला विशद करावीशी वाटते की मी हे असे पराक्रमी लिहून तुझे मन वळविण्याचा  किंवा माझ्याबद्दल विचार करण्यास परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत नाही.. वा तसा तुला विचार करायची गरजच नाही. तू तेवढी करारी आणि बाणेदार आहेस.. ( अरे हो की हाही गुण मला तुझा भावला होता!) तुला माझ्या केवळ शुद्ध भावना कळाव्यात हाच एकमेव हेतू ह्या लेखणात आहे...

आजवर जे काही दोन आठवड्यात घडले वा नकळतपणे घडवले गेले ते विलक्षण होते. एकूणच माझ्या हातून जे घडले ते कसे वा का घडले? ते अजून मला उमगत नाही. आजवर असे भावनाविवश वगैरे होणे मला पहिल्यांदाच  भावतेय. कारण मी स्वतंत्र विचार करणारा समाजशील प्राणी आहे. माझ्या जगण्याच्या आखीव-रेखीव अशा पाच मिती आहेत. वाचन -लेखन-मनन-चिंतन-सूक्ष्म निरीक्षण. या सर्वांचे प्रवाही सिंहावलोकन म्हणजे माझे जीवन.

एकूण मौज आहे बरं का? कोणी एक मुलगी माझा  असा मानसिक कल्लोळ करेल असे मला स्वप्नात देखील वाटले नव्हते. मुळात मला आजवर ज्या मुली आवडल्या त्यांच्यापाशी मी अशाप्रकारे कधीच व्यक्त झालो नाही. कारण मध्यमवर्गीय संस्कार !!!! आजकाल सभोवतालचे वातावरण खुप बदललेलं होतं. तुला सांगितलेलेच आहे की घरी माझ्या लग्नाचा विचार चालू आहे. मग काय, चर्चा , गप्पा, टोमणे सगळे कसे मजेत रमले... त्यात १ जुलैला मी रात्री जिलाटो इटालिनो मध्ये आल्यावर नकळतपणे तुला पाहून जरा वेगळेपणा वाटला.. थोडेसे अंतर्मनात डोकावले व माझ्या घरात साजेशी, सोज्ज्वळ, सुसंस्कृत अशी व्यक्ती - माझी पत्नी म्हणून तू म्हणून यावीस असे वाटले. अर्थात मला प्रेम भानगडी वगैरे तकलादू प्रकार अजिबात रुचत नाहीत. वा त्याबद्दल मला फार राग आहे. असे प्रकार म्हणजे केवळ वरवरची गरज भगवण्याचे सोपस्कर आहेत- मग ते शारिरीक असो वा मानसिक.

मला तुझ्याशी लग्न करायचे या सभ्य हेतूने मी ११ जुलैला "तसे" व्यक्त झालो. म्हणजे हल्लीच्या भाषेत प्रपोज केले. अर्थात लग्नासाठीच. मात्र त्यावेळी पुढे माझी एवढी अतोनात घुसमट होईल असे तिळमात्र वाटले नव्हते. का कुणास ठाऊक डोळ्यात मला चक्क होकार दिसला होता. त्यात मी गणपती मंदीरात बोलवले की तू आलीस. मला वाटले सगळे कसे मनासारखे होतेय... त्यात तू विचार करुन सांगते म्हटल्यावर मला तोळाभर  मांस चढले. मला वाटले की तू होकरासाठी विचार करायला वेळ घेतला.  मला तुझ्याबद्दल काही फिलिंग्स नाहीत असे त्याच वेळी सांगीतले असतेस तर पुढे होणारा माझा एवढा मानसिक त्रास वा वैचारिक कल्लोळ तरी वाचला असता...
असो  मला तुला प्रतिप्रश्न करायचा किंचीतही अधिकार नाही. मुलींच्या मनात काय चालते याचा ब्रम्हदेवाला सुद्धा सुगावा लागणे शक्य नाही त्यामुळे मी विचार करणे म्हणजे करंटेपणाचे ठरेल. एकूण मी आजवर मोकाटपणे जगलो. व्यासंगी म्हणून वावरलो. स्वत:च्या जगण्याच्या व्याख्या मीच करून मौजेने फिरलो. सुख-दु:ख, आर्थिक चणचण वगैरे क्षुद्र गोष्टींचा त्रास आनंदाने सहन केला. मात्र ’असा’ त्रास सहन करणे माझ्या परीने फार जिकरीचे आहे.. म्हणून हा लेखन प्रपंच....

एकूणच कुतरोड होऊ लागली की माणूस विलक्षण निराश होतो. अगदी तसेच माझे होत असावे. मी  कुटुंबसंस्था मानणारा आहे.त्यात लग्न ही पराकोटीची, मांगल्याची, सोळा संस्कारातील महत्वाची घटना आहे. मला माझ्या भावी सहचारिणीमध्ये जे गुण, स्वभाव हवे होते ते तुझ्यात दिसले. हीच सुरुवात तुझ्याकडे आकर्षिले जाण्याची. कारण मला आकृष्ट करण्याजोग्या ज्या काही बाबी आहेत त्या तुझ्यात ओतप्रोत आहेत....त्यात माझ घर धर्मिक, सणासुदीचं प्रचंड जोपासना करणारे.. त्यात जुलै ऑगस्ट  महीने सुरु झाले की (मराठी महिन्याप्रमाणे श्रावण सुरु झाला की) माझे मन फार एकाकी असल्याचे जाणवते... कोणीतरी आपले असावे याची हुरहुर फार वाटते.आणि नेमके याच दिवसात महाविद्यालये सुरु होतात. त्यातून मी पुण्यामध्ये शिकलेला मुलगा... तिथे ज्या मुली पाहण्यात आल्या त्याबद्दल मी आता काही सांगू ईच्छित नाही.. यावर किमान मी एक प्रबंध लिहू शकतो .. एवढा माझा अभ्यास आहे.... असो... त्यामुळे तुलना करायची झालीच तर तू त्यांच्यापेक्षा फार वेगळी आहेस... सालस, सभ्य, सुसंस्कृत, घरगुती वगैरे वगैरे.. म्हणून मला तुझ्याकडे एक विलक्षण जागृत ओढ वाटली... कदाचित यालाच प्रेमाची सुरुवात म्हणत असावेत... एकतर्फी
तुझ्याबाबतीत मी तुझ्या नकाराधिकाराचा कधीच विचार केला नाही. मला तू आवडतेस म्हणजे मी तुला आवडायला पाहिजेच असे काही नाही. हा दुधखुळा विचार मी केला.तसंही हे एक छान झाले माझ्या भ्रमाचा भोपळा फुटला योग्यवेळी....  कारण आजवर माझा असा भ्रम होता की मुली मुलांचा विचार करताना त्याचा स्वभाव, कौशल्ये, विश्वास व कुवत पाहतात. या सर्व गोष्टी माझ्याकडे आहेत... पण असुरक्षितता आहे ती पैसा..अडका..घर.. गाडी वगैरेची...
या व्यवहारी जगात असा सो-कॉल्ड विचार करने स्वाभाविक आहे.. शिवाय माझ्याबद्दल जर तुला काहीच वाटत नसेल तर ईतर बाबींचा तपशील व्यर्थच म्हणावा लागेल.... त्यात तुझा जो निर्णय आहे तो मला शिरसावंद्य ! उगाच तुझ्या मागे पुढे करून तुझे मन वळवायला ना तुला आवडणार अन् माझ्या तत्वात असे अवास्तव नाही बसत.

मुळात  भावना ही मनाच्या केंद्रस्थानी असते तीच तुला नाही तर मी कितीही प्रयत्न केले तरीही काही उपयोग नाही. हे सगळे सिनेमामध्ये चालते... आणि मी आयुष्याकडे खूप प्रॅक्टिकल म्हणून पाहणारा आहे.. मला वास्तववादात जगायला आवडते... कारण  माझ्या एकूण सामाजिक जाणीवा आणि बौध्दिकं वास्तववादाच्या जवळीक साधणारे आहे... असो... जड लिहायला नको... उगाच साहित्यिक अंगाने लिहू लागायचो...

कारण मला अजून समजत नाही की तुझा नकार मी का पचवू शकत नाही? मला तुझ्याशिवाय दुसरी कोणी भावेल असे आत्तातरी वाटत नाही.. किंवा एकदा दुधाने तोंड पोळले तर ताकसुद्धा फुंकुन प्यावे लागते.. अशा प्रकारे मी पुन्हा असे प्रयत्न करीन मला वाटत नाही. किंवा मी तुला गृहीत धरले... तुझे कोणीतरी असेल वा घरगुती अडचणींमुळे तू नकार देत असावीस असा विचारच मी कधी केला नव्हता.. आज असे लिहिताना मला प्रकर्षाने जाणवतेय... असो... काहीतरी हरवल्यागत झालेय.. परीक्षेत बसण्याआधीच नापास झालोय. अशी हृदयद्रावक अवस्था झालीये.

कारण मी तुझा खुप खोलवर विचार केला होता... तुझ्याकडे बौद्धिक, वाचिक असे सर्व काही पक्के दुवे मला आढळले होते.. आणि ते तुझ्यात पुरेपूर आहेत...  ते मला भविष्यात एक सहकारी म्हणून उपयोगी पडणारे आहेत.. नाटक.. सिनेमा... महितीपट.. साहित्यविषयक वगैरेंसाठी... त्याच स्वप्नात मी रमलो होतो.. मनाचे ईमले रचू लागलो होतो... मनसुबे आखू लगलो होतो.. तुला माझ्या सारखा मिळणार नाही अश्या भ्रमात राहीलो होतो...तुझ्या आजपर्यंच्या माझ्यासोबतच्या वागण्याचा, बोलण्याचा हसण्या-खिदळ्ण्याचा वेगळाच गैरसमज केला होता ... असो...
आता मला काहीतरी सांगायचे आहे ते लिहितो... माझ्याबद्दल तुझ्या मनात जे स्थान होते ते मी कायमचेच गामावून बसलोय... व पुन्हा ते मला मिळणार नाही... याची मला पुर्ण खात्री आहे. तरीही माझे तुझ्या बाबतीत असे का व्हावे... त्यबद्दल केलेल्या चिंतनातून...मननातून असे लिहिते झलोय... माझी निवड ही नेहमीच सर्वोत्कृष्ट असते.. आणि ती मला प्राप्त झाली की सर्वश्रेष्ठ होते...... एकूणच मला जिच्यामुळे आयुष्यात असा पहिल्यांदा त्रास झाला तिला हे कळावे की मी कसा आहे हाच सभ्य हेतूने ह्या लिखाणाचे शिवधनुष्य पेलले आहे. एक नमूद करतो की ह्या लेखनाद्वारे मी माझी सालंकृत बाजु मांडू ईच्छितो...
एकतर मी माझे आत्मचरित्र वगैरे सांगणार नाही.. कारण मला आत्मचरित्रापेक्षा चारित्र्य महत्वाचे वाटते... चारित्र्याला चिंतनाची जोड असेल  आणि वैचारिक बैठक पक्की असेल तर सर्व गोष्टी पाण्यासारख्या स्वच्छ दिसतात. तसेच माझे आहे...

तुझ्या मनात माझेविषयी जे काही कडू गैरसमज आहेत.. वा हीनपणाची भावना आहे ती कशी चूक आहे हे प्रस्तूत लिखाण वाचल्यावर कळावे.. हीच रास्त अपेक्षा... मी एक कलंदर माणूस आहे. व्यक्त होताना पराकोटीचा सच्चेपणा बाळगतो.. कसलीही पर्वा करत नाही...तुला काही बाबी विशद करायच्या होत्या म्हणून हे असे लिहितोय... बोलून सुद्धा या भावना व्यक्त होतील मात्र तुला पाहीले की माझी प्रचंड घुसमट होते.. फार त्रास होतो... बोलणे शक्य होत नाही.. हात-पाय थरथर कापतात... म्हणून असे लिहितोय...मी तुझ्याबाबतीत कधीच फालतू विचार केला नव्हता..आणि कदापि करणारही नाही... केवळ एक समजूतदार सहकारी म्हणून मला तू हवी होतीस.. त्यासाठी मला तुझ्याशी चर्चा, गप्पा करायच्या होत्या... अर्थात हे सर्व तुला सांगितले आहे... उगाच मनात एक भाव ठेवून मला बोलायला अजिबात आवडत नाही... जे आहे ते स्पष्टपणे.. निर्भिडपणे... बोलणारा माणूस आहे मी... ओठात एक पोटात दुसरे. असा दुटप्पी पणा मला सहन होत नाही.. मात्र हा अस एकतर्फी विचार करताना हे साफ विसरलो की तुझ्याही काही भावना असतीलच की... एकंदरीत व्यवहार्यपणे तू माझा विचार का करावास.?

एक तर मी इंजिनिअर नाही.. स्थायिक नाही.. घर-दार, पैसा-अडका यांची भ्रांत आहे... फार देखणा नाही ... व सर्वात महत्वाचे म्हणजे मुलींच्या नजरेत भरावा असा रुबाबदार पण नाही ... मला तू का हवी होतीस याचे एकमेव कारण म्हणजे तू माझ्याच जातीतली आहेस आणि दुसरे महत्वाचे  तू एक इंजिनिअर आहेस. तसा मी जात-पात मानत नाही. मात्र लग्नामुळे दोन कुटुंब जोडली जातात.दोन समान संस्कारातील, चालीरितीतील कुटुंब एकत्र होण्यासाठी जातीला प्राध्यान्य दिलं गेलं पाहिज. असो यावर जास्त लिहित नाही उगाच भरकटले जाईन. असो.

माझी इंजिनिअर होण्याची फार इच्छा होती.. मात्र बारावीनंतर प्रवेश मिळून देखिल मला आर्थिक अडचणींमुळे इंजिनिरींगला जाता आले नाही... ते माझे आयुष्यातील फार वाईट दिवस होते अजुनही गहीवरून येते तुला आता काय सांगू शिकण्यासाठी... म्हणून मी किती उपद्व्याप केलेत... असो खुपच आत्मचरित्रात्मक लिहू लगलोय..तर याकरीता मला माझी बायको इंजिनिअर हवी होती... असो आता हे कायमचेच दीवास्वप्न झाले..
बाकी काय सांगावे...गेली १० - १२ वर्षे मी पुण्यात फार मोकाटपणे वावरलो... मात्र तत्त्वाने जगलो.. मला जे आवडेल, मनाला रुचेल व आत्मिक समाधान मिळेल असेच जगलो...उगाच जगच्या प्रवाहात मिसळून गेलो नाही... मध्यमवर्गीय कुबटलेपणातून बाहेर पडलो.. चौकटीबाहेरचा विचार करु लागलो... उगाच जगाच्या प्रवाहात मिसळून गेलो नाही.... कदाचित याच कारणांमुळे मी मागे राहीलो.. बाकीचे माझ्यासोबतचे फार पुढे गेले... मी मात्र अजागळपणे जगण्याचे अर्थ शोधीत बसलो..

मला मात्र याची पर्वा नव्हती की  खंत  नव्हती... आता मात्र खेद वाटतो... कारण व्यवहारी जगात स्वप्नाला गवसणी घालण्यासाठी झुंजणाऱ्याला जिन्याखालचा अंधार मिळतो.... असो.प्रारंभी सांगावेसे वाटते असे की मला तुझ्याबाबतीत असे कसे एकाएकी जाणवू लागले, आज मागे वळून पाहताना कळते की, तुझ्याबाबतीत जेव्हा गॉसिप होत असे.. एकूणच... जुलै महीन्यात मला मनातून कसंनुसं होई. का कुणास ठाऊक.. कारण आपल्याला आवडणार्‍या व्यक्तीविषयी जेव्हा असे प्रकार कानावर पडतात तेव्हा... असे होत असावे... कदाचीत तुझ्यात गुंतण्याची सुरुवात इथूनच झाली असावी... तारुण्यसुलभभावना ह्या असतातच की... असो... मुळात तुझ्या बाबतीत मला नंतर एवढा त्रास होइल असे स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते... शपथ घेउन सांगतो... मला आयुष्यात असे अनुभव पहील्यांदाच आले आहेत... तू अशी एकमेव मुलगी भेटलीस की जिच्यामुळे माझे मन जेवणात रमत नाही की झोपण्यात रमत नाही... असे कसे व्हावे याचा अचंबा वाटतो...कदाचित तू माझा जेव्हा त्या दोन दिवसात विचार केला असल्यास.. तुला जे तुझ्या पार्टनरमध्ये स्वभाव गुण, सुरक्षितता वा अनेक अशा गोष्टी त्या माझ्यात दिसल्या नसाव्यात.... वा मी तुझ्या लायक नसावा...किंवा तुझ्या काही अडचणी असतील .. असे एक ना अनेक प्रकारे विचार मंथन मी केले.. करतो आहे... असो... असे माझे अनेक विचारांचे खंडन-मंडन अविरतपणे चालूच राहते..... लेखक बनण्याची फार हौस आहे म्हणून...एक मात्र खरे आहे की मला तुझा नकार फारच जिव्हारी लागला आहे.. वेदना तीव्र होताहेत… आपण कोणालातरी आवडत नाही याची जाणीव मनाला चटका लावून गेलीये... असो
मी मुलींच्या भावविश्वावर काही लिहीणार नाही.. हा माझ्या आवडीचा विषय आहे... एकूणच वैष्यम्य वाटेल तुला की, कोण कुठला गावठी मुलगा १५-२० दिवसात एवढा गुंतलाय....? कारण मी सच्चेपणाने प्रेमात पडलोय.. एकतर्फी.. म्हणून हा अजब खटाटोप.. कारन आवडतेस असे सांगितल्यावर तू चक्क प्रपोजल समजून नकार दिलास... आता तर प्रेमात पडलो असे सांगण्यासाठी काय करू... असो.. एरवीच मी तुझ्या मनातून सफ उतरलो आहेच आहे.. हे असे लिहून तुला वाचायला देवून अजून तिरस्कार ओढवून घेइन... मात्र माझ्या मनातील विचार तुला लिहून दाखवण्याखेरीज कोणताही पर्याय  मजजवळ नाही... असो... आजवर मी तुझा खूप खोलवर विचार केला.. तोही एकमार्गी... कारण मी पुढे-मागे पुण्यातच स्थायिक होणार आहे. तुझ्याबद्दल अतिटोकाचा विचार केला सर्व बाबींनी... मश्गूल झालो होतो... मात्र एक चुकलो तुझ्या बाजूने विचार केलाच नाही.. मगाशीच लिहीले आहे... की मी तुला गृहीत धरले होते..मला वाटले तू पैसा, घर-दार, सो -    कॉल्ड सेटल्ड वगैरे... न पाहता केवल माझा स्वभाव, सुसंस्कृतपणा पाहशील.मला मुली अशा बाबतीत कसा विचार करत असतील याची कल्पना नाही.  असो...तुझ्या जागी तू बरोबर माझ्या जागी मी... मला याचा खेद वाटतो.. तुला माझ्याबाबतीत काहीच फिलिंग्ज  नाहीत असे तू आज मला बाल्कनीत सांगितलेस...आणि मी पण तुला बळजबरीने माझा विचार कर म्हणून सांगू शकत नाही.. कारण प्रत्येकाला स्वतःचा नकाराधिकार असतोच आणि तो त्यांनी त्याचा योग्यवेळी वापर करावा असे मानणारा मी आहे. तुझ्या नकाराधिकाराचा मी मान राखलाच पाहिजे कारण आवडणाऱ्या व्यक्तीचं हित आणि त्याचं मत हेच महत्वाचं. त्यात मी अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा पुरस्कर्ता आहे. असो......

बैठकीची लांबी फारच वाढली आहे...मी तुझ्या बाबतीत खुप अपेक्षा ठेवून बसलो होतो.. हे साफ विसरलो की अपेक्षा ही भ्रमनिरास होण्याची पहिली पायरी आहे...उगाच मनसुबे रचून, मनचे इमले रचून काही होत नाही... जे आहे ते असेच आहे.. आणि ते तसेच राहणार... मी काही सिनेअभिनेता वगैरे अजिबात नाही.. कुछ भी करुंगा लेकीन तुझे हासिल करके रहुंगा.. वगैरे सिनेमात छान दिसते... वास्तवात नाही... मी मात्र फार निराश झालो आहे.. मला आता वाटत नाही की मी कोणच्या तरी पुन्हा प्रेमात पडेन.. कारण प्रेम हे एकदाच होत असते.. नंतर केवळ त्याची पुनरावृत्ती  होत असते. आडजेस्टमेंट म्हणून जगणे सुरु होते.. नंतर तेच हळूहळू आवडू लागते.... असो... एक मजेशीर गोष्ट नमूद करतो.. तुझ्या नकारामुळे मला माझ्यातली विलक्षण सहनशक्ती गवसली आहे. आणि ती जोपासली जातेय... हाही अनुभव जगण्यात येणे होते म्हणून असे सगळे घडले असावे.. असे मानून पुढे जायचे... आता जास्त काय लिहावे तुर्तास एवढेच लिहून थांबतो... वाचल्याबाद्दल धन्यावाद...
22 जुलै 2012

पत्र क्रमांक सात

क्षमायाचना करण्याजोगे
सभ्य अपुले नाते असावे
त्यात मनातून खचून
उतरलेल्यांना दमडीएवढे
स्थान असावे
मैत्रीचाहि पिंड वेगळा
स्नेहसंबंधाचा धागा निराळा
त्यात गुंतणारा  भावसोहळा
तरी माफी मागावी आम्ही
एकदा म्हणून अवतरली
प्रस्तूत कविता ! ! !
कधी कधी काही कळेनास होतं. मी तुला जो मध्यंतरी त्रास दिला तो खरच “ खोटा “ म्हणून दिला की “ खरा” म्हणून दिला? असो, तो मुद्दा येथे आज मला संपवायचा आहे.जे आज मी तुला ही इमेल करतोय तीस तू ‘ लवलेटर ‘ म्हणायचे की  "दास्ताने-ए-जंग" असे म्हणायचे तूच ठरव. तसे पाहता मी एक खेडवळ भागातून आलेला मुलगा. ना माझ्यापाशी कसली कला न कसली निपुणता. ना मी अभिनय करू शकत, न मी नाच करू शकत , ना गाऊ शकत, ना कोणते वाद्य वाजावू शकत. पण सगळ्या गोष्टी करायची भारी हौस, आवड आहे, होती व असेल यात शंका नाही. कलामंडळात आलो तेव्हा फक्त एकच ध्येय होतं “ नाटक “ बाकी काही नाही. पण इथे फक्त सिनिअर्स बरोबर म्हणतील तोच कायदा? असा पाठ आहे. ते असो कलामंडळाचा विषय निघाला की नुसती वादा-वादी, चर्चा, गटबाजी, रूसवे, फूगवे हेच सर्व गिरवाव लागतं. कारण या सर्व गोष्टी मिळूनच कलामंडळ बनतं.काही गोष्टी सकारण असतात तर काही अकारण. कधी विधायक गोष्टी, कामे केली तर बक्षिसे मिळतात तर कधी “केळकर” करंडक मिळतात. पुरे आता कलामंडळाचा विषय निघाला की असेच होते, गेली चार वर्षापासूनचा इतिहास आठवतो. ते मला आज तुला सांगायचे नाही. मला वेगळेच सांगायचे आहे. आज पाठवत असलेली इमेल किमान वेलेंटाईन दिवसापर्यंत तू वाचशील अशी अपेक्षा. आज खरंच खूप रुक्ष वाटतय. गेले काही महिने खरच मी तुझ्या बाबतीत गंभीर होतो? हेच मला कळत नाही .असो पण मला तुझ्या आठवणीत रमायला मजा आला. काही एक म्हण मला, युजलेस , नावं ठेव. मला त्याचे काही एक वाटणार नही. कारण मी एक अत्यंत निष्ठुर , निर्दयी, निगरगट्ट असा मुलगा आहे. निर्लज्ज म्हणालीस तरीही काही हरकत नही. कारण सजातीय लोक एकमेकांना लागलीच ओळखतात, जाणतात(!). असो आज खऱ्या अर्थाने मी एवढा सेंटी झालोय की खरच आज मला काय झाले ठाउक नाही. गेले काही दिवस मी सातत्याने माझी रोजनिशी वाचतोय. तरी माझ्या रोजनिशी मध्ये दुसरे असणार तरी काय ? एकतर तीच रेल्वे, तेच रस्ते, जेवन, खाणं-पिणं, मित्रांचे विषय व माझे खाजगी विचार, कथा, कविता, संकल्पना, असो. पण काही वेळा मी खूपच सेंटी झालो आहे.कारण एक तर मी सायकलस्वार.कधीतरी झेडब्रीज वरून फिरताना जेव्हा युगुले प्रेमकोषात बसलेले दिसायचे, तर कधी डेक्कनला फिरताना गाड्यांवरून जाणारी युगुले पाहिली कि खुप खट्टू व्हायचो.मला एफ. वाय.. पासून सारखे असे वाटायचे की मला ही कोणीतरी जवळची आवडाणारी मैत्रीण असावी. कारण मी कोणाला मी आवडेन असे माझ्याकडे काहीही नाही, खुप न्यूनगंड यायचा. कारण आपल्याला कोणतरी आवडवं किंवा आपण कोणालातरी आवडावे यासारखी गोड आणि नाजुक भावना खुप मजेशीर आहे. त्यासाठी त्या भावनेतूनच जायला हवे नाहीतर तुम्ही शुन्य आहात. पण नाही मी ते सुख अनुभवू शकत नाही कारण आधी मी खादाडबुदला! खाणं पहिलं बाकी उसके बाद. मी कधीच कोणाशीच वायफळ गप्पा मारल्या नाहीत वा कधी टाईमपास केला नाही. अगं माझा पिंड नाही तसा. कारण माझी एककल्ली वृत्ती, माझ्या महत्वकांक्षा, माझे लिखाण, माझा अभ्यास, चिंतन , मनन. व कलामंडळातील कामे यातून कधी वेळ मिळालाच नाही. गुलछबू आयुष्य जगत आलो. खुशालचेंडू मस्त. काय करणार? प्रेम करावसे खुप वाटायचे पण माझे कौटुंबिक जीवन,मला नेहमीच साद घलते की “ तुला तुझे शिक्षण पूर्ण करून जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत”, त्यात मी नाटक करतो. हे घरच्यंना मुळात आवडत नाही. त्यामुळेच घरात वादंग मजतात. त्यात मी प्रेमप्रकरण करायला धजावलो तर माझी कत्तल ठरलेलीच ! दुसऱ्या दिवशी सकाळ मध्ये बातमी यायची “बापाकडून लेकाचा खून” असो तो काही मुद्दा नाही तुला सांगायचा! पण तसे होणार नाही. माझा कुटुंबसंस्थेवर प्रचंड विश्वास आहे. आरेन्ज मेरेज हीच फक्त चिरकाल टिकणारी आहेत. फालतू प्रेमप्रकरणं यात मला काही एक स्वारस्य नाही. ते असो.  मला ते तूला सांगायचे नाही.
मी माझी डायरी वाचतना केवळ तुझ्याच बाबतीत खुप भावविवश झालो आहे. त्यामुळेच ही इमेल तुला लिहितोय कारणा ज्या व्यक्तीमुळे मी एवढा सेंटी होतोय तिलाच कळालेच पाहिजे नव्हे तर तीला त्याची जाणीव करून देणे माझे आद्यकर्तव्य आहे.या पत्राचा मसुदा याच पायावरच टिकून आहे. माझ्या आजवरच्या आयुष्यात मी खुप मश्गुल होउन वावरलो, केलेली कर्मे, पाप्-पुण्य, या वर्गांमध्ये बसणारी असोत वा नसोत पण त्या अवस्थेतून जाताना मी खरा असतो. सभ्य प्रामाणिक असतो. माझ्या दृष्टीने कलाकारा पेक्षा त्याच्या ठायी असलेली कला महत्वाची. कारण कलाकार हा माणूसच आहे. म्हणजे सर्वसामान्य मनुष्याच्या आयुष्यात येणारे सर्व प्रसंग त्याच्या आयुष्यात येणारच नव्हे तर यायलाच पहिजेत. पण त्यातूनही तो आपल्या कलेसाठी या सर्वावर मात करतो व आपली कला जपतो. रियाजाने ती  वृद्धिंगत करतो. म्हणून तर  तो सच्चा असतो त्याच्या  कलेच्या बाबतीत. म्हणून तर मला या कलाकारांचा खुपच आदर आहे.त्यांच्या कलेचा मी रसिक साधक  आहे. कारण माझ्याकडे अशी कोणतीच कला नाही. बैलासारखे कष्ट एवढेच माझं ब्रीद. पहिल्यांदा तुला भेटलो तेव्हा तुला मी एक इतरांसारखी मुलगी समजलो होतो. पण कलामंडळातील काही नाटकांमधून, वाचिक अभिनयमधून,तुझ्यामधला कलाकार मला आकर्षित करत गेला.तुझ्यातल्या कलेचा मी चाहता बनलो.तुझा सच्चा स्वभाव मला आवडला, मी ज्या पद्धतीने तुझे सूक्ष्म निरीक्षण केले तसा मी बहुधा तुझ्यात गुंतत गेलो. असो. तुझा अभिनय, तुझे नृत्य मला भावले. खरच अप्रतिम! तसे पाहता तुझ्यासारख्या 56 मूली आहेत. पण त्यातूनही मी तुझ्यातच कसा गूंतलो काय माहित? ध्येयवादी दृष्टीकोन ठेउन मी जगणारा अचानक एका मूलीसाठी कसा काय भावूक होतोय कळत नाही.  आता मात्र डायरी वाचल्यावर ध्यानात येते की ही फेज एकाकी,  एकतर्फी होती. बरेच प्रश्न पडलेत! काही प्रश्नांची उत्तरे न मिळनेच हितावह ठरते. तर असो. माझ तुझ्यावर प्रेम आहे अशी मिळमिळित वाक्यं, बुरसटलेली विचारसरणी मनात ठेउन म्हणणाऱ्यांमधला मी मुळीच नाही. कारण अखंड गोष्टी केवळ दोनच विचारधारा आणि प्रेम. पण प्रेम हा अडीच अक्षरी शब्दसुद्धा अगदी बेहाल करून सोडतो.इथे पुण्यात आल्यावर माझ्या मनातील प्रेम विषयक प्रतिमेला तडा गेला. त्यातल्या त्यात कलामंडळात अशा काही अवास्तव घटना घडल्या त्यामुळे प्रेम का कराव हाच यक्षप्रश्न पडला.त्यानं पछाडलं. बर संगतीचा परिणाम म्हणावा तर तेही नाही.  सध्या तरी टाईमपास म्हणूनच  प्रेम करणारी आजूबाजूला मुलं मूली आहेत. मला त्यांची मानसिकताच कळत नाही. लग्नाबद्दल विचारलं तर माझ्यावर हसतात.  मी एखादीचा जीवनसाथी म्हणून विचार करतो हा माझा बुरसटलेला विचार आहे का कळत नाही. प्रचंड राग येतो मला. जाऊ दे काही खरे नाही माझे. असो. इथे अभिप्रेत एकच. माझ तुझ्यावर कोणत्या करणस्तव प्रेम आहे आता प्रेम हा शब्द वापरने जरा अवघड जातय पण नंतर सवय होइल त्याची असो. कारण माझ्या आयुष्यात मला केवळ एकदाच प्रेम व एकच लग्न करायचे आहे. एकमेव.
काय आहे की मी एकपत्नीव्रताचा पुजक आहे. माझे सगळेच विचार वेगळे आहेत तू हसशील हा वेडा प्रपोज करतोय की तत्वज्ञान सांगतोय…?
का कुणास ठाउक पण मध्यमवर्गीय जीवन जगताना आड येणाऱ्या नेभळट गोष्टी,  पांढरपेशी मुर्दाड्पणा टोचतो. कधी कधी विव्हळतो.पण शेवटी समाजाने बांधलेल्या काही गोष्टी स्विकारायच्याच. पर अपने हर अलग अंदज से । चाहे नतीजा गलत हो पर अंदाज हमेशा सही होना चाहिये, क्योंकी नतीजा बदल सकता है। बदलाव अपेक्षित है। जाऊ देत नाही मला कळत मी काय लिहीतोय ! तुला प्रपोज करतोय की तेही समजत नाही ! अनुभव नही ना! तुझ्या बाबतीत काही सांगता येत नाही(!) तुला अनेक प्रपोज आले असतील. अरे मी काय लिहितोय काही कळत नाही. इटेलेच्क्युअल .काय होतय काही कळायला मार्ग नाही! तूला सरळ जाउन सांगवे तर आपली सध्या भेट होत नाहीए!  नाही आणि हातात पैसा अडका गाडी वगैरे पण नाही.कारण मी असे करून तू मला “हो” म्हणशील असे माझ्यात काही नाही. मी फाटका माणूस; पण माझ्या मनाच्या श्रीमंतीसमोर कुबेर सुदधा नतमस्तक होईल.  माझ्या पेक्षा कैक चांगली मुलं तुला नक्कीच भेटतील! त्यात तू एक अमुर्त कलाकार आणि मी गाढवी कामे करणारा बॅकस्टेजर. माझ्या आयुष्यात हातोडी आणि खिळे या व्यतिरिक्त काय असणार आहे?
आज असे मला का होते कळत नही तुझे विचार आले की मी असाच deflect होतो ammeter आणि voltmeter मधील needle सारखा च्यायला! उपमा सुद्धा electronics मधल्याच  !!!!!!!!!!!!!
नक्की मी हे कशासाठी लिहितोय कळत नाही? कारण मी तुझ्याशी कधीच टाईमपास किंवा मजा म्हणून गप्पा मारल्या नाहीत.
आता तरी मला वाटतय की मी खरच तुझ्या प्रेमात पडलो आहे पण मला तूला एकच गोष्ट सांगायची आहे आजवर मी अनेक प्रेम करणारी मंडळी पाहिली आहेत. बहुतेक हे प्रेम तुटन्यासाठीच करत असावेत! कारणं काहिही असतात भांडण तंटे, काहिही इलॉजिकल reasons देतात, तर मग प्रेम कशासठी फक्त वेळ मारून नेण्यासाठी की टाईमपास ? तुझं प्रेमप्रकरण असेल नसेल मला त्याचे जन्माचे सोयर नाही की मरणाचे सूतक नाही.मी आजवर कधीच असं मोकळंपणे बोललो नाही की लिहिले नाही. माझी बायको, सहचारिणी तूच असावीस आज मला खुप मनापासून वाटतेय.  मला तर माझी बायको कलाकारच हवी आहे. तुझ्या सुखासाठी मी वाट्टेल ते करायला तयार आहे? पण तुला काहीही झाले तरी सोडून देणार नाही आयुष्यभर तुझ्या हिताचच विचार करेन.  हे पत्र तुला Valentine Day च्या दिवशी द्यायचा एकमेव सुप्त हेतू हाच की हे पूर्ण पत्र वाचतना तू एक क्षण जरी विचार केलास माझा तरी त्या क्षणात मी आजवरची सारं जगलो असं म्हणेन! मी प्रेम म्हणजे तपश्चर्या मानतो. असो, गेल्या वर्षभरात लिहिलेल्या डायरीतील विचारांनी प्रभावित होउन मी आज हे शिवधनुष्य उचलत आहे पाहुयात कोण जिंकतय ? सध्या तरी  हार ही माझीच आहे.
तू मला याचे उत्तर देणार नाहीस याची मला 100 टक्के खत्रीच नाही तर पक्का विश्वास आहे. कारण तू आजवर केवळ माझी हेटाळणी केली आहेस मात्र “ हेट’ मधील ‘ आळणी’ पणा काढुन टाकने व ती चविष्ट, स्वदिष्ट, रुचकर करणे मला चांगलेच जमते तर बघ विचार करून काय लिहावे फार कंटाळलो तूही वाचून कंटाळली असशील तर शेवट गोड
व्हावा…………….
चूक होते एकदा
त्रास होतो अनेकदा
चुकणाऱ्यांना फुटतो पाझर
न कळत होतो चूकांचा वापर
नसता तूझी या क्षणी सोबत
क्षमा मगतो तुला विनवत
होउद्यात नाती पुन्हा निर्मळ
गतमैत्रीसारखी सोज्ज्वळ
तुज येत नसेल माझी आठवण
आजुनही तू एक सभ्य साठवण
या साठवनीतले कितीक गोडवे
तुझ्या आन्तरिक मला ओढवे
ऊखडुन टाक सर्व दडपण
क्रंदनातून विनवतो हा
सच्चा भूषण!!!!!!
                                        
तूझा असूनही नसलेला
  9 फेब्रुवारी 2007

तू बोल मराठी

तू बोल मराठी, आवेशपूर्ण अस्मितेसाठी  तू फोड डरकाळी, एकवटून शक्ती सगळी तू कर राडा, एकीचा शिकवू चांगलाच धडा तू हाण कानफटात, उमटू दे बोटं घराघर...