सोमवार, २८ एप्रिल, २०२५

पवित्र कुराणातील काही निवडक आयातींची चिकित्सा


कुराणातील सूरह २ (आल-इम्रान) मदीना येथे अवतरली. ही कुराणातील सर्वात लांब सूरह आहे. या सूरहमध्ये ही इस्लामच्या मूलभूत तत्त्वांचे मार्गदर्शन केले आहे. या प्रामुख्याने काही संकल्पना मांडलेल्या आहेत. मुत्तकी म्हणजे जे अल्लाहवर विश्वास ठेवतात आणि कुराणचे पालन करतात. काफिर म्हणजे जे सत्य नाकारतात आणि कुराणला मानत नाहीत. मुनाफिक म्हणजे जे बाहेरून विश्वास दाखवतात, पण अंतःकरणानतून सत्य नाकारतात. यात प्रार्थना आणि संयम, दान आणि त्याचं महत्त्व, विवाह आणि कुटुंब, युद्ध आणि जिहाद यावर संदेश दिलेले आहेत. आयत-उल-कुर्सी आणि काब्याच्या उल्लेखामुळे ही सूरह आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

(English from the Sahih International translation)
Quran 2:39 (Surah Al-Baqarah)
"But those who disbelieved and denied Our signs – they are the companions of the Fire; they will abide therein eternally."

सूरह २:३९ (अल-बकरा) मराठी भाषांतर:
"परंतु ज्यांनी इन्कार केला आणि आपल्या आयतींना (चिन्हांना) खोटे ठरवले, तेच अग्नीचे साथीदार आहेत जिथे ते सदैव राहतील."

आयत २:३९ मध्ये "काफिर" अशा व्यक्तीला म्हटले जाते जो अल्लाहच्या अस्तित्वाचा किंवा त्याच्या एकत्व (तौहीद)चा स्पष्ट पुरावा असूनही जाणूनबुजून नाकारतो. अल्लाहच्या पैगंबरांना किंवा अंतिम संदेशाला नाकारतो. इस्लामच्या मूलभूत तत्त्वांवर प्रार्थना, रोझा, जकात वगैरे पाळण्यास नकार देतो. यात नेमके कोण येतात तर अनेकेश्वरवादी (मुश्रिक) म्हणजे मूर्तीपूजक, अल्लाहसोबत इतर देवतांची भक्ती करणारे. नास्तिक (एथीस्ट) जे अल्लाहच्या अस्तित्वाला पूर्णपणे नाकारणारे. थोडक्यात जो कोणी अल्लाहच्या मार्गाला विरोध करेल, त्याचा अंत वाईट होईल. नरकात जातील.

Quran 2:98 (Sahih International Translation):
"Whoever is an enemy to Allah and His angels and His messengers and Gabriel and Michael - then indeed, Allah is an enemy to the disbelievers."

सूरह 2:98 (अल-बकरा) चे मराठी भाषांतर:
"जो कोणी अल्लाहच्या, त्याच्या दूतांच्या, त्याच्या पैगंबरांच्या (विशेषतः जिब्राईल आणि मिकाईल) आणि दिवस शेवटच्या विरोधात आहे, तर निःसंशय अल्लाहही अशा काफिरांना शिक्षा देणार आहे."

कुराण सुरा आयत २.९८ मध्ये सांगितले आहे की, अल्लाह, त्याचे दूत आणि फरिश्ते यांच्यावर एकत्रित विश्वास ठेवणे आवश्यक आहे. कोणत्याही पैगंबर किंवा फरिश्त्याला नाकारणे हे अल्लाहच्या आज्ञेचे उल्लंघन आहे. म्हणजे कुराण गैर मुस्लिमांचा शत्रू आहे जे काफिर आहेत. थोडक्यात अल्लाहला नाकारण्याचा अधिकार नाही.

(English from the Sahih International translation)
Surah 2 (Al-Baqarah) Verse 191:
And kill them [in battle] wherever you overtake them and expel them from wherever they have expelled you, and fitnah1 is worse than killing. And do not fight them at al-Masjid al-Ḥarām until they fight you there. But if they fight you, then kill them. Such is the recompense of the disbelievers.

सूरह २ (अल-बकरा) आयत १९१:
"आणि जेथे जेथे तुम्ही त्यांना (काफिरांना) पाहाल, तेथे त्यांना ठार मारा. जिथून त्यांनी तुम्हाला हाकलले आहे, तिथून तुम्हीही त्यांना हाकलून द्या. कारण फितना (अत्याचार/अशांती) हा खूनपेक्षाही वाईट आहे. परंतु मस्जिद अल-हराम (काबा) जवळ त्यांच्याशी लढू नका, जोपर्यंत ते तेथे तुमच्याशी लढत नाहीत. पण जर ते तेथे लढले, तर त्यांना मारून टाका. अशीच काफिरांची शिक्षा आहे."

कुराणातील आयत २.१९१ ही बदरच्या लढाईनंतर उतरली, जेव्हा मुस्लिमांवर मक्क्यातील मूर्तिपूजकांनी अत्याचार केले होते.
प्रस्तुत आयत स्वतःच्या संरक्षणाचा आदेश देते; आक्रमणाचा नव्हे. ह्या आयतीचा अर्थ केवळ युद्धाच्या विशिष्ट संदर्भात घ्यायला पाहिजे. कारण ही आयत अत्याचाराविरुद्ध आत्मरक्षेचा हक्क देते. मग नेमकं जिहादी जी दहशतवादी कृत्ये करतात त्यावरून इस्लाम शांतता आणि न्यायाचा धर्म आहे असा संदेश दिला जाईल का?

(English from the Sahih International translation)
Quran 2:255 (Surah 2 Al-Baqarah, verse 255), one of the most famous and powerful verses in the Quran, known as Ayat al-Kursi (The Throne Verse):
"Allah! There is no deity except Him, the Ever-Living, the Sustainer of [all] existence. Neither drowsiness overtakes Him nor sleep. To Him belongs whatever is in the heavens and whatever is on the earth. Who is it that can intercede with Him except by His permission? He knows what is [presently] before them and what will be after them, and they encompass not a thing of His knowledge except for what He wills. His Kursi (Throne) extends over the heavens and the earth, and their preservation tires Him not. And He is the Most High, the Most Great."

सूरह २.२५५ (अल-बकरा) – "आयतुल कुर्सी" चा मराठी अनुवाद:
"अल्लाह! त्याच्याखेरीज कोणी उपास्य (इबादत करण्याजोगा) नाही. तो सर्वांना जिवंत ठेवणारा (अल-हय्य), सर्वांचे पालनकर्ता (अल-कय्यूम) आहे. त्याला झोपही लागत नाही आणि झोपही येत नाही. आकाशांमध्ये आणि पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व त्याच्याच आहे. त्याच्या परवानगीशिवाय कोणी त्याच्यासमोर सिफारिश करू शकत नाही. तो सर्वांच्या पुढचे जाणतो आणि मागचेही जाणतो. आणि त्याच्या ज्ञानातून कोणालाही काहीच समजत नाही, जेवढे तो स्वतः इच्छितो तेवढेच. त्याचे सिंहासन (कुर्सी) आकाशे आणि पृथ्वीवर व्यापलेले आहे आणि त्या दोघांचे रक्षण करणे त्याला कठीण वाटत नाही. तो अत्यंत महान आणि सर्वोच्च आहे."

कुराणातील आयत २.२५५ मध्ये अल्लाहच्या एकेश्वरत्वाची घोषणा केली आहे. ही कुराणमधील सर्वात महत्त्वाच्या आयतींपैकी एक मानली जाते. मुस्लिम समुदायात याला "आयतुल कुर्सी" (सिंहासनाची आयत) म्हणून ओळखले जाते. अनेक मुस्लिम ही आयत दररोज वाचतात आणि अल्लाहच्या संरक्षणासाठी ती पठण करतात. यात त्याच्या अमरत्वाचे वर्णन आहे शिवाय सर्व सृष्टीवरील त्याचे अधिपत्य कसे सामर्थ्यशाली, महान आणि विशाल आहे याचे दिव्य ज्ञान आहे. अल्लाह सर्वशक्तिमान आहे. अल्लाहच्याखेरीज कोणी उपासना करण्यास पात्र नाही. तो सर्वांना जिवंत ठेवणारा, सर्वांच्या अस्तित्वाचा आधार आहे. थोडक्यात एकेश्वरवाद हेच शाश्वत सत्य आहे. मग जर इतर धर्मीय आस्थांच्या विषयी नेमकी काय भूमिका असावी? जर काफिर म्हणजे जे अल्लाह ला मानत नाहीत त्यांनी काय करावे?

कुराणातील सूरह ३ (आल-इम्रान) मदीना येथे अवतरली असून ती इस्लामच्या प्रारंभिक काळातील सामाजिक, धार्मिक आणि राजकीय परिस्थितीवर प्रकाश टाकते. या सूरहमध्ये अल्लाहची एकता (तौहीद) आणि कुराणचे महत्व, धार्मिक सहिष्णुता, संघर्ष आणि धैर्य आणि मुस्लिमांना खरे आणि खोटे मित्र ओळखण्यास शिकवतात आणि समुदायातील एकतेचे महत्त्व सांगितलेले आहे.

(English from the Sahih International translation)
Quran 3:28 (Surah Ali 'Imran, verse 28):
"Let not the believers take the disbelievers as allies instead of the believers. And whoever does that has no connection with Allah unless you guard yourselves against them, out of caution. And Allah warns you of Himself, for to Allah is the [final] destination."

कुरआन 3:28 (सूरा आल-इ-इमरान, आयत 28) चा मराठी अनुवाद:
"विश्वासींनी अविश्वासींना आपल्या मित्रांसाठी (संरक्षक किंवा हितचिंतक) बनवू नये, विश्वासस्थानांवर (मुसलमानांना) सोडून. जो कोणी असे करेल, त्याला अल्लाहकडून कोणतेही सहाय्य मिळणार नाही. परंतु जर तुम्ही त्यांच्यापासून सावध राहिलात (धोका टाळण्यासाठी) तर वेगळे आहे. अल्लाह तुम्हाला स्वतःच्या (शिक्षेबद्दल) सावध करतो आणि अल्लाहकडेच परतावा आहे."

कुराणील ३.२८ आयतानुसार मुस्लिमांना इस्लामशी शत्रुत्व असलेल्या लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवण्यास मनाई आहे, जे मुस्लिम समुदायाला धोका देतात. काफिर लोकांना मित्र म्हणून स्वीकारू नका, जो कोणी असे करेल, त्याचा अल्लाहशी काही संबंध राहणार नाही. असा स्पष्ट इशारा दिला आहे. जर कोणी इस्लामचा विरोध करून मुस्लिमांना हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असेल, तर अशांशी एकात्मता निषिद्ध आहे. म्हणजे गैर मुस्लिम काफिर असतात हे बाळकडू पाजण्यासाठी शिकवण कारणीभूत असेल का? मुसलमानांनी आपली निष्ठा, आपला विश्वास फक्त मुसलमान आणि अल्लाह ला मानणारा जो असेल त्यावरच असावी. मुसलमानांनी काफिरांना आपले मित्र, बनवू नये, जे इस्लाम विरुद्ध षड्यंत्र रचतात. असे करणारा व्यक्ती अल्लाहच्या मार्गापासून दूर जातो. थोडक्यात मुसलमान सोडून इतरांना तुम्ही आपले मित्र बनवू नका. एकी फक्त स्वधर्मियांशीच करा.

(English from the Sahih International translation)
Quran 3:62 (Surah Ali 'Imran, verse 62) is as follows:
"Indeed, this is the true narration. And there is no deity except Allah. And indeed, Allah is the Exalted in Might, the Wise."

कुरआन ३:६२ (सूरा आल-इ-इमरान) चा मराठी अनुवाद:
"निःसंशय हा (ईसा मसीह यांचा संदर्भ) खरा सत्याचा इतिहास आहे. अल्लाहाखेरीज दुसरा कोणीही पूज्य नाही. आणि निःसंशय अल्लाहच सर्वशक्तिमान, तत्वज्ञानी आहे."

कुराणातील आयत ३.६२ नुसार अल्लाहाखेरीज कोणतीही इबादत करण्याजोगी देवता नाही. हेच अंतिम सत्य आहे की अल्लाह सर्वशक्तिमान आहे याव्यतिरिक्त कोणतेही खरे ईश्वर नाहीत. इबादत हा अरबी शब्द आहे, ज्याचा अर्थ उपासना, भक्ती किंवा अल्लाहची सेवा असा होतो. इस्लाममध्ये, इबादत म्हणजे केवळ नमाज किंवा पूजेपुरती मर्यादित नसून अल्लाहच्या आज्ञेप्रमाणे संपूर्ण जीवन जगणे असा होय. इतर धर्मीय लोकांना तुच्छ लेखण्यासाठी हीच शिकवण कारणीभूत असेल. 

Quran 3:85 in English (Sahih International translation):
"And whoever desires other than Islam as religion – never will it be accepted from him, and he, in the Hereafter, will be among the losers."

कुरआन 3:85 (सूरा आल-इ-इमरान, आयत 85) चा मराठी अनुवाद आहे:
"आणि जो कोणी इस्लाम (अल्लाहच्या इच्छेसमोर्पण) व्यतिरिक्त अन्य कोणत्याही धर्माचा अवलंब करतो, तो त्याच्याकडून स्वीकारला जाणार नाही आणि तो परलोकात घटांपैकी असेल."

कुराण सुरा आयत ३. ८५ मध्ये 
कुराण व्यतिरिक्त दुसरा कोणताही धर्म स्वीकाहार्य नाही असे सांगितले आहे. इस्लाम म्हणजे "अल्लाहच्या इच्छेला पूर्ण समर्पण". इस्लाम म्हणजे पैगंबरांनी शिकवलेल्या एकेश्वरवादाचा (तौहीद) मार्ग आहे. कुरआन हा अल्लाहचा अंतिम आणि संपूर्ण संदेश आहे, जो सर्व मानवजातीसाठी मार्गदर्शक आहे. म्हणजे इस्लाम व्यतिरिक्त इतर धर्म स्वीकारला तर ते कबूल होणार नाही. ही मूळ आयत मदिनेतील यहुदी आणि ख्रिस्ती लोकांसाठी असावी कारण ते अल्लाच्या संदेशापासून दूर गेले. थोडक्यात धार्मिक स्वातंत्र्य नाही.

Quran 3:118 in English (Sahih International translation):
"O you who have believed, do not take as intimates those other than yourselves [i.e., outsiders], for they will not spare you [any] ruin. They wish you would have hardship. Hatred has already appeared from their mouths, and what their breasts conceal is greater. We have made clear to you the signs, if you will use reason."

सूरह ३:११८ (आल-इ-इमरान) चा मराठी अनुवाद:
"हे विश्वासी लोकांनो! परकीय लोकांना आपले गुपित सांगू नका. ते तुमच्या नाशासाठी कोणतीही संधी सोडणार नाहीत. ते तुमच्या कष्टांना आनंदाने पाहातात. त्यांच्या हृदयांत द्वेष भरलेला आहे आणि ते जे काही लपवितात ते त्यांच्या शब्दांपेक्षाही भयंकर आहे. आम्ही तुमच्यासाठी आमची चिन्हे स्पष्ट केली आहेत, जर तुम्ही समजू शकाल."

कुराण मधील ३.११८ हा आयत सावधानता बाळगण्यासाठी मुसलमानांना इतर समुदायांशी (काफिर लोकांशी) अतिशय जवळीक ठेवण्याबाबत सावध करतो. गैर मुस्लिम मित्रवत दिसत असले तरी, त्यांच्या मनात इस्लाम आणि मुसलमानांविरुद्ध द्वेष असू शकतो. तुम्ही तुमच्याबाहेरील लोकांना अत्यंत गुप्त सल्लागार बनवू नका. ते तुमच्या नाशासाठी कोणतीही गडबड करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. गुपिते फक्त विश्वासू आणि धार्मिक लोकांनाच सांगावीत. काफिरांच्या मैत्रीच्या भावनेवर अंध विश्वास ठेवू नये. काफिर लोकांच्या छुप्या हेतूंबद्दल सजग राहावे. केवळ मुसलमानांलाच तुम्ही आपले मित्र बनवा. जे काफिर आहेत ते कधीच मित्र होणार नाहीत. ते केवळ तुमचा नाश करतील. त्यामुळे नॉन मुस्लिम बंधुभाव एकात्मता वगैरे वरवरचं असेल. त्यामुळे एकी करणार असाल तर इस्लामशी इमान राखणारा असेल तर तोच बरा. थोडक्यात काय तर धार्मिक एकोपा वाढीस लागावा म्हणून हा संदेश आहे. सुरक्षितता संदर्भात. मात्र कट्टरता आपोआप कशी वाढते जर बहुसंख्येने वाढ झाली की हा यक्षप्रश्न आहे.

(English from the Sahih International translation)
Surah 3 (Ali ‘Imran) Verse 151:
We will cast terror into the hearts of those who disbelieve for what they have associated with Allah of which He had not sent down [any] authority.1 And their refuge will be the Fire, and wretched is the residence of the wrongdoers.

सूरा ३ (आल-ए-इमरान) आयत १५१:
"आम्ही काफिरांच्या हृदयांमध्ये भीती निर्माण करू, कारण त्यांनी अल्लाहसोबत अशा गोष्टींची सहभागी केली आहे, ज्याचा त्याने कोणताही अधिकार दिलेला नाही. त्यांचे अंतिम ठिकाण नरक असेल आणि अत्याचाऱ्यांचा वास्तव्याचा हा वाईट टोचणारा शेवट असेल."

कुराणातील आयत ३.१५१ नुसार अल्लाह काफिर (अविश्वासू) लोकांच्या मनात भय निर्माण करतो, कारण ते त्याच्यासोबत इतर देवता किंवा शक्तींना सहभागी ठेवतात, जे अल्लाहने कधीही सांगितलेले नाही. अशा लोकांचा अंतिम निवाऱ्याचे ठिकाण जहन्नम (नरक) असेल आणि अत्याचारी लोकांना कोणीही मदत करणार नाही. त्यांचे अंतिम वास्तव्य अग्नीत आहे आणि अत्याचाऱ्यांसाठी कोणताही मदतनीस नाही. 

कुराणातील सूरह ४ (अन-निसा) मदीना येथे अवतरली. "अन-निसा" सूरहमध्ये स्त्रियांच्या हक्क, कर्तव्ये आणि सामाजिक स्थान यांच्याशी संबंधित, कौटुंबिक आणि सामाजिक कायदे, न्याय आणि समानता, तौहीद आणि अल्लाहवर विश्वास, जिहाद आणि युद्धाचे नियम,मुनाफिक (ढोंगी) लोकांची लक्षणं या प्रमुख विषयांवर भाष्य केले आहे.

Quran 4:56 in English (Sahih International translation):
"Indeed, those who disbelieve in Our verses—We will drive them into a fire. Every time their skins are roasted through, We will replace them with other skins so they may taste the punishment. Indeed, Allah is ever Exalted in Might and Wise."

सूरह ४:५६ (अन-निसा) चा मराठी अनुवाद
"ज्यांनी आमच्या आयतींना नाकारले, त्यांना आम्ही अग्नीमध्ये टाकू; जेव्हा त्यांच्या कातड्या जळून संपतील, तेव्हा आम्ही त्यांना नव्या कातड्या देवू जेणेकरून ते शिक्षा चाखत राहतील. निःसंशय अल्लाह सर्वशक्तिमान आणि विवेकशील आहे."

कुराणातील ४.५६ आयातीनुसार जे आमच्या आयतींना नाकारतात आणि अविश्वास दाखवतात, त्यांना आम्ही अग्नीमध्ये टाकू. अविश्वासू (काफिर) लोकांना दिली जाणारी शिक्षा वर्णन केली आहे. त्यांना नरकात टाकले जाईल आणि जेव्हा त्यांच्या शरीराची कातडी जळून संपेल, तेव्हा त्यांना नवीन कातडी दिली जाईल, जेणेकरून ते सतत वेदना अनुभवतील.  जेव्हाही त्यांच्या त्वचेचे भाजून संपतील, आम्ही त्यांना दुसऱ्या त्वचेने बदलू, जेणेकरून ते यातना चाखत राहतील. निःसंशय, अल्लाह सर्वशक्तिमान आणि तत्वज्ञ आहे. थोडक्यात ज्या काफिर अल्लाह ला नाकारतात त्यांना नरकयातना देण्यासाठी शिक्षा दिली जाईल.

Surah 4 (An-Nisa) Verse 89:
They wish you would disbelieve as they disbelieved so you would be alike. So do not take from among them allies until they emigrate for the cause of Allah. But if they turn away [i.e., refuse], then seize them and kill them [for their betrayal] wherever you find them and take not from among them any ally or helper,

सूरह ४ (अन-निसा) आयत ८९:
"ते इच्छितात की तुम्ही त्यांच्यासारखे काफिर व्हावे, जसे ते स्वतः आहेत. म्हणून, जोपर्यंत ते अल्लाहच्या मार्गात हिजरत (प्रवास) करत नाहीत, तोपर्यंत त्यांना आपले मित्र बनवू नका. पण जर ते तोंड फिरवतील (इन्कार करतील), तर जिथे जिथे त्यांना सापडाल, तेथे त्यांना पकडा आणि ठार मारा. त्यांपैकी कोणालाही मित्र किंवा मदतनीस बनवू नका."

कुराणातील ४.८९ आयातीमध्ये काफिर जोपर्यंत अल्लाहच्या मार्गात हिजरत (प्रवास) करत नाहीत. पण जर ते (इमान न स्वीकारण्यापासून) तोंड फिरवले तर त्यांना पकडा आणि जेथेही सापडतील तेथे त्यांना ठार मारा आणि त्यांपैकी कोणालाही मित्र किंवा मदतनीस म्हणून घेऊ नका.

Quran 4:101 in English (Sahih International translation):
"And when you travel throughout the land, there is no blame upon you for shortening the prayer, if you fear that those who disbelieve may disrupt [or attack] you. Indeed, the disbelievers are ever to you a clear enemy."

सूरह ४:१०१ (अन-निसा) चे मराठी भाषांतर:
"आणि जेव्हा तुम्ही पृथ्वीवर प्रवास करता, तेव्हा जर तुम्हाला काफिरांच्या (अविश्वासूंच्या) पासून धोका वाटत असेल, तर नमाज (प्रार्थना) लहान (संक्षिप्त) करण्यात तुमच्यावर कोणताही दोष नाही. निःसंशय काफिर लोक तुमचे खुले शत्रू आहेत."

कुराण ४.१०१ मध्ये संदेश दिला आहे की, जेव्हा तुम्ही धर्मयुद्धाच्या प्रवासात असाल, तेव्हा काफिरांना त्रास होईल अशी भीती असल्यास नमाज लहान (कसर) करण्यात तुमच्यावर कोणतीही गुन्हा नाही. निःसंशय काफिर तुमचे खुले शत्रू आहेत. थोडक्यात जेव्हा जेव्हा युद्धाचा प्रसंग येईल तेव्हा मुस्लिम सैनिकांना धर्मयुद्ध (जिहाद) दरम्यान प्रवास करताना "कसर" (नमाज लहान करणे) परवानगी दिली आहे.

कुराणातील सूरह ८ (अल-अन्फाल) मदीना येथे अवतरली, आणि यात 75 आयती आहेत. "अन्फाल" म्हणजे युद्धात मिळालेल्या लुट, युद्धलाभ. या सूरहमध्ये तौहीद आणि अल्लाहवर विश्वास, जिहाद आणि एकता, जे अल्लाह आणि त्याच्या प्रेषितांना नाकारतात, त्यांना कठोर शिक्षेचा इशारा याबद्दलचे आदेश दिले आहेत. या सूरहमध्ये मुस्लिमांना इस्लामच्या संरक्षणासाठी एकजुटीने लढण्याचे आणि अल्लाहच्या मार्गात आपले प्राण व संपत्ती अर्पण करण्याची शिकवण देण्यात येते.

Quran 8:12 in English (Sahih International translation):
"When your Lord inspired the angels: 'I am with you, so strengthen those who believe. I will cast terror into the hearts of those who disbelieve. So strike [them] above the necks and strike from them every fingertip.'"

कुराण ८:१२ (सूरह अल-अनफाल, आयत १२) चा मराठी अनुवाद:
"जेव्हा तुमचा पालनकर्ता (अल्लाह) फरिश्त्यांना प्रेरणा देत होता: 'मी तुमच्या सोबत आहे, म्हणून विश्वास ठेवणाऱ्यांना स्थिर राहा! मी काफिरांच्या हृदयांत भीती टाकीन, म्हणून तुम्ही त्यांच्या माना उडवा आणि प्रत्येक बोटीवर प्रहार करा!'"

कुराण सुरह आयत ८. १२ मध्ये इस्लाम होण्यास नकार देणाऱ्याला अल्लाह जरब भय निर्माण करेल असे सांगितले आहे. याची थोडक्यात पार्श्वभूमी बदरची लढाई ही इस्लामिक इतिहासातील पहिली निर्णायक लढाई. ज्यात विजय झाल्यानंतर इस्लामिक प्रसार जोमाने सुरू झाला. ही लढाई १३ मार्च ६२४ ईसवी सन रोजी मदिना येथून जवळच्या बदर नावाच्या ठिकाणी लढली गेली. याकाळाशी संबंधित ही आयत वापरली जाते. ही आयत मुस्लिमांना आश्वासन देते की, अल्लाह त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांना युद्धात विजय मिळवून देण्यासाठी फरिश्त्यांमार्फत मदत करेल. अल्लाह स्वतः शत्रूच्या मनात भय निर्माण करतो, ज्यामुळे मुस्लिमांचा विजय सोपा होतो. युद्धात शत्रूवर निर्णायक प्रहार करणे आणि त्यांना पूर्णपणे पराभूत करणे हा या आयतीचा आदेश आहे. हा युद्धातील प्रत्यक्ष लढाईचा आदेश आहे, जो फरिश्त्यांना आणि मुस्लिम सैनिकांना दिला गेला. येथे "मानेवर प्रहार" म्हणजे शत्रूला निर्णायक आघात करणे, तर "प्रत्येक बोटांवर आघात" म्हणजे शत्रूच्या शरीराच्या प्रत्येक भागावर हल्ला करणे, ज्यामुळे ते पूर्णपणे पराभूत होतील. "सर तन से जुदा" करण्यासाठी प्रेरणा इथूनच येते का याचा विचार केला पाहिजे. थोडक्यात काफिरांना मारण्यासाठी अल्लाहने आदेश दिला ही शिकवण तर खोलवर रुजली नसेल?

Quran 8:39 in English (Sahih International translation):
"And fight them until there is no more fitnah (persecution, oppression) and [until] the religion, all of it, is for Allah. And if they cease, then indeed, Allah is Seeing of what they do."

कुराण ८:३९ (सूरह अल-अनफाल, आयत ३९) चा मराठी अनुवाद:
"आणि (हे मुसलमानांनो!) तुम्ही या फितने (अराजक, अत्याचार) चा नाश करण्यासाठी लढा करा, जोपर्यंत फसाद (अधर्म) शिल्लक राहत नाही आणि धर्म (इस्लाम) पूर्णपणे अल्लाहसाठी समर्पित होत नाही. मग जर ते (काफिर) थांबले तर निःसंशय अल्लाह त्यांच्या कृत्यांना पाहत आहे."

८.३९ या आयतमध्ये काफिरांशी लढा करण्याचा आदेश आहे, आयतेची पार्श्वभूमी
प्रामुख्याने बदरच्या युद्धाशी (इसवी 624) आणि त्यानंतरच्या घटनांशी संबंधित आहे. बदरचे युद्ध हे इस्लामच्या इतिहासातील पहिले मोठे युद्ध होते, जिथे मक्का येथील कुरैश जमातीच्या सैन्याविरुद्ध मुस्लिमांनी लढा दिला. या आयतीचा संदर्भही युद्ध आणि इस्लामच्या शत्रूंविरुद्धच्या संघर्षाशी निगडित आहे. या आयतीत मुस्लिमांना काफिरांशी (ज्यांनी इस्लामचा स्वीकार केला नाही आणि मुस्लिमांवर अत्याचार केले) लढण्याचा आदेश दिला आहे, फित्ना (अशांती, अत्याचार) नष्ट करणे आणि धर्म पूर्णपणे अल्लाहच्या आज्ञाधारकतेसाठी स्थापित करणे हा आदेश होय. परंतु त्यामागील उद्देश नेमका काय हे जो डोक्यात भरवतो तो ठरवतो. पाठ्यपुस्तकी उद्देश म्हणजे धार्मिक अत्याचार आणि अंधश्रद्धा संपवणे हा आहे. मात्र जोपर्यंत इस्लाम स्वतंत्रपणे प्रसारित होत नाही आणि धार्मिक सुरक्षितता मिळत नाही, तोपर्यंत संघर्ष करावा. हे डोक्यात ठासून भरलेलं असतं. एकेश्वरवाद म्हणजे अल्लाहच्या सत्तेखाली संपूर्ण धर्म एकत्रित करणे हे लक्ष्य साध्य करण्यासाठी हा आदेश इस्लामच्या संरक्षण आणि प्रसाराच्या संदर्भातील महत्त्वाचा आहे. थोडक्यात धर्मप्रसार तलवारीच्या जोरावर करा त्यासाठी लढ्याचे अंतिम ध्येय फक्त अल्लाहसाठी समर्पित करणे आहे. मुसलमान सोडून इतरांशी तुम्ही युद्ध करा जोपर्यंत अल्लाहचा दिवस पूर्णपणे कायम होत नाही तोपर्यंत.

(English from the Sahih International translation)
Surah 8 (Al-Anfal) Verse 65:
O Prophet, urge the believers to battle. If there are among you twenty [who are] steadfast, they will overcome two hundred. And if there are among you one hundred [who are steadfast], they will overcome a thousand of those who have disbelieved because they are a people who do not understand.

सूरह ८ (अल-अन्फाल) आयत ६५:
"हे पैगंबर, विश्वास ठेवणाऱ्यांना लढाईसाठी प्रोत्साहित करा. जर तुमच्यात विसावा (२०) धैर्यवान असतील, तर ते दोनशे (२००) काफिरांवर मात करतील. आणि जर तुमच्यात शंभर (१००) धैर्यवान असतील, तर ते हजार (१०००) काफिरांवर मात करतील, कारण ते अशा लोकांपैकी आहेत जे समजत नाहीत."

कुरआन ८:६५ चा हा आयत बदरच्या लढाईच्या संदर्भात उतरला होता, जेव्हा मुस्लिम सैन्य संख्येने कमी होते पण त्यांच्या विश्वासाच्या बळावर विजय मिळवला. तुम्ही मोमिनांना युद्धासाठी प्रोत्साहन द्या. जर तुमच्यातील वीस जण स्थिर राहिले तर ते दोनशे शत्रूंवर मात करतील. आणि जर तुमच्यातील शंभर जण असतील तर ते हजार काफिरांवर विजय मिळवतील. या आयतीत अल्लाह पैगंबर मुहम्मद  यांना मुस्लिमांना युद्धासाठी प्रोत्साहित करण्याचा आणि त्यांचे मनोबल वाढवण्याचा आदेश देत आहे. ही आयत मुस्लिमांच्या धैर्यावर आणि अल्लाहच्या मदतीवर विश्वास ठेवण्याच्या सामर्थ्यावर भर देते.

(English from the Sahih International translation)
Surah 8 (Al-Anfal) Verse 69:
So consume what you have taken of war booty [as being] lawful and good, and fear Allah. Indeed, Allah is Forgiving and Merciful.

सूरह ८ (अल-अन्फाल) आयत ६९:
"म्हणून, युद्धात मिळालेला लूटमाल हलाल आणि चांगला मानून खा, आणि अल्लाहचा भीती वाटू द्या. निःसंशय, अल्लाह क्षमाशील आणि दयाळू आहे."  

कुराणातील ८.६९ आयतेत तपशीलवार पद्धतीने युद्धात मिळवलेल्या लूटमारीच्या संपत्ती बद्दल वाटणी, विनियोग संदर्भात भाष्य केले आहे. येथे "लूटमाल" (गनीमा) म्हणजे युद्धात शत्रूकडून जिंकलेली संपत्ती, जसे की शस्त्रे, घोडे, वस्तू, किंवा इतर संसाधने. (बदरच्या युद्धात मुस्लिमांनी कुरैशांचा बराच लूटमाल मिळवला होता. हा संदर्भ इथे अपेक्षित आहे.) ही आयत मुस्लिमांना हा लूटमाल वापरण्याची परवानगी देते, परंतु तो कायदेशीर मार्गाने मिळालेला असावा. तो हलाल (कायदेशीर) आणि शुद्ध (पवित्र) म्हणून खा (उपभोग घ्या). "हलाल" म्हणजे इस्लामच्या नियमांनुसार कायदेशीर आणि परवानगी असलेले. "शुद्ध" (तय्यिब) म्हणजे नैतिकदृष्ट्या स्वच्छ आणि पवित्र. येथे मुस्लिमांना सांगितले आहे की, युद्धात मिळालेला लूटमाल हा कायदेशीर आहे आणि ते तो वापरू शकतात (उदा., खाणे, वापरणे, किंवा वाटणी करणे). तथापि, हा लूटमाल कुरआनने सांगितलेल्या नियमांनुसार (उदा. ८.४१ मध्ये सांगितलेली वाटणी) वापरला पाहिजे, जिथे लूटमालाचा एक-पंचमांश हिस्सा अल्लाहच्या मार्गासाठी (उदा., गरीब, अनाथ, किंवा जिहादसाठी) दिला जावा. लूटमाल वापरण्याची परवानगी देताना, अल्लाह मुस्लिमांना सावध करतो की त्यांनी अल्लाहचे भय (तकवा) बाळगावे. अल्लाहचे भय बाळगणे म्हणजे इस्लामच्या नैतिक आणि कायदेशीर मर्यादांचे पालन करणे.
ही आयत मुस्लिमांना आश्वासन देते की, जर त्यांनी चुकून काही चुका केल्या, तर अल्लाह क्षमाशील (गफूर) आणि दयाळू (रहीम) आहे. परंतु, याचा अर्थ असा नाही की मुस्लिमांनी जाणूनबुजून नियमांचे उल्लंघन करावे. ही अल्लाहची दया आणि क्षमा यांचे वर्णन आहे, जे मुस्लिमांना योग्य मार्गावर राहण्यासाठी प्रेरित करते. थोडक्यात काफिरांविरोधात लढ्यानंतर जी काही लुटालूट होईल त्यासाठी सर्वशक्तिमान अल्लाह आदेश देतात आणि तसेच वागले पाहिजे. जर भारतीय भूमीवर जी जी इस्लामिक आक्रमणं झाली ती ज्या पद्धतीने लूटमार करण्यासाठी आणि धर्माच्या प्रसारासाठी केली होती याची पाळेमुळे तर या आयतच्या आदेशानुसार तर नसतील?

कुराणातील सूरह ९ (अत-तौबा) ही मदीना येथे अवतरलेली आहे. ही सूरह कुरआनमधील एकमेव सूरह आहे ज्याची सुरुवात "बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम" (अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयाळू आणि कृपावान आहे) ने होत नाही. याचे कारण असे सांगितले जाते की ही सूरह कठोर स्वरूपाची आहे आणि यात मूर्तिपूजक आणि विश्वासघात करणाऱ्यांविरुद्ध अल्लाहचा इशारा आहे. या सूरहमध्ये मूर्तिपूजक आणि विश्वासघातकांविरुद्ध इशारा, मुस्लिमांचे कर्तव्य, जिहाद, जकात आणि इस्लामच्या संरक्षणासाठी एकजुटीचे महत्त्व यावर संदेश दिलेले आहेत. 

(English from the Sahih International translation)
Surah 9 (At-Tawbah) Verse 5:
And when the inviolable months have passed, then kill the polytheists wherever you find them and capture them and besiege them and sit in wait for them at every place of ambush. But if they should repent, establish prayer, and give zakāh, let them [go] on their way. Indeed, Allah is Forgiving and Merciful.

सूरह ९ (अत-तौबा) आयत ५:
"आणि जेव्हा पवित्र महिने संपतील, तेव्हा मूर्तिपूजकांना जिथे जिथे सापडाल, तेथे त्यांना ठार मारा, पकडा आणि त्यांच्या विरुद्ध घात ठेवा. पण जर ते पश्चाताप करून नमाज स्थापित करतील आणि जकात द्यायला लागतील, तर त्यांना मुक्त करा. निःसंशय, अल्लाह क्षमाशील आणि दयाळू आहे."  

कुराणातील ९.५ आयतेची पार्श्वभूमी जी इस्लामच्या इतिहासातील एका महत्त्वपूर्ण काळात (इसवी 630) उतरली. ही सूरह प्रामुख्याने मक्का येथील मूर्तिपूजक (मुश्रिक) आणि मुस्लिमांशी केलेल्या करारांचे उल्लंघन करणाऱ्या जमातींशी संबंधित आहे. ही आयत विशेषतः मक्का विजयानंतर आणि मुस्लिमांविरुद्ध सतत युद्ध आणि विश्वासघात करणाऱ्या मूर्तिपूजकांविरुद्धच्या कारवाईशी संबंधित आहे. या आयतीत मुस्लिमांना सांगितले आहे की, पवित्र महिने (अश्हुरुल-हुरूम) संपल्यानंतर मूर्तिपूजकांविरुद्ध कठोर कारवाई करावी, परंतु त्यांना इस्लाम स्वीकारण्याची आणि पश्चात्ताप करण्याची संधीही द्यावी आणि त्यांनी नमाज कायम केली, जकात दिली, तर त्यांना सोडा. या आयतीचा संदर्भ पवित्र महिन्यांशी (अश्हुरुल-हुरूम) आहे, जे अरब परंपरेनुसार चार पवित्र महिने (जुल-कैदा, जुल-हिज्जा, मुहर्रम, आणि रजब) होते, ज्यात युद्ध करण्यास मनाई होती. याच कालावधीत मूर्तिपूजकांना त्यांच्या करारांचे पालन करण्यासाठी चार महिन्यांची मुदत दिली गेली होती. ही आयत सांगते की, ही मुदत संपल्यानंतर, ज्या मूर्तिपूजकांनी करार तोडले आणि मुस्लिमांविरुद्ध युद्ध चालू ठेवले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी. मूर्तिपूजकांना (मुश्रिकांना) जिथे सापडतील तिथे मारून टाका" असा आदेश दिला आहे. मुश्रिक) म्हणजे श ज्यांनी अल्लाहच्या एकेश्वरवादाला नाकारले आणि मूर्तीपूजा केली. काफिरांना पकडा, त्यांना घेरा, आणि प्रत्येक ठिकाणी त्यांच्यासाठी सापळा लावून बसा. ही युद्धाची रणनीती आहे, जिथे मुस्लिमांना मूर्तिपूजकांना पकडण्याचा, त्यांना घेरण्याचा आणि त्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याचा आदेश दिला आहे. ही रणनीती युद्धात शत्रूवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी आहे. येथे मूर्तिपूजकांना इस्लाम स्वीकारण्याची आणि पश्चात्ताप करण्याची संधी दिली आहे. जर त्यांनी इस्लाम स्वीकारला, नमाज (प्रार्थना) आणि जकात (दान) यासारख्या इस्लामच्या मूलभूत कर्तव्यांचे पालन केले, तर त्यांना क्षमा केले जाईल आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई थांबवली जाईल. थोडक्यात काय तर धर्म स्वीकारला तर सूटका नाहीतर मृत्यू अटळ! मूळातच हा आयत इस्लामच्या इतिहासातील सर्वात चर्चित आयतांपैकी एक आहे. यात मूर्तिपूजकांशी (मुश्रिकीन) युद्ध करण्याचा स्पष्ट आदेश आहे. जर इस्लाम स्वीकारला किंवा जिझिया कर भरल्यास त्यांना सुरक्षितता दिली जाईल. थोडक्यात धर्मप्रसार तलवारीच्या जोरावर करण्यासाठी हच आदेश जगन्मान्य झाला की असे वाटते. वर वर पाहता न्यायाचे युद्ध, आत्मरक्षा आणि धर्माच्या संरक्षणासाठी वगैरे आदेश दिला वगैरे ज्ञान पाजळत बसायचं अन्यथा इस्लाम स्वीकारल्यास सुरक्षितता दिली जाईल वगैरे म्हणायचं. थोडक्यात धर्माच्या प्रसारासाठी एवढं मजबूत बाळकडू जर मिळत असेल तर इस्लाम शांततेचा संदेश देतो वगैरे वर कोण विश्वास ठेवणार?

(English from the Sahih International translation)
Surah 9 (At-Tawbah) Verse 14:
Fight them; Allah will punish them by your hands and will disgrace them and give you victory over them and satisfy the breasts [i.e., desires] of a believing people.

सूरह ९ (अत-तौबा) आयत १४:
"त्यांच्याशी लढा; अल्लाह त्यांना तुमच्या हातांनी शिक्षा देईल, त्यांना लाजवेल आणि तुम्हाला विजय देईल. आणि विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या हृदयांना समाधान देईल."

९.१४ आयत मध्ये सांगितले आहे की, अल्लाह तुमच्या हातांनी त्यांना शिक्षा करेल. मुस्लिमांचे युद्ध हे अल्लाहच्या इच्छेनुसार आहे, आणि त्यांच्या हातांनी शत्रूंना शिक्षा दिली जाईल. याचा अर्थ असा की, मुस्लिम हे अल्लाहच्या दैवी योजनेतील साधन आहेत, आणि त्यांचा विजय हा अल्लाहच्या मदतीने शक्य होईल. ही आयत मुस्लिमांना अल्लाहवर विश्वास ठेवण्यास आणि धैर्याने लढण्यास प्रोत्साहित करते. थोडक्यात धर्माच्या संरक्षणासाठी लढाई करताना जेव्हा इस्लाम आणि मुस्लिम समाज धोक्यात असतो, तेव्हा प्रतिकार करणे गरजेचे आहे. त्यासाठी काफिर लोकांना आपल्या हाताने अल्लाह शिक्षा देतोय. धर्माच्या नावाखाली काफिरांंना तुमच्या हाताने जी काही कठोर शिक्षा होईल ती अल्लाह देतोय तुम्ही फक्त मेसेंजर आहात. असा तर नसेल ना? करता करविता तोच. आपण फक्त निमित्त?

(English from the Sahih International translation)
Surah 9 (At-Tawbah) Verse 23:
O you who have believed, do not take your fathers or your brothers as allies if they have preferred disbelief over belief. And whoever does so among you – then it is those who are the wrongdoers.

सूरह ९ (अत-तौबा) आयत २३:
"हे विश्वास ठेवणाऱ्यांनो, जर तुमचे पिता किंवा भाऊ विश्वासापेक्षा अविश्वासाला प्राधान्य देत असतील, तर त्यांना आपले मित्र बनवू नका. आणि तुमच्यापैकी जो असे करेल, तोच अत्याचारी आहे."

आयत ९.२३ मध्ये सांगितले आहे की, इस्लामच्या एकतेसाठी धर्म हा कुटुंबापेक्षा श्रेष्ठ आहे. मुसलमान सोडून इतरांना तुम्ही आपले मानू नका. जर एखादा इस्लाम न स्वीकारता काफिर राहिला, तर त्यांच्यावर इस्लामपेक्षा निष्ठा ठेवू नये. अल्लाह आणि त्याचा धर्म हे सर्वात महत्त्वाचे आहे. अशी व्यक्ती अल्लाहच्या कोपाला पात्र होते. थोडक्यात जिहाद किंवा धर्माच्या संरक्षणाच्या वेळी नेमकं काय करायचं हे तर सांगितले नसेल ना?

(English from the Sahih International translation)
Surah 9 (At-Tawbah) Verse 28:
O you who have believed, indeed the polytheists are unclean, so let them not approach al-Masjid al-Ḥarām after this, their [final] year. And if you fear privation, Allah will enrich you from His bounty if He wills. Indeed, Allah is Knowing and Wise.

सूरह ९ (अत-तौबा) आयत २८:
"हे विश्वास ठेवणाऱ्यांनो, मूर्तिपूजक (मुश्रिक) हे अपवित्र आहेत, म्हणून या वर्षानंतर त्यांना मस्जिद अल-हराम (काबा) जवळ येऊ देऊ नका. आणि जर तुम्हाला दारिद्र्याची भीती असेल, तर अल्लाह आपल्या कृपेने तुम्हाला संपन्न करेल, जर त्याने इच्छिले. निःसंशय, अल्लाह ज्ञानी आणि तज्ञ आहे."

कुराणातील ९.२८ आयत ही विशेषतः मक्केतील मस्जिद-ए-हराम (काबा) च्या पवित्रतेशी आणि त्या ठिकाणी काफिर प्रवेशावर बंदी घालण्याशी संबंधित आहे आणि अल्लाहवर विश्वास ठेवण्याच्या महत्त्वावर जोर देते. ही आयत मुस्लिमांना त्यांच्या विश्वासाच्या शुद्धतेची काळजी घेण्यास आणि अल्लाहच्या कृपेवर विश्वास ठेवण्यास शिकवते. काबा हे एकेश्वरवादाचे केंद्र आहे, आणि त्याची पवित्रता राखणे मुस्लिमांचे कर्तव्य आहे. काफिर इस्लामच्या तत्त्वांशी विसंगत आहे, म्हणून त्यांना काबामध्ये प्रवेश नाकारला गेला. थोडक्यात काफिर धार्मिक बहिष्कार टाकण्याची शिकवण तर नसेल?

(English from the Sahih International translation)
Surah 9 (At-Tawbah) Verse 29
Fight against those who do not believe in Allah or in the Last Day and who do not consider unlawful what Allah and His Messenger have made unlawful and who do not adopt the religion of truth [i.e., Islām] from those who were given the Scripture – [fight] until they give the jizyah1 willingly while they are humbled.

सूरह ९ (अत-तौबा) आयत २९:
"अल्लाह आणि अंतिम दिवसावर विश्वास न ठेवणाऱ्या, अल्लाह आणि त्याच्या पैगंबराने हराम केलेल्या गोष्टींना हलाल न मानणाऱ्या, आणि सत्य धर्म (इस्लाम) स्वीकार न करणाऱ्या ग्रंथधारकांशी (यहुदी/ख्रिश्चन) लढा—जोपर्यंत ते जिझिया (कर) देत नाहीत, तोपर्यंत त्यांच्याशी लढा, आणि ते हतबल झालेले असतील."

कुराणातील ९.२९ आयात काफिर लोक इस्लामच्या मूलभूत तत्त्वांना नाकारतात, त्यांच्याशी संबंधित आहे. जे अल्लाह आणि त्याच्या रसूलने हराम (निषिद्ध) केलेल्या गोष्टींना हराम मानत नाहीत, आणि जे खऱ्या धर्माचे (इस्लामचे) पालन करत नाहीत, जे अल्लाहच्या एकेश्वरवादावर (तौहीद) आणि कयामतच्या दिवसावर विश्वास ठेवत नाहीत, जे सत्य धर्म स्वीकारत नाहीत त्यांच्याशी युद्ध करा, जोपर्यंत ते आपल्या हाताने विनम्र होऊन जिझिया (कर) देत नाहीत. जिझिया हा एक कर आहे जो गैर-मुस्लिमांना इस्लामिक राज्यात राहण्याच्या बदल्यात आणि संरक्षणासाठी द्यावा लागतो. हा कर त्यांना इस्लामिक राज्याच्या कायद्यांचे पालन करण्याचे आणि अधिपत्य स्वीकारण्याचे प्रतीक आहे. थोडक्यात खरा धर्म इस्लामचा स्विकार करत नाही तोपर्यंत काफिरांशी लढा देण्याचे आदेश आहेत. भले ही ह्या आयत ची ऐतिहासिक पार्श्वभूमी ही तत्कालीन यहुदी आणि ख्रिस्ती लोकांसोबत युद्धाची आहे. पण जिहादी इकोसिस्टीम जीवंत ठेवण्यासाठी तर ह्या आयतीची शिकवण दिली गेली नसेल?

(English from the Sahih International translation)
Surah 9 (At-Tawbah) Verse 37:
Indeed, the postponing [of restriction within sacred months] is an increase in disbelief by which those who have disbelieved are led [further] astray. They make it1 lawful one year and unlawful another year to correspond to the number made unlawful by Allah2 and [thus] make lawful what Allah has made unlawful. Made pleasing to them is the evil of their deeds; and Allah does not guide the disbelieving people

सूरह ९ (अत-तौबा) आयत ३७:
"पवित्र महिन्यांची पाळत ठेवण्यात विलंब करणे हा अविश्वास वाढवणारा आहे, ज्यामुळे काफिरांना अधिक भटकवले जाते. ते एका वर्षी पवित्र महिन्यांना हलाल आणि दुसऱ्या वर्षी हराम मानतात, जेणेकरून अल्लाहने निषिद्ध केलेल्या महिन्यांची संख्या पूर्ण करावी. त्यांच्या वाईट कृत्यांना ते सुखद वाटते. आणि अल्लाह काफिर लोकांना मार्गदर्शन देत नाही."

कुराणातील आयत ९.३७ नुसार अल्लाह स्पष्ट करतो की पवित्र महिने हे दैवी नियमानुसार निश्चित आहेत, त्यांना मानवी हिशोबाने बदलणे गैरइस्लामी आहे. स्वतःच्या सोयीनुसार धार्मिक नियम बदलणे हे सत्यापासून दूर जाण्याचे लक्षण आहे. ही आयत मुस्लिमांना अल्लाहच्या कायद्यांचे काटेकोरपणे पालन करण्यास आणि मानवी हस्तक्षेप टाळण्यास शिकवते. या आयतीचा ऐतिहासिक संदर्भ नसी प्रथेशी आहे. ही प्राचीन अरबांची प्रथा होती, ज्यामध्ये ते इस्लामपूर्व काळात पवित्र महिन्यांचे (जसे की जुल-कैदा, जुल-हिज्जा, मुहर्रम आणि रजब) कालगणनेशी छेडछाड करत असत. या पवित्र महिन्यांमध्ये युद्ध आणि हिंसा निषिद्ध होती, परंतु त्यांच्या सोयीनुसार अरब काही महिन्यांना "पवित्र" किंवा "गैर-पवित्र" घोषित करत असत. उदाहरणार्थ, जर त्यांना युद्ध करायचे असेल, तर ते पवित्र महिन्याला "हलाल" घोषित करत आणि दुसऱ्या महिन्याला "हराम" करत. अशा प्रकारे, ते अल्लाहने पवित्र केलेल्या महिन्यांचे उल्लंघन करत असत. त्यामुळे या आयातीत धार्मिक नियम आणि अल्लाहच्या आदेशांचे पालन करण्याच्या महत्त्वावर जोर देते. ती मुस्लिमांना शिकवते की, धार्मिक तत्त्वांशी छेडछाड करणे किंवा स्वतःच्या सोयीनुसार त्यांचा अर्थ बदलणे हे सत्यापासून दूर जाण्याचे कारण ठरू शकते. ही आयत विश्वासाची शुद्धता, अल्लाहच्या कायद्यांप्रती निष्ठा आणि धार्मिक प्रथांमध्ये सातत्य राखण्याचे महत्त्व अधोरेखित करते. थोडक्यात एकदा इस्लाम धर्म स्वीकारला की तुम्हाला प्रश्न विचारता येणार नाही, बंडखोरी करता येणार नाही की सोयीनुसार धार्मिक परिप्रेक्ष्यात बदल करता येणार नाही. धर्मच श्रेष्ठ बाकी काहीच नाही त्यामुळे जिहादी तत्वं अजून मजबूत होत नसावीत?

(English from the Sahih International translation)
Surah 9 (At-Tawbah) Verse 58
And among them are some who criticize you concerning the [distribution of] charities. If they are given from them, they approve; but if they are not given from them, at once they become angry.

सूरह ९ (अत-तौबा) आयत ५८:
"आणि त्यांच्यात (मुनाफिकांमध्ये) काही असे आहेत जे दानवाटपाबद्दल तुमची टीका करतात. जर त्यांना दान दिले गेले, तर ते समाधानी होतात; पण जर त्यांना दान दिले नाही, तर ते ताबडतोब रागावतात."

कुराणातील आयत ९.५८ ही मुनाफिक (ढोंगी, खोटे मुस्लिम, दुटप्पी वृत्तीचे लोक) लोकांच्या स्वार्थी आणि अविश्वासू वृत्तीवर प्रकाश टाकते.
जे बाह्यतः मुस्लिम दिसत असले तरी त्यांचे हृदय इस्लामच्या खऱ्या भावनेपासून दूर होते. जे कोणी जकात वाटपाच्या पद्धतीवर टीका करतात, त्यात दोष काढतात किंवा जकात (सदका) वाटपाच्या निष्पक्षतेवर शंका घेतात, हे लोक पैगंबरांच्या प्रामाणिकपणावर आणि न्याय्य वाटपावर प्रश्न उपस्थित करतात, त्यांचे वर्तन त्यांच्या खऱ्या हेतूला उघड करते.
जकात ही एक धार्मिक कृती आहे, जी अल्लाहच्या आदेशानुसार आणि पैगंबरांच्या मार्गदर्शनाखाली वितरित केली जाते. त्यावर टीका करणे हे इस्लामच्या तत्त्वांविरुद्ध आहे.
खरे मुस्लिम जकातच्या वाटपाबाबत पैगंबरांवर विश्वास ठेवतात, तर मुनाफिक स्वतःच्या स्वार्थासाठी तक्रार करतात. थोडक्यात ढोंगी इस्लाम धर्म न मानणारे लोक कसे असतील याबाबत या आयातीत वर्णिले आहेत. याचा अर्थ जिहादी इकोसिस्टीम अजून बळकट करण्यासाठी तर होत नसेल ना?

(English from the Sahih International translation)
Surah 9 (At-Tawbah) Verse 111
Indeed, Allah has purchased from the believers their lives and their properties [in exchange] for that they will have Paradise. They fight in the cause of Allah, so they kill and are killed. [It is] a true promise [binding] upon Him in the Torah and the Gospel and the Qur’ān. And who is truer to his covenant than Allah? So rejoice in your transaction which you have contracted. And it is that which is the great attainment.

सूरह ९ (अत-तौबा) आयत १११:
"निःसंशय, अल्लाहने विश्वास ठेवणाऱ्यांच्या प्राण आणि मालाची खरेदी केली आहे, त्याबदल्यात जन्नत देण्याचे वचन दिले आहे. ते अल्लाहच्या मार्गात लढतात, म्हणून ते ठार मारतात आणि ठार होतात. हे वचन तौरात, इंजील आणि कुरआनमध्ये अल्लाहने दिलेले आहे. आणि अल्लाहपेक्षा जास्त वचनबद्ध कोण आहे? म्हणून, तुम्ही केलेल्या या करारावर आनंदी व्हा. आणि हेच मोठे यश आहे."  

कुराणातील आयत ९.१११ मध्ये अल्लाहचा करार आणि जिहादचा अर्थ सांगितला आहे.
आयतेच्या सुरुवातीला, अल्लाहने इस्लाम वर विश्वास असणाऱ्यांनी त्यांचे जीवन आणि संपत्ती अल्लाहच्या मार्गात समर्पित केली आहे, त्या बदल्यात, अल्लाह त्यांना जन्नत (स्वर्ग) देण्याचे वचन देतो. त्यांच्या कर्तव्याची आणि त्यांच्या बलिदानाचे मूल्य समजावतो. येथे उल्लेख केलेल्या जिहादचा अर्थ केवळ शारीरिक युद्धापुरता मर्यादित नाही, तर तो व्यापक अर्थाने वापरला गेला आहे. इस्लाममध्ये जिहाद म्हणजे अल्लाहच्या मार्गात प्रयत्न करणे, मग ते शारीरिक, मानसिक, आर्थिक किंवा आध्यात्मिक असो. या आयतेच्या संदर्भात, विशेषत: युद्धाच्या काळात, शारीरिक जिहादवर जोर दिला गेला आहे, जिथे इस्लाम आणि मुस्लिम समुदायाच्या रक्षणासाठी लढण्यास सांगितले आहे. अल्लाहचे वचन अटळ आणि सत्य आहे. इस्लामवर पूर्ण विश्वास ठेवण्यास सांगितले आहे, या बदल्यात त्यांच्या बलिदानाचे फळ त्यांना नक्कीच मिळेल. येथे जन्नत आणि अल्लाहच्या मार्गात बलिदान देणे हे सर्वात मोठे यश मानले गेले आहे. इस्लामिक दृष्टिकोनातून, जन्नत हा केवळ भौतिक सुखांचा ठिकाण नाही, तर तो अल्लाहच्या जवळ जाण्याचा आणि त्याच्या कृपेचा अनुभव घेण्याचा मार्ग आहे. थोडक्यात जिहाद करण्यासाठी प्रेरणा आणि नंतर मिळणाऱ्या जन्नत चार मार्ग हे भाष्य तर कट्टरता रुजवण्यासाठी मूलतत्ववाद्यांना शिकवलं जा नसेल?

(English from the Sahih International translation)
Surah 9 (At-Tawbah) Verse 123:
O you who have believed, fight against those adjacent to you of the disbelievers and let them find in you harshness. And know that Allah is with the righteous.

सूरह ९ (अत-तौबा) आयत १२३:
"हे विश्वास ठेवणाऱ्यांनो, तुमच्या शेजारच्या काफिरांशी लढा आणि त्यांना तुमच्यामध्ये कडकपणा दिसू द्या. आणि हे जाणा की अल्लाह धार्मिक लोकांसोबत आहे."

कुराणाती ९.१२३ ही एक महत्त्वपूर्ण आयत आहे जी इस्लामवर निष्ठा असणाऱ्यांना त्यांच्या शत्रूंविरुद्ध दृढनिश्चयाने आणि धैर्याने सामना करण्याचा आदेश देते. या आयतेत "जवळचे काफिर" असा उल्लेख आहे, ज्याचा अर्थ जे मुस्लिम समुदायाच्या जवळ होते आणि त्यांच्यासाठी थेट धोका निर्माण करत होते. येथे "काफिर" हा शब्द त्या लोकांसाठी वापरला आहे ज्यांनी इस्लामचा स्पष्टपणे नकार दिला आणि मुस्लिमांविरुद्ध शत्रुत्व दाखवले. या आयतेचा उद्देश विश्वासणाऱ्यांना त्यांच्या समुदायाच्या संरक्षणासाठी आणि इस्लामच्या प्रसारासाठी सक्रियपणे लढण्यास सांगणे आहे. येथे उल्लेख असलेल्या जिहादचा उल्लेख आहे, जी इस्लाममध्ये एक व्यापक संकल्पना आहे. जिहादचा अर्थ केवळ शारीरिक युद्ध नाही, तर तो आत्म्याशी संघर्ष (जिहाद-उन-नफ्स), समाजातील अन्यायाविरुद्ध लढा, आणि अल्लाहच्या मार्गात प्रयत्न करणे यांचा समावेश करतो. या आयतेच्या संदर्भात, विशेषतः शारीरिक जिहादवर (किताल) जोर दिला गेला आहे, जिथे मुस्लिमांना त्यांच्या समुदायाच्या रक्षणासाठी आणि इस्लामच्या शत्रूंविरुद्ध लढण्यास सांगितले आहे. थोडक्यात काफिर लोकांशी लढण्याची प्रेरणा या आयातीत मिळत असावी कारण अल्लाह इस्लाम वर निष्ठा असणाऱ्यांसोबत आहे याची पुष्टी होतेय. 

कुराणातील सूरह २१ (अल-अंबिया) मक्का येथे प्रेषित मुहम्मद यांच्यावर अवतरली. यात इस्लामच्या मूलभूत विश्वासांवर, प्रेषितांच्या कथा, मानवजातीच्या जबाबदाऱ्या आणि कयामत (प्रलय) च्या सत्यतेवर भाष्य केले आहे. काफिर लोकांना सत्य स्वीकारण्याचे आणि अल्लाहच्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले आहे. 

(English from the Sahih International translation)
Surah 21 (Al-Anbya) Verse 98:
Indeed, you [disbelievers] and what you worship other than Allah are the firewood of Hell. You will be coming to [enter] it.

सूरह २१ (अल-अंबिया) आयत ९८:
"निःसंशय, तुम्ही (काफिरांनो) आणि अल्लाहखेरीज ज्यांची तुम्ही पूजा करता, ते सर्व नरकाचे इंधन आहेत. तुम्ही तेथे प्रवेश करणार आहात."  

कुराणातील २१.९८  ही एक महत्त्वपूर्ण आयत आहे जी एकेश्वरवाद (तौहीद) आणि मूर्तिपूजा (शिर्क) यांच्याबद्दल स्पष्ट संदेश देते. ही आयत इस्लाम वर निष्ठा नसणाऱ्या लोकांना आणि मूर्तिपूजकांना त्यांच्या कृतींच्या परिणामांबाबत चेतावणी देते. ही आयत मूर्तिपूजकांना उद्देशून आहे, जे अल्लाहशिवाय इतर देवतांची किंवा मूर्तींची पूजा करत होते. ही आयत इस्लामच्या मूलभूत तत्त्वांपैकी एक असलेल्या तौहीदवर जोर देते. तौहीद म्हणजे अल्लाहच्या एकत्वावर विश्वास ठेवणे आणि त्याच्याशिवाय कोणत्याही गोष्टीची पूजा न करणे. मूर्तिपूजा हा शिर्क आहे, जो इस्लाममध्ये सर्वात मोठा पाप मानला जातो, कारण तो अल्लाहच्या एकमेवत्वाला नाकारतो. या आयतेत मूर्तिपूजक आणि त्यांच्या मूर्तींना "जहन्नमचे इंधन" असे संबोधले आहे. जो नरकातील शिक्षा आणि परिणाम दर्शवतो. याचा अर्थ असा की मूर्तिपूजक, जर त्यांनी आपला मार्ग सुधारला नाही, तर ते आणि त्यांच्या मूर्ती नरकाच्या अग्नीत प्रवेश करतील. मूर्तिपूजकांना थेट चेतावणी आहे की, जर त्यांनी शिर्क (मूर्तिपूजा) चालू ठेवली, तर त्यांचे अंतिम ठिकाण जहन्नम (नरक) असेल. ही चेतावणी त्यांना पश्चात्ताप करण्याची आणि अल्लाहकडे परतण्याची संधी देते. थोडक्यात या आयातीतील संदर्भ ऐतिहासिक तत्कालीन काळातले असले तरी जिहादी तत्वांना अजून कट्टरतावादी बनवण्यासाठी इस्लाम वर निष्ठा नसणाऱ्या लोकांना चेतावणी म्हणून शिकवली जात असावी. म्हणजेच काफिरांच्या विरोधात ब्रेन वॉशिंग करण्यासाठी ही आयात उपयुक्त ठरत नसेल?

कुराणातील सूरह ३२ (अस-सजदा) (अर्थ: सजदा करणे)  मक्का येथे प्रेषित मुहम्मद यांच्यावर अवतरली. ही सूरह अल्लाहच्या एकत्वावर (तौहीद), कुरआनच्या दैवी उत्पत्तीवर, प्रलय (कयामत), आणि मानवाच्या जबाबदारीवर जोर देते. या सूरहमध्ये इस्लाम वर विश्वास असणारे आणि नसणारे यांच्यातील फरक स्पष्ट केला आहे. विश्वास असणाऱ्यांना बक्षीस मिळेल, तर अविश्वास असणाऱ्यांना कठोर शिक्षा भोगावी लागेल. अल्लाहच्या आयतींकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना यातना भोगाव्या लागतील असा संदेश दिला आहे.

(English from the Sahih International translation)
Surah 32 (As-Sajdah) Verse 22:
And who is more unjust than one who is reminded of the verses of his Lord; then he turns away from them? Indeed We, from the criminals, will take retribution.

सूरह ३२ (अस-सजदा) आयत २२:
"आणि जो एखाद्या व्यक्तीला त्याच्या रब्बाच्या आयतींपासून स्पष्ट सुचना मिळाल्यानंतरही अडथळा आणतो, त्यापेक्षा अधिक अत्याचारी कोण आहे? निश्चितच आम्ही अत्याचाऱ्यांना योग्य शिक्षा देणार आहोत."

कुराणातील ३२.२२ ही एक महत्त्वपूर्ण आयत आहे जी अल्लाहच्या संदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना आणि त्याच्या निशाण्या नाकारणाऱ्यांना गंभीर चेतावणी देते. ही आयत विशेषतः त्या लोकांना उद्देशून आहे जे कुराणाच्या संदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात किंवा त्याचा अवमान करतात. अल्लाहच्या न्यायाची आणि गुन्हेगारांना शिक्षा देण्याच्या वचनाची पुष्टी ह्या आयातीत आहे. करतो. म्हणजे जे लोक जाणीवपूर्वक अल्लाहच्या मार्गदर्शनाला नाकारतात आणि सत्याचा अवमान करतात. अल्लाह अशा लोकांना त्यांच्या कृतींचे परिणाम भोगण्यास भाग पाडेल, मग ते या जगात असो किंवा परलोकात. निश्चितच, आम्ही गुन्हेगारांवर सूड घेऊ असा संदेश आयातीत आहे. ह्या आयातीचा ऐतिहासिक संदर्भ जरी वेगळा असेत तरी ही आयात जिहादी तत्वांमध्ये आत्मविश्वास निर्माण करत नसतील कशावरून? जे अल्लाह ला नाकारतात त्यांना शिक्षा देऊन सूड घेऊ! थोडक्यात शिक्षा देऊन आपण अल्लाहप्रति निष्ठा व्यक्त करतोय असं तर जिहाद्यांना शिकवलं नसेल?

कुराणमधील सूरह ३३ अल-अहज़ाब मदिना येथे अवतरली. "अल-अहज़ाब" म्हणजे "संघटित गट" किंवा "संघ". या सूरह मध्ये प्रेषित मुहम्मद यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना, विश्वास ठेवणाऱ्यांसाठी मार्गदर्शन, सामाजिक सुधारणा, आणि इस्लामच्या शत्रूंविरुद्ध दृढता यावर संदेश दिलेले आहेत. खाली सूरह अल-अहज़ाबचे मराठीत सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.

(English from the Sahih International translation)
Surah 33 (Al-Ahzab) Verse 61:
Accursed wherever they are found, [being] seized and massacred completely.

सूरह ३३ (अल-अह्झाब) आयत ६१:
"जेथे जेथे ते सापडतील, तेथे त्यांना शाप दिला जाईल. त्यांना पकडले जाईल आणि निर्दयतेने ठार मारले जाईल."  

कुराणातील ३३.६१ आयतमध्ये अल्लाह मुनाफिक (ढोंगी) आणि विश्वासघात करणाऱ्यांबद्दल कठोर शब्द वापरतो. जे मुस्लिम समुदायाच्या एकतेला आणि सुरक्षेला धोका निर्माण करत होते. त्यांच्यावर अल्लाहचा शाप आहे; जिथे कुठे ते सापडतील, तिथे त्यांना पकडले जाईल आणि ठार मारले जाईल. थोडक्यात या आयातीची तत्कालीन पार्श्वभूमी जरी वेगळी असली तरी काफिरांना ठार मारण्यासाठी आदेश जिह्याद्यांना देण्यात ये नसेल कशावरून?

कुराणमधील सूरह ४१ फुस्सिलत मक्का येथे अवतरली. या सूरहचे नाव "फुस्सिलत" म्हणजे "स्पष्टपणे समजावून सांगितले". या सूरहमध्ये कुराणच्या संदेशाचे स्पष्ट आणि तपशीलवार वर्णन आहे. ही सूरह अल्लाहच्या एकत्वाची (तौहीद) शिकवण, कुरआनचे महत्त्व, प्रेषित मुहम्मद यांचे संदेश, प्रेषितांच्या संदेशाला नाकारणाऱ्यांचे परिणाम आणि अविश्वास ठेवणाऱ्यांना (काफिरांना) इशारा आणि त्यांच्यासाठी नरकाची शिक्षा याबद्दलचे स्पष्टपणे संदेश आहेत.

(English from the Sahih International translation)
Surah 41 (Fussilat) Verse 27:
"But We will surely cause those who disbelieve to taste a severe punishment, and We will surely recompense them for the worst of what they used to do."

सूरह ४१ ( फुस्सिलत) आयत २७:
"मग आम्ही या काफिरांना कठोर शिक्षा देऊ. आणि त्यांनी केलेल्या सर्व वाईट कृत्यांचे आम्ही त्यांना बदला देऊ."

कुराणातील आयत ४१.२७ मध्ये अल्लाह स्पष्टपणे सांगत आहे की, जे लोक सत्य नाकारतात त्यांच्यासाठी शिक्षा अपरिहार्य आहे. ही शिक्षा अल्लाहकडून येईल आणि ती निश्चित आहे. त्यासाठी "शदीद" म्हणजे अत्यंत तीव्र आणि कठोर शिक्षा दिली जाईल. कारण कुफ्र केल्यामुळे म्हणजे अल्लाहच्या एकत्वावर, त्याच्या संदेशावर किंवा प्रेषितांवर विश्वास न ठेवल्यास काफिर शिक्षेस पात्र आहेत 

(English from the Sahih International translation)
Surah 41 (Fussilat) Verse 28:
That is the recompense of the enemies of Allah – the Fire. For them therein is the home of eternity as recompense for what they, of Our verses, were rejecting.

सूरह ४१ (फुस्सिलत) आयत २८:  
"हे अल्लाहच्या शत्रूंचे बदला आहे—नरक. त्यांच्यासाठी तेथे शाश्वत वास्तव्य असेल, कारण त्यांनी आमच्या आयतींचा इन्कार केला."  

कुराणातील ४१:२८ मध्ये अल्लाहच्या शत्रू विषयी भाष्य करते. अल्लाहच्या शत्रूंना दुःखद शिक्षा मिळेल ते म्हणजे नरक! नरक ही अविश्वास आणि अहंकाराची अंतिम किंमत असते. तेथे काफिरांना शाश्वत निवासस्थान मिळेल. ही शिक्षा त्यांच्या अविश्वासाच्या बदल्यात आहे, कारण ते इस्लामच्या चिन्हांवर, आयातींवर वाद घालतात. थोडक्यात काफिरांना नरकात पाठवणे हीच शिकवण जिहादी तत्वं घेत असतील का?

कुराणमधील सूरह ६६ अत-तहरीम मदिना येथे अवतरली. या सूरहचे नाव "अत-तहरीम" म्हणजे "निषिद्ध करणे". या सूरहमध्ये इस्लामच्या शत्रूंविरुद्ध दृढ भूमिका घेण्याचा आदेश आहे.

(English from the Sahih International translation)
Surah 66 (At-Tahrim) Verse 9:
O Prophet, strive against the disbelievers and the hypocrites and be harsh upon them. And their refuge is Hell, and wretched is the destination.

सूरह ६६ (अत-तहरीम) आयत ९:
"हे पैगंबर, काफिर आणि मुनाफिक (दुटप्पी) लोकांविरुद्ध संघर्ष करा आणि त्यांच्याशी कडक वागा. त्यांचे अंतिम ठिकाण नरक असेल, आणि तो वाईट परिणाम आहे."

कुराणातील ६६.९ आयात काफिरांविरुद्ध आणि मुनाफिकांविरुद्ध (ढोंगी लोकांविरुद्ध) जिहाद कर आणि त्यांच्याशी कठोरपणे वागण्याचा संदेश देते. इस्लामच्या शत्रूंविरुद्ध दृढ आणि कठोर भूमिका घेण्यास सांगितले आहे. हा आदेश इस्लामच्या प्रसाराच्या आणि त्याच्या शत्रूंविरुद्ध जिहाद संदर्भात आहे. "कुफ्फार" म्हणजे काफिर, जे अल्लाह आणि त्याच्या संदेशाला जाणीवपूर्वक नाकारतात. काफिर आणि मुनाफिक यांच्यासाठी परलोकात नरकाची शिक्षा निश्चित असल्याचे सांगितले आहे. "बिअस" म्हणजे अत्यंत वाईट. नरक हे काफिर आणि मुनाफिक यांच्यासाठी अत्यंत भयानक आणि दुखदायक ठिकाण आहे. थोडक्यात काफिरांना नरकात पाठवणे हेच जिहादी तत्वांना शिकवलं जातं हे सिद्ध होते.

बुधवार, ५ मार्च, २०२५

एकविसाव्या शतकाची गद्धेपंचवीशी!

एकविसाव्या शतकाची गद्धेपंचवीशी!

एकविसाव्या शतकाची अडीच दशकं सरली. गेल्या पंचवीस वर्षात साहित्य, चित्रपट, नाटक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रात नेमका काय बदल घडला याचा धांडोळा घेण्यासाठी हा लेख. खरंतर राजकीय बाबींवर धांडोळा घ्यायची इच्छा आहे मात्र राजकीय क्षेत्र गेल्या अडीच दशकांत इतकं चिखलाने बरबटलेले आहे की त्यावर कितीही चर्चा करा, कितीही लिहा, कितीही वाद घाला, कितीही रवंथ केले तरी 'परिस्थिती जैसे थे' राहणार आहे. त्यामुळे शक्यतो राजकीय परिप्रेक्ष्यात न पाहता विशेषतः मराठी साहित्य, चित्रपट, नाटक वगैरे या अनुषंगाने लिखाण करायची इच्छा आहे. गेल्या पंचवीस वर्षात मराठी चित्रपट, नाटक आणि साहित्य याविषयी खूप वेगवेगळ्या स्तरातून वेगवेगळ्या टोकाच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. विशेषतः समाज माध्यमातून आपली मते ठोकून देणे हे एक राष्ट्रीय आद्य कर्तव्य आहे आणि हे बजावलंच पाहिजे असा सामाजिक प्रवाह सध्या मजबूत झाला आहे. 


लेखाची सुरुवात करण्यापूर्वी काही गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात. २००० नंतरच्या काळात जे काही बदलत गेले ते बघणं सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग आहे. २००० आधी चित्रपट, नाटक, साहित्य वगैरे क्षेत्रात स्वातंत्र्यपूर्व, स्वातंत्र्योत्तर, साठोत्तरी, नव्वदी वगैरे शेलक्या शब्दांत वर्णन करण्यासाठी काहीतरी ऐवज होता. त्यातही पंचवीस वर्षापूर्वी अशी शाब्दिक बिरुदावली बऱ्यापैकी साहित्यात वावरत होती. आज २०२५ सुरू झाले आणि प्री कोरोना आणि पोस्ट कोरोना ही बिरुदावली वाढली. या लेखात गेल्या पंचवीस वर्षांत विशेषतः सिनेमात बरेच बदल झाले. एक पडदा चित्रपटगृह ते मल्टिप्लेक्स. नंतर मोबाईल मध्ये आलेले ओटीटी प्लॅटफॉर्म. त्यामुळे या तीनही माध्यमातून सिनेमानं खूप वेगवेगळे प्रेक्षकवर्ग तयार केले. नाटकाची जी काटकसर करायची सवय होती ती तशीच आहे कारण व्यवसायिक आणि प्रायोगिक रंगभूमी ही अजूनही मध्यमवर्गीय संसार करतात तसाच नाट्यसंसार करत आहेत. ठराविक साच्यातील विषयावर कधीकाळी नाटकं होत असत. गेल्या पंचवीस वर्षांत जूनीच नावाजलेली नाटक नवीन संचात रंगभूमीवर आणली. प्रायोगिक नवनव्या प्रयोगांना गवसणी घालत शहरं, तालुके, गावपातळीवर तगून आहेत. गेल्या पंचवीस वर्षांत मात्र कलाकारांना टिव्ही सिरियल्स, सांस्कृतिक कार्यक्रम, युट्यूबवर, फेसबुकवर रील्स,व्हिडिओ वगैरे मुळं भरपूर एक्स्पोजर मिळाले आहे. ज्यामुळे गुणी कलावंत तर पुढे आलेच. सोबत टाकाऊ माल पण घाऊक प्रमाणावर बाजारात उपलब्ध झाला. चित्रपट क्षेत्रात कधीकाळी फक्त मुंबई, पुणे, कोल्हापूर वगैरे भागांत असणाऱ्या मंडळींना बघायची सवय होती. नंतर मात्र महाराष्ट्रातील खेडोपाड्यातून आलेल्या नट, कलाकार, दिग्दर्शक लोकांनी मराठी भाषेत अस्सल मातीतील विषय, आशय आणि उत्तम मनोरंजन होईल असे प्रयोग केले. गेल्या काही दशकांत केवळ सिनेमाच्या कंपू पुरता मर्यादित असलेले फिल्म्स फेस्टिवल बऱ्याच ठिकाणी सुरू झाले आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सिनेमांची मेजवानी वगैरे म्हणतात तशी सोय कित्येक ठिकाणच्या लोकांची झाली. जगभरातील सिनेमे कधीकाळी फक्त आणि फक्त अभ्यासक, कलाप्रेमी लोकांना सहजासहजी उपलब्ध होत असत. मात्र सोशल मीडिया मुळं किंवा ओटीटी प्लॅटफॉर्म मुळं सर्वसामान्य जनतेला टिचकीवर उपलब्ध झाले. अर्थातच प्रेक्षकांना नवनवीन प्रयोग, तंत्रज्ञान आणि विषय वगैरेचे पर्याय इतके उपलब्ध आहेत की सिनेमाला प्रेक्षकांपर्यंत पोचावे लागत आहे. भरपूर प्रमाणात पर्याय उपलब्ध असल्याने प्रेक्षकही चुझी झाले आहेत. अर्थातच कंटेंट चांगला असेल तर प्रेक्षक सिनेमा उचलून घेतातच. तसंच साहित्याचे झाले आहे. 


कधीकाळी लायब्ररीत जाऊन पुस्तक वाचणारी एक तरुण पिढी होती. वाचकप्रेमी कुटुंबात पण लायब्ररी सदस्य असायचे. मात्र ऑनलाईन ब्लॉग, पोर्टल, ईबुक्स चा पर्याय उपलब्ध झाल्याने फार नवनवीन विषयावर लिहिले गेले. सोशल मीडियावर चर्चा, वादविवाद झाले. साहित्यात गेल्या दोन दशकभरात सेल्फ हेल्प वरची पुस्तके मराठीत प्रकाशित करण्याची जी टूम आली ती थांबायचं नाव घेईना. तसंही पुस्तके छापायचे प्रमाण पूर्वीपेक्षा अधिक वाढले. कारण तशा संधी मिळत गेल्या नवनवीन प्रकाशन संस्था गावोगावी झाल्याने. कधीकाळी सरकारी सवलती ने छपाईचा कागद मिळाले की बरीचशी पुस्तके प्रकाशित केली जायची. नंतर पुस्तक छपाई हाच व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक तरुण, लेखक, तज्ञ नवं तंत्रज्ञान घेऊन पुढे आले. त्याचा नवीन चकचकीत पुस्तकं हाताळण्याचा अनुभव वाढला. कॉफी टेबल बुक सारखी चकचकीत पुस्तकं कधीतरी बघणाऱ्या लोकांना अशा नवीन दमाच्या मंडळींनी नवनवीन प्रयोग करून वेगवेगळ्या विषयांवर पुस्तके उपलब्ध करून दिली. अर्थातच यात साहित्य किती आणि माहितीपर पुस्तके किती हा वादाचा विषय आहे. 


नाटकाची निर्मिती ही पदरमोड करून समाजासाठी काहीतरी देणं लागतो वगैरे म्हणून करणारी मंडळी पुर्वीच्या काळात होतीच होती. सध्या पण आहेतच. मराठी व्यवसायिक नाटकं ही म्हणजे फक्त विनोदी नाटके हे एक उगाचंच ठसवले गेलेले नॅरेटिव्ह कोलमडून पडले. नवनवीन आशय, विषय घेऊन प्रायोगिक असो वा व्यवसायिक नाटकं वाढली. प्रेक्षकांना भावली. मात्र नागरीकरण जसे वाढले तसे उपलब्ध नाट्यगृह वाढली नाहीत. जी होती, आहेत आणि नवीन झालेली केवळ सरकारी बजेट मध्ये तरतूद केली म्हणून झाली. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात जिल्हा पातळीवर जी नाट्यगृह आहेत तिथल्याच लोकांपर्यंत नवनवी प्रयोग पोचले. तालुका पातळीवर नाटक केवळ स्पर्धा, संमेलने, सांस्कृतिक कार्यक्रम आणि इव्हेंटबाजी याचाच आधार घ्यावा लागला. व्यावसायिक नाटकांनी मात्र गेल्या पंचवीस वर्षात नवीन प्रेक्षकवर्ग तयार केला. शिवाय नाट्य, चित्रपट आणि माध्यमांशी निगडित शैक्षणिक व्यवस्था, वेगवेगळ्या संस्था आणि वर्कशॉप्स वाढल्याने प्रोफेशनल ऍटिट्यूड वाढला. ही खूप जमेची बाजू. प्रशिक्षण घेऊन आलेल्या नव्या दमाच्या मंडळींनी नाटक असो वा सिनेमा करताना फक्त स्वतःचं जगणं मांडले नाही तर नवनवीन ग्रहण केलेले सादर केले. उदाहरणार्थ परदेशी चित्रपटाचे विषय आपल्या मातीत कसे होतील याचा विचार केला. असे प्रयोग प्रेक्षकांना आकर्षित करतात. एकेकाळी परदेशी चित्रपट बघणं म्हणजे ठराविक वर्गातील लोकांना सहज शक्य होते. त्याची व्याप्ती वाढल्याने प्रेक्षक सिनेमा केवळ निखळ मनोरंजनासाठी न बघता चिकित्सा करण्यासाठी बघू लागला. त्यात जातीपातीच्या चष्म्यातून बघणाऱ्या लोकांना जास्त संधी मिळाली. तसंही तिकडचं साहित्य, सिनेमा कसा कसदार, कलात्मक वगैरे असतात अन् इकडचं सगळंच भोंगळ अन् रटाळ बोलणारे त्याकाळी पण होते. आताशा त्यांना मतं ठोकून द्यायला रान मोकळं मिळाले आहे. आम्ही कसे अभिरुची संपन्न वगैरे आहोत याचा टेंभा मिरवणारे असतातच. 


बायोपिक सिनेमा विषयी मात्र बरीच उलथापालथ झाली आहे. २००१ साली आलेल्या अमोल पालेकर यांच्या ध्यासपर्व ने चरित्रविषयक चित्रपटाची एक उत्कृष्ट सुरुवात केली होती. नंतर मराठी भाषेत कलात्मक वगैरे फक्त फेस्टिव्हलमध्ये जाणारे सिनेमे लोकांना विशेष आवडू लागले. तसा हुकुमी प्रेक्षकवर्ग तयार होऊ लागला. एकूणच व्यावसायिक गणिते आणि सिनेमाच्या बजेटचा वाढता आलेख पाहता नवनवीन प्रयोग होऊ लागले. हे स्वागतार्ह. सर्वात जबरदस्त बदलली ती मराठी सिनेमाची दृश्यप्रतिमा. सिनेमॅटिक फ्रेम म्हणूया! उंची निर्मितीमुल्ये, आधुनिक कॅमेरा आणि इतर बदललेल्या तांत्रिक गोष्टींमुळं सिनेमा देखणा झाला. तीच गत सिरियल्स ची. कमी प्रमाणात होणाऱ्या मराठी सिरियल्स नंतर नवनवीन चॅनल आल्यानंतर धोधो वाहू लागल्या. उत्तम कथानक, दिग्दर्शन आणि लगेच संपणाऱ्या सिरियल्सचा प्रेक्षकवर्ग वाढला. मात्र टीआरपी मिळतो म्हणून चॅनल वालेच ठरवू लागले की काय अन् कसं दाखवायचे तेव्हा या सिरियल्स वगैरे या फक्त रतीब टाकण्याचा धंदा झाला. पालीला ओढूनताणून मगर दाखवायचा हा प्रकार! कथानक म्हणजे कळशीभर पाणी टाकून वाढवलेली पाचकळ आमटी. अशा एकसे बढकर एक डेली सोप ने गेली दोन दशकं घुसळून निघाली. मात्र या सिरियल्स वगैरे मुळं गावागावांतील कलाकार मंडळींना फुटेज मिळाले हे पथ्यावर पडलं. त्यामुळे घरातल्या टिव्हीवर चकाचक गावं दिसू लागली. यातच गावोगावच्या लोकांना आकर्षित करण्यासाठी देवदेवतांच्या कथा, संत, स्वामी, अध्यात्मिक बाबा-बुवा, ऐतिहासिक पात्रे वगैरे मान्यवरांच्या गोष्टी सिरियल्सच्या माध्यमातून घरोघरी पोचल्या. त्यामुळे एक वेगळीच धंदेवाईक इंडस्ट्री तयार झाली. अशा सगळ्या गोष्टींचा प्रभाव नकळतपणे महाराष्ट्रात बहुसंख्य असणाऱ्या बहुजनांवर पडला. कारण एक उगाचंच पसरवलेलं मिथक होतं कलाक्षेत्रात फक्त आणि फक्त भटबामणांचा बोलबाला आहे म्हणून. त्याला फाटा मिळाला गेल्या दोन दशकांत बदललेल्या टिव्ही इंडस्ट्रीमुळे.


सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या दशकभरात बदललेले समाजजीवन हे इव्हेंटबाजी मुळं सुटल्या सारखं झालं आहे. या इव्हेंट मॅनेजमेंट ने संमेलनं, भाषणं, व्याख्यानं, नाचगाणी वगैरेचे करमणुकीचे कार्यक्रम आणि हुल्लडबाजीचे बरबटलेले महोत्सव वगैरे गावागावांत पोचविले. त्यात राजकीय हस्तक्षेप झाल्याने सामाजिक जाणिवा रुंद होण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतात वगैरे हे ब्रीद धुळीस मिळाले. शहरातील मोकाट वाढलेल्या युवा नेत्यांनी शहराचे विद्रुपीकरण तर केलंच. शिवाय गावोगावच्या माननीय पुढाऱ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात जो थिल्लरपणा सुरू केला त्याला आता आवर घातला जावू शकत नाही. भारतात सणासुदीचा एक वेगळाच बारमाही माहौल असतो. त्यात भरकटलेल्या उत्सवी, महोत्सवी उन्मादाला पारावर उरला नाही. ना सामाजिक जाणीव राहिली ना सणांचं पावित्र्य. त्यामुळे एक बटबटीत नकोशी संस्कृती आली. ती लादली गेली का हा चर्चेचा विषय आहे. कधीकाळी असे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे लोकवर्गणीतून होत असत. राजकीय आकांक्षा वाढल्याने पैसा ओतला जाऊ लागला आणि लोकांना नकोशी वाटणारी सांस्कृतिक मुस्कटदाबी वाढली. यावर आता जनजागृती वगैरे करणं दुरापास्त झाले आहे. अशा सांस्कृतिक क्षेत्रात बोकाळलेल्या अनिष्ट प्रथा जरी असल्या तरी लोकसहभागातून बरीच दुर्लक्षित राहिलेल्या उत्तम कार्यक्रमांना मेन स्ट्रीट मध्ये म्हणावं तसं फुटेज मिळाले नाही. राजकीय हस्तक्षेप झाला की माती होते तर लोकसहभागातून जर कार्यक्रम झाला तर त्याचा किमान पातळीवर मर्यादित प्रभाव दिसतो.


सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात गेल्या दोन दशकांत एक हायली प्रोफेशनल इव्हेंट संस्कृती आली. पूर्वी एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन केले जात असे. आताशा इव्हेंट सेलेब्रेट होतो. अर्थातच धंदेवाईक आणि व्यावसायिक यात जमीन अस्मानी फरक आहे. 
कारण एखादा इव्हेंट कमर्शियली सक्सेसफुल झाला तर त्यावर बऱ्याच लोकांची उपजीविका चालते. एका बाबतीत नव्या पिढीला प्रोफेशनल अवेअरनेस खूप आहे हे जाणवतं. विशेषतः आर्थिक बाबतीत बरेच नवनवीन पर्याय उपलब्ध असल्याने चोखंदळ पणा जाणवतो. त्याचाच परिपाक म्हणून हा प्रोफेशनल अवेअरनेस वाढलेला असावा. तशीच कट थ्रोट स्पर्धा पण आहे टिकून राहण्यासाठी हे ही कारण असावे. कलाक्षेत्रातील संधी मिळणं आणि मिळालेली संधी वापरून स्वतःचं मार्केटिंग करणे हे जबरदस्त फॅक्सिनेटिंग आहे. याचा एकत्रित गोळीबंद परिणाम सुरुवातीला फक्त शहरी भागात जाणवत होता. आताशा तो गावपातळीवर पोचला आहे असं जाणवतं. कारण सांस्कृतिक वगैरे वगैरे छत्राखाली आज गावपातळीवरील कित्येक कलाकार, गट-तट बऱ्यापैकी आत्मविश्वासाने वावरताना दिसतात. कधीकाळी सिल्व्हर स्क्रीन किंवा टेलिव्हिजन ही प्रमुख दोन माध्यमातून जनतेपर्यंत पोचता येत होतं. मात्र सोशल मीडिया साधनं मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्या मुळे कित्येक नवनवीन रोजगाराच्या संधी सांस्कृतिक क्षेत्रात तयार झाला. अर्थातच दुसरी काळी बाजू शोषणाची वाढली हे खेदाने म्हणावे लागते. त्यात कंपू संस्कृती जी केवळ ठराविक लोकांपर्यंत मर्यादित होती ती आता सर्वसामान्य जनतेला पण दिसू लागली आहे. 


गेल्या पंचवीस वर्षात रिऍलिटी शो ने एकूणच सांस्कृतिक क्षेत्रातील कलाविषयक अभिरुची बथ्थड झाली आहे. कारण जे विकलं जातं ते खपवलं जातं. या आधीही हवशे नवशे गवशे वगैरे मंडळी होती. पण रिऍलिटी शोमधून त्यांना नको इतका मोठा कॅनव्हास मिळाला. त्यामुळे हेच खरं सांस्कृतिक कलासक्त जग आहे हे बिंबविलं गेले. काला क्षेत्रात सिद्ध होण्यासाठी आवश्यक असलेली किंवा मेहनतीने मिळवलेली पात्रता, कलेबद्दल असलेली आत्मीयता, रियाज, तपश्चर्या आणि सर्जनशील जाणीवा ह्या बरबटल्या. याचं कारण म्हणजे रिऍलिटी शो सारख्या कार्यक्रमामुळे स्पॉन्सर्ड, प्रॉक्टर्ड, स्क्रिप्टेड मालमसाला युक्त बारमाही रतीब टाकला जाऊ लागला. ह्या रिऍलिटी शोमुळे जे जे होतकरू तरुण होते ते तर भरडले गेलेच. पण नवनिर्मिती करण्याची प्राज्ञा असणारी मंडळी खपाऊ माल विकू लागल्या. त्यामुळे क्रिएटिव्हिटी वगैरे फक्त उत्कृष्ट कॉपी पेस्ट जो करेल त्याची ही संकुचित वृत्ती उदयास आली. कलाक्षेत्रातील संधी विस्तारल्या खऱ्या अर्थाने. पण अंधानुकरण करणाऱ्या लोकांचा बोलबाला झाला. जे काही वेगळं करू पाहतात त्यांना फुटेज मर्यादित मिळाले. याचा परिपाक म्हणजे पीआर एजंट संस्कृती तयार झाली. त्यामुळे कलाक्षेत्रात जे जे तयार होत होतं त्याचा भडीमार केला जाऊ लागला. त्यात भर पडली सोशल मीडिया साधनांची. मग कहर झाला. लोकांच्या अटेंशन स्पॅन मध्ये काहीही करून आपण आलो पाहीजेत. हाच इथल्या बाजाराचा नवा नियम झाला. कधीकाळी कलेसाठी जनता आसुसलेली असायची. नवीन सिनेमा,नाटक, गाणं बजावणं वगैरे गोष्टींची आतुरतेने वाट बघणारी एक पिढी होती. कलेचे साधक जसे होते तसे कलेविषयी आपुलकी असणारे कलाप्रेमी होते. कारण तुरळकच अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होत असे. आता मात्र भव्यदिव्य इव्हेंट सेलेब्रेट करण्यात येत असल्याने तादात्म्य हरवलं आहे. एवढ्या गदारोळात खऱ्या अर्थाने कलेसाठी धडपडतात ते जशी संधी मिळेल तशी कला जोपासतात. चांगला प्लॅटफॉर्म मिळाला तर प्रेक्षकांची वाहवा मिळवतात. 


सामाजिक बदल काय झाले त्याविषयी बोलू. सर्वात महत्त्वाचे बदल झाले ते मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले म्हणून. ते नोकरी, शिक्षणासाठी सर्वाधिक झाले. अर्थातच जागतिकीकरणाचे सगळे फायदे तोटे आपल्याला या पंचवीस वर्षात समजले. या काळात सर्वात स्वागतार्ह बाब लक्षात घेता येईल ती म्हणजे स्त्री घराबाहेर पडली. नोकरीसाठी, शिक्षणासाठी. त्यामुळे ती पुढारली. पंचवीस वर्षापूर्वी तर नोकरदार स्त्रिया बाबतीत आकडेवारी बघितली तर लक्षात येईल की सरकारी नोकरी मध्ये आणि पारंपरिक शिक्षणासाठी घराबाहेर पडणारी स्त्रीयांची संख्या तुलनेने कमी होती. मात्र गेल्या दोन दशकांत खूप मोठ्या ग्रामीण भागातील स्त्रिया नोकरी निमित्ताने, शिक्षणासाठी घराबाहेर पडल्या. स्वावलंबी झाल्या. एक प्रकारे सो कॉल्ड पुरुषप्रधान संस्कृतीला फाट्यावर मारत कित्येकींनी घरादाराची जबाबदारी संपूर्णपणे पेलली. वेगवेगळ्या स्तरातून येत अनेक क्षेत्रांत दखल घेण्याजोगी कामगिरी बजावली. स्वतःचं म्हणणं आत्मविश्वासाने मांडले. कित्येक सामाजिक पुचाट रुढी, प्रथा, परंपरा झिडकारल्या. बंडखोर स्त्री ही समाजाला समजली. अर्थातच अशाने अनेक संस्कृती रक्षकांना लागलीच कुटुंबव्यवस्था बाधित होण्यामागे पुढारलेली स्त्रीच दिसू लागली. कारण त्यांना संकुचित विचार सिद्ध करण्यासाठी हेच आयतं कोलित मिळते. मात्र स्त्री घराबाहेर पडली आणि विचाराने, शिक्षणाने पुढारली की नकळतपणे कुटुंब आणि समाज वेगळ्या दृष्टिकोनातून बदलतो. परंपरागत साचलेपण झिडकारता येतो. याचा परिणाम हा पुढच्या पिढ्यांना झाला. कारण शिकलेल्या स्त्रीच्या कुटुंबात एक प्रकारची आधुनिकता असते. निर्णय घेण्याची, कारभार चालवण्यासाठी आवश्यक असलेली सदसद्विवेकबुद्धी आणि आत्मनिर्भरता नकळतपणे स्त्री पुढच्या पिढीला हस्तांतरित करते. पुरुषप्रधान संस्कृतीत ही दुर्लक्षित राहिलेली गोष्ट होती. गेल्या दोन दशकांत मात्र स्त्री ही स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि स्वतःच्या विचारांना प्राधान्य देऊ लागली. अजूनही एक भाबडा समज पसरवला गेला की स्त्री घराबाहेर पडली की स्वैराचार वाढतो. मुळातच पुरुषी स्वैराचाराला झाकण्यासाठी आधुनिक स्त्रीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. एखाद्या कुटुंबात निर्णय घेण्याची कधीकाळी पुरुषांच्या मक्तेदारीला आव्हान या पंचवीस वर्षात मिळाले. हाच सामाजिक महत्वाचा बदल नव्या पिढीने स्विकारला. अर्थातच ह्याच काळात अनेक स्त्रियांनी व्हिक्टीम कार्डचा वापर केला हे नाकारता येणार नाही. त्यामुळे ढासळलेल्या लग्नसंस्था, कुटुंबसंस्था असो वा नातेसंबंध याला जबाबदार फक्त आणि फक्त पुढारलेली स्त्रीच असते असे नालायक अनुमान काढणे विकृतीचे लक्षण आहे. मुळातच लग्नसंस्था, कुटुंबसंस्था वा परस्पर नातेसंबंध ह्या गोष्टी वेगळ्या दृष्टिकोनातून बघितल्या पाहिजेत. विश्वास, गरजा, अवास्तव अपेक्षा आणि भावनिक आधार या बाबींवर खंडन मंडन झाले पाहिजे. प्रमाण वाढले म्हणून स्त्री ला जबाबदार धरणं कृतघ्नपणा आहे. लोकसंख्या वाढली की त्याचं प्रमाणात इतर गोष्टी वाढणारच. संस्कृती वाहक पुरुषामुळे आणि खराब झाली तर स्त्रीमुळे हे बैल बुद्धी लॉजिक आहे. अर्थातच नवीन तरुण पिढी ह्या सगळ्या संस्कृती विषयक सक्तीच्या बंधनांना फाट्यावर मारते. बंडखोरी करते हे खूप महत्त्वाचे. संस्कृती बंडखोरीमुळे बहरते. वाढते. डबक्यात साठलेले पाणी आणि वाहणारे पाणी तशीच संस्कृती, सभ्यता बघायला हवी. नवनवीन गोष्टी स्विकारण्याची, जोपासण्याची सुपीकता जर समाजात नसेल संस्कृतीत नसेल तर सामाजिक पतन ठरलेले असते.


सध्या मिलेनियल म्हणून जी पिढी आहे, क्रयशक्ती वाढलेली ती फार प्रिव्हिलेज्ड आहे. त्यामुळे त्यांची मानसिकता ही बुरसटलेली नाही. नवं स्विकारण्याची आणि बोथट रूढी परंपरा झिडकारून पुढे जाण्याची त्यांची मानसिक तयारी फार महत्त्वाची. कारण सर्वात जास्त व्यक्त होण्याची साधनं ह्यांना उपलब्ध आहेत. जगण्याकडे बघायचा वेगळा दृष्टिकोन आहे. त्यामुळे ही एकविसाव्या शतकातील स्वागतार्ह बाब आहे. शिवाय हल्ली नातेसंबंधात डेटिंग, लिव्ह-इन, डिंक्स (डबल इन्कम नो किड्स) सिच्युएशनशिप, बेंचिंग आणि नॅनोशिप सारखे तत्सम प्रवाह अंगवळणी पडले आहेत. त्यामुळे काय चूक काय बरोबर यावर काथ्याकूट न करता नवीन सामाजिक बदल म्हणून बऱ्यापैकी अंगवळणी पडले आहेत. अर्थातच हे जास्त जाणवतं शहरी भागात. कारण अस्ताव्यस्त नागरीकरणामुळे तुटले पणा जास्त जाणवतो. त्यात व्यसनं, सवयी वगैरे कवटाळल्या जातात. ह्या नव्या बदलांना ही तरुण पिढी गेल्या दशकभरात रुळली आहे. नवीन पिढीला जे काही जागतिक पातळीवर घडतं त्याचे अपडेट्स लागलीच समजतात. त्यामुळे त्यावर रिस्पॉन्स कमी रिऍक्शन्स जास्त येतात. तसंही सोशल मीडियामुळे इम्पलसिव्ह रिऍक्टिव्ह ऍग्रेशन ग्रस्त पिढी वाढू लागली. असंतुलित गोष्टी इतक्या वेगाने आदळत असल्याने शांतपणे विचार करून एखाद्या गोष्टीची शहानिशा न करता मत ठोकून देणे म्हणजे आद्य राष्ट्रीय कर्तव्य झाले आहे. त्यात फेक न्यूज, अफवा, सिलेक्टिव्ह पावित्रा आणि स्युडो नॅरेटिव्ह ने वातावरण दुषित झाले आहे. अशा सगळ्या कसोट्यांवर सामाजिक जाणीव कमी आक्रस्ताळेपणा वाढला आहे.


आर्थिक बाबतीत मात्र या पंचवीस वर्षात न भूतो न भविष्याति बदलांचा सुकाळ आला आहे. पारंपारिक रोजगाराच्या आधारावर पैसा कमावणे हे या दोन दशकांत मागं पडलं आहे. नवनवीन प्रयोग करून तंत्रज्ञान वापरून नवी पिढी अर्थ साक्षर झाली आहे. पैसा , वेळ आणि उत्पादकता वगैरे मुलभूत गोष्टींचं इकॉनॉमिक्स चांगले समजू लागले आहे. पैसा कमावण्यासाठी, पॅशन पूर्ण करण्यासाठी धडपड, नवनवीन रोजगाराच्या संधी, व्यवसाय, स्टार्ट अप, प्रोफेशनल कन्सल्टिंग वगैरे सारख्या नवनव्या चोखंदळ वाटा शोधून पुढं जाणारी पिढी आहे ही. त्यामुळे प्राथमिक, कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा कमावणारी एक पिढी होती. ती जूनी पिढी गुलामी पत्करुन राबणारी होती. बॉसिंग सहन करणारी होती. बहुतेक ही पिढी एक्सटर्नली ड्रिव्हन होती. नवीन पिढी इंटरनली ड्रिव्हन आहे. तरुण पिढीला पैसा कमावणे हे स्कील बेस्ड आहे हे समजलंय. त्यामुळे वयाची किमान काही दशकं नोकरी करून गुलामी पत्करुन जगणं मान्य नसलेली ही पिढी आहे. त्यामुळे स्थलांतर करून नवनवे मार्ग शोधणारी, धडपडणारी, आवडलं नाही तर मन मारत न कुढता नवीन पर्याय अंगिकारणारी नवीन पिढी आहे. आर्थिक बाबतीत सर्वात जास्त हुशार असलेली ही पिढी. पैसा फक्त जगण्यासाठी न कमावता वेल्थ, ऍसेट तयार करण्यासाठी कसा वापरता येईल ह्याचा प्रामुख्याने विचार करणारी पिढी आहे. त्यामुळे रोजगार म्हणजे तीस पस्तीस वर्षे नोकरी ही रुळलेली संस्कृती या दोन दशकांत नव्या दमाच्या तरुणांनी हाणून पाडली आहे. हा बदल सर्वस्वी महत्त्वाचा. हीच परिस्थिती ग्रामीण भागातील शेती क्षेत्रातील आहे. नवनवीन प्रयोग करणारी नवीन पिढी नवं तंत्रज्ञान विकसित करत वापरत काहीतरी करु पाहत आहे. ग्रामीण भागातून शहरी कनेक्ट वाढवत आहेत. तरीही शेती क्षेत्रात अजून बरेचसे बदल सरकारी कृपेमुळे होत आहेत. खाजगीकरण उदारीकरण जसं झाले उद्योगधंद्यात, कारखानदारी मध्ये, तसे कृषी क्षेत्रात कमी झाले. राजकीय आशिर्वादाने गुलाम असलेली एक शेतकऱ्यांची पिढी होती. जिने खूप मोठा अन्याय सहन केला. मात्र नवी पिढी नवनवीन बदल स्विकारत काहीतरी करु पाहत आहे. उद्यमी होत आहे. शेतीच्या कामासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. सरकार दरबारी असलेल्या मदतीशिवाय खाजगी मदत घेऊन उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. बदलांचे प्रमाण कमी असले तरी बदल होत आहेत. पारंपारिक शेती उद्योग काय टाकत आहेत हे महत्त्वाचे. हेच बदल देशातील अर्थव्यवस्थेत अमुलाग्र घडामोडीसाठी आवश्यक आहेत. कारण कृषीप्रधान देश म्हणून आपण ओळखले जातो.


सरतेशेवटी एवढं सगळं मांडल्यानंतर लक्षात येतं की, आज २०२५ मध्ये जी काही उरलीसुरली वय वर्षे ८० पार केलेली जागरूक मंडळी आहेत (कोरोनाच्या तडाख्यातून वाचलेली) त्यांनी खूप मोठी स्थित्यंतरे बघितली आहेत. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात जे घडलं ते अनुभवलं आहे. त्याच पिढीने नव्वदच्या दशकात ऐन चाळीशीत वेगाने होणारे बदल रिचवले आहेत. आज २०२५ मध्ये अतिशय वेगाने आणि आक्रस्ताळेपणा असलेल्या बदलांना पण सहन केले आहे. मुळातच वयाच्या या टप्प्यावर ह्या मंडळींनी जेवढा बदलणाऱ्या काळाचा पट अनुभवला आहे तो फारच मजेशीर आहे. संख्यात्मक आकडेवारी खूप कमी असेल या पिढीतल्या लोकांची. मात्र साहित्य, चित्रपट आणि नाटक या क्षेत्रात घडलेल्या बदलांचा आवाका मोठा आहे. थोडक्यात यांनी पचवलं खूप काही पण जे योगदान दिले ते लोकांपर्यंत पोचण्यासाठी खूप मोठा कालावधी लागला. तसा कालावधी नंतरच्या पिढीला कमी मिळत गेला. उदाहरणार्थ २०२५ मध्ये साठी पार केलेली एक पिढी जी बहुसंख्य सरकारी किंवा निमसरकारी नोकरी मध्ये जोपासली तर चाळीशीत असणारी पिढी बहुतेक खाजगीकरण उदारीकरण वगैरे मुळं मिळालेल्या संधी जोपासणारी आहे. जी पिढी विशीत आहे तीला मात्र एक नवं कल्चर लाभलं आहे. त्यामुळे साठी पार केलेली एक पिढी हळूहळू युझ्ड टू झाली नवनवीन बदलांना. त्यापेक्षा जास्त पर्याय नसल्याने चाळीशीत वावरणाऱ्या पिढीला नवे बदल आत्मसात करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. आता विशीतील्या पिढीला गायडेड मिसाईल प्रमाणे पुढे जावं लागणार आहे. अनगायडेड मिसाईल अनकंट्रोल होते त्याच पद्धतीने विशीतल्या पिढीला वापरण्यासाठी अनेक सुप्त धष्टपुष्ट व्यवस्था टपून बसलेल्या आहेत. भविष्यात ही गद्धेपंचवीशी (गद्देपंचवीशी?) संपल्यावर काय होणार हे बघणं औत्सुक्याचे आहे.

तूर्तास एवढेच.

लेखन विश्रांती!


©भूषण वर्धेकर 
५ जानेवारी २०२५
पुणे - ४१२११५

शनिवार, १ मार्च, २०२५

विडंबन

विडंबन

कुणी ट्रम्प घ्या, कुणी झेलिन्स्की घ्या 
या रे पत्रकारांनो, या रे या
आंतरराष्ट्रीय हा आनंद घ्या
वाढीव बाचाबाचीचा बाईट घ्या 

युद्धात फवारतो छुप्या कंड्या, ऑन कॅमेरा बरळतो रे
विश्वाचे भाग्य उद्याचे बोलून नासवतो
शांतता वाद्यांना फाट्यावर मारुन रे हा इव्हेंट करतो
बडबडीचा लाईव्ह कास्ट घ्या 
उन्मादाचा दृष्टांत घ्या 

चार खंडांचे वैश्विक आत्ममग्न नेते सिंहासनी
खाणं कामांचे टेंडर हे डुलत्या महाशक्ती पदी
बरळा बोंबला ट्रम्प च्या नावाने ठोठो करूनी
युद्धाचा तडका बघा
शांततेचा हा फार्स बघा

 
©भूषण वर्धेकर 
२ मार्च २०२५
पुणे 

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२५

'छावा'च्या निमित्ताने...

छावा सिनेमा प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले तरी एकूणच सिनेमाबद्दल परीक्षण, समीक्षण, समर्थन आणि विरोध वगैरे सोशल मीडियावर अविरतपणे चालू आहे. चित्रपट का बघावा?, की नको?, बघायला कसा आहे सिनेमा?, चांगला आहे का वाईट आहे? याच्याबद्दल बोलणं, लिहिणं हे होतच राहील. कारण सिनेमा प्रदर्शित झाला आणि प्रमोशन, मार्केटिंगमध्ये जोर आला. मूळ मुद्दा येतो इतिहासाकडे बघण्यासाठी आपल्याकडे ती दृष्टी आहे का? आत्ताच्या काळात सहाशे सातशे वर्षांपूर्वी काय घडलं होतं किंवा तीनशे चारशे वर्षांपूर्वी काय घडलं होतं? वगैरे वर आपण किती काथ्याकूट करायचा याचा विचार केला पाहिजे. इतिहास जो सांगितला जातोय तो मुळातच वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघितला गेला पाहिजे. कारण इतिहास लिहिताना कोण कोणत्या नजरेतून पाहतो त्यानुसारच नोंदविला जातो. प्रत्येक विचारसरणीच्या व्हर्जनमध्ये ऐतिहासिक प्रसंग रेखाटले जातात. उदाहरणार्थ मराठा किंवा हिंदवी साम्राज्याचा कालावधीचा १६३० ते १८१८ असा ऐतिहासिक उल्लेख आहे. त्याकाळी मुस्लिम शासक भारतात राज्य करत होते. त्याच काळात मुघल,आदिलशाही, निजामशाही वगैरे साम्राज्य अस्तित्वात होते. ऐतिहासिक प्रसंग रेखाटले जातात ते संशोधन करून. त्या त्या साम्राज्याचा विस्तार कसा झाला तो करताना काय काय घडलं ह्याची नोंद तत्कालीन ऐतिहासिक कागदपत्रांच्या सहाय्याने पडताळा येते. याचबरोबरीने पुर्वापार चालत असलेल्या मौखिक परंपरेने जे जे सांगितले जाते ते उदाहरणार्थ लोककथा, दंतकथा, लोककला किंवा बोलीभाषेतील गद्य पद्य रचना यामार्फत लोकांपर्यंत पोचतं. या सगळ्या गोष्टींचा उपयोग चित्रपट, साहित्यात, नाटकात आजपर्यंत अनेकदा झाला आहे. पण चित्रपट, साहित्य किंवा नाटक हे रंजकता आणल्याने वाचणाऱ्याला, बघणाऱ्या लोकांना आकर्षित करतात. संशोधन करून इतिहास लिहिताना रंजक व्हायला पाहिजे म्हणून लिहिला जात नाही. तो सत्यता पडताळून, उपलब्ध माहितीनुसार अधिकृत नोंदी अभ्यासून विचारपूर्वक लिहिला जातो. विवेकी पद्धतीने लिहिला जातो. आता मूळ मुद्दा येतो तो लिहिणारे नेमके कोणत्या मानसिकतेचे आहेत? विचारसरणीचे आहेत? कारण इतिहास जर डाव्या विचारसरणीच्या लोकांच्या दृष्टीने लिहिला तर ते त्यांच्या सद्सद्विवेक बुद्धीला जे पटेल तेच लिहिणार. तीच गोष्ट उजव्या विचारसरणीच्या लोकांची. तत्सम काही द्वेष मनात धरून लिहिणारे आणि संशोधन करणारे पण वाढले आहेत राजकीय फायद्यासाठी हे नाकारता येणार नाही. अशावेळी इतिहासात नेमकं काय खरं होतं नि काय खोटं हे तपासण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. कारण अशी यंत्रणा उभी करण्यासाठी निष्पक्षपाती राजकीय आणि विवेकी  सामाजिक लोकांची गरज आहे. सध्यातरी ह्या दोन्ही प्रजाती दुर्मिळ. त्यामुळे इतिहासाचा अभ्यास करायचाच असेल तर जे जे उपलब्ध आहे ते ते म्हणाले बखरी, शकावली, तत्कालीन पत्रे, नोंदी, परदेशी प्रवासी येऊन गेले त्यांचं लिखाण आणि समकालीन साम्राज्यातील, संस्थानांतील जे कोणी इतिहासकार होते त्यांचं लिखाण पण महत्वाचे. भारतात तरी ऐतिहासिक उपलब्ध साधनांचे म्हणावे तसे संशोधन झाले नाही की जतनासाठी प्रयत्न झाले नाही. कारण इंग्रज येण्याआधी असलेली शैक्षणिक व्यवस्था आणि इंग्रजांच्या काळात लागू झालेली शिक्षणव्यवस्था यात जमीन अस्मानी फरक आहे. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टींचा विचार केला तर संभाजी महाराज यांची खरीखुरी माहिती ही १९६० नंतर डॉ कमल गोखले यांच्या पुस्तकांतून सर्वसामान्य जनतेला समजली. त्याआधी वा. सी. बेंद्रे यांच्या योगदानाबद्दल चर्चा नाही झाली तर तो कृतघ्नपणा ठरेल. बखरी मध्ये आढळणाऱ्या नोंदी या इतिहासाची साक्ष वगैरे नसून तो केवळ लिखित दफ्तरदारी दस्तावेज एवढंच त्याच मूल्य. चिटणीस बखर मध्ये संभाजी महाराज यांच्या बद्दल बदनामीकारक मजकूर आहे. त्यामुळे विसाव्या शतकाच्या सुरुवातीस जे जे साहित्य वा नाटकं लिहिली त्यात संभाजी महाराज यांच्या बाबतीत असेच उल्लेख आढळतात. महत्त्वाचे ऐतिहासिक प्रसंग वा घटना डोळ्यासमोर ठेवून आजवर मराठीत अनेक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. नाटकं रंगभूमीवर सादर केली आहेत. त्यात मनोरंजन हाच मुख्य हेतू आहे. तेच चित्रपटांचेही. मुळातच चित्रपट तयार करणं मोठं खर्चिक आणि त्यातून लोकांना दिग्दर्शकाचा 'पॉईंट ऑफ व्ह्यू ' सांगणं/ दाखवणं हे महत्त्वाचे. साहित्यात लेखकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचा. नाटकात नटाने साकारलेल्या पात्राचा प्रभाव किती हे महत्त्वाचे. त्यामुळे माध्यमातून ऐतिहासिक प्रसंग दाखवले गेले म्हणजे सत्यप्रतिशत इतिहास सांगितला असं होतं नाही. चित्रपटातून दिग्दर्शकाला जे भावतं जे जाणवतं ते प्रेक्षकांच्या पुढ्यात ठेवलं जातं.


छावा चित्रपटात मध्यंतरापर्यंत चित्रपट रेंगाळलेला आहे असं जाणवलं मात्र नंतर युध्दाच्या प्रसंग, टॉर्चर सीन्स अंगावर येणारे आहेत. अभिनयाच्या बाबतीत अक्षय खन्ना, विकी कौशल ने बाजी मारलेली आहे. रश्मिका मंधांना फारच मिळमिळीत वाटते. सहकलाकार दमदार आहेत. संगीत अजून चांगले झाले असते. ऐतिहासिक युद्ध पडद्यावर दाखवणं कठीण. त्यातही जे दाखवलं जातं त्यात प्रेक्षकांना खिळवून ठेवले पाहिजे. दक्षिणेकडील चित्रपटांतून हे अनेकदा बघितले होते. हिंदी सिनेमात असे प्रसंग लार्जर दॅन लाईफ पद्धतीने दाखवून कित्येक चित्रपट हास्यास्पद झाले आहेत. छावातील युद्धं पडद्यावर बघितल्यावर काहीतरी मिसिंग असल्याचं वाटतं. कथा मधल्यामध्ये तुकड्या तुकड्यांनी लिहिल्या सारखी वाटते. कदाचित वेळेची मर्यादा असणं हेही कारण असावं. त्याचप्रमाणे किती लढाया दाखवणं, कशा पद्धतीने दाखवणं हे दिग्दर्शक ठरवतो. छावाची सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे. व्हीएफएक्सचा वापर पण आताशा बघितल्या बघितल्या लगेच कळतो (थॅन्क्स टू राजमौली). शेवटच्या प्रसंगात डायलॉगबाजी, क्रूरतेने केलेला छळ, अभिनय वगैरे प्रभावित करतात. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात लक्ष्मण उत्तेकर १००% यशस्वी झाले आहेत. ऐतिहासिक चिकित्सा न करता सिनेमा पाहणं महत्त्वाचं. लोकांना आवडतो कारण लोकांपर्यंत ठराविकच गोष्टी जाणूनबुजून आणल्या जातात. मग एकदम असं झालं होतं का हे बघितल्यावर प्रेक्षकांना भावतं. लिहिले गेलेले काही हजार, लाख वाचकांपर्यंत पोचतं. चित्रपट बघाणाऱ्या लोकांची संख्या कोटींहून जास्त आहे. त्यामुळे नाटकं, कादंबरी वगैरेंची प्रभावक्षेत्र मर्यादित आहेत. मात्र सिनेमा हा तळागाळापर्यंत पोचतो. याचं कारण पाचशे रुपये खर्च करून कोणी पुस्तक विकत घेऊन वाचणारे असतील तर त्यापेक्षा जास्त पाचशे रुपये खर्च करून तिकिट खरेदी करून चित्रपट पाहणारे असतात. त्यामुळे शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीत संभाजी महाराज यांना क्रूरतेने छळले आणि मारले. हे वर्णन आणि चित्रपटात दाखवण्यात आलेले दृश्य चित्रण यात नक्कीच फरक पडणार. दृश्ये पाहून आणि लेखन वाचून दाहकता उभी करणं ही वेगवेगळी आयुधे आहेत. सध्यातरी सिनेमा प्रदर्शित झाला आणि ज्यांना संभाजी महाराज यांच्या बद्दल फारशी माहिती नाही अशी बरीच भोळी भाबडी जनता आहे त्यांना छावा अपील झाला. त्यात प्रमोशन वगैरे धुवांधार झाले त्यामुळे मेडिया मार्फत अनेकांपर्यंत पोचला. जनतेला चित्रपट आवडल्या शिवाय डोक्यावर घेत नाहीत. नाही आवडला तर चित्रपट सपशेल आपटतात. छावा चालतोय, लोकांना आकर्षित करतोय कारण बऱ्यापैकी टू द पॉईंट गोष्टी दाखवल्या आहेत. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतील सगळ्याच महत्त्वाच्या घटना एकाच सिनेमात दाखवण्यासाठी अट्टाहास केला नाही. पहिल्या एक तासभरात शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार कसा झाला त्यासाठी संभाजी महाराज यांनी केलेल्या मोहिमा नंतर राज्याभिषेक नंतर अंतर्गत असंतोष, कौटुंबिक बंड वगैरे वगैरे करत तुकड्या तुकड्यांनी संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतील घटनांचा आढावा घेतला आहे. मध्यंतरानंतर मात्र लढवय्ये आणि छळ सहन करणारे संभाजी महाराज यावर संपूर्ण फोकस आहे. त्यामुळे कित्येक ऐतिहासिक घटना, संदर्भ, प्रसंग माहितगार लोकांना राहून गेल्यासारखे वाटतात. दिग्दर्शक म्हणून उत्तेकरांनी चित्रपट प्रभावी होण्यासाठी महाराजांच्या शेवटच्या दिवसांचे चित्रणावर फोकस केला आहे. त्यामुळे इतिहासाचा कित्येक घटनांचा उल्लेख केला नाही. अर्थात ती कलाकारांची सिनेमॅटिक लिबर्टी आहे. 


उण्यापुऱ्या बत्तीस वर्षांच्या कालावधीत आठ वर्षे छत्रपती म्हणून संभाजी महाराजांची कारकीर्द. अनेक भाषा त्यांना अवगत होत्या. त्यांनी लिहिलेल्या साहित्याची दखल घेणं गरजेचं. त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या लढाया झाल्या. त्यात पोर्तुगीजांशी गोव्यातील लढाई, जंजिऱ्याच्या सिद्धी सोबतचा लढा, दक्षिणेकडील लढाया या महत्त्वाच्या आहेत. ह्या लढाया जरी सिनेमात दाखवल्या असत्या तरी सिनेमाची लांबी वाढली असती. संगमेश्वर येथे सरदेसाई वाड्यातील लढत सोडली तर बाकीच्या लढाया दाखवताना दिग्दर्शकाने हात आवरता घेतला असं दिसतं. स्वराज्य विस्ताराचा भीमपराक्रम करणाऱ्या संभाजी महाराजांच्या बाबतीत बखरीत ऐतिहासिक प्रसंग रेखाटले ते त्यांच्या बदनामीचे. हीच महाराष्ट्राची खूप मोठी शोकांतिका आहे. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे सत्तासंघर्ष जसे वाढले ते १७३१ च्या वारणेच्या तहा पर्यंत चालू होते. ह्या ऐतिहासिक घटनांची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जी दुफळी निर्माण झाली होती त्याची कारणं अंतर्गत बंड, असंतोष, कौटुंबिक कलह वगैरे असावीत. त्यात तत्कालीन अल्पसंतुष्ट जे कोणी असतील त्यांना संभाजी महाराज हे निश्चितच खटकत असणार. दोषी अनाजी पंतला हत्तीच्या पायाखाली दिले होते महाराजांनी. असे तुरळकच संदर्भ दाखवून सिनेमा पुढं जातो. त्यामुळे सिनेमा बघताना इतिहास शोधून काही हाती लागत नाही. सध्या तरी छावाची हवा आहे. सिनेमा प्रदर्शित झाला आणि सोशल मीडिया मुळं पब्लिसिटी झाली त्याचा फायदा होतोय. असाच एक दोन आठवडा जाईल. 


ऐतिहासिक चिकित्सा होणं आणि ऐतिहासिक प्रसंग साहित्यातून सांगितले जाणं यात फार फरक आहे. कादंबरी मधून एखाद्या महापुरुषाचं आयुष्य जेव्हा वाचकांसमोर मांडले जाते त्यात लेखकाची लेखनशैली महत्त्वाची. लेखन जेवढं प्रवाही तेवढा वाचक गुंतत जातो. मात्र संशोधन करून इतिहास लिहिताना ही रंजकता गरजेची नसते. तथ्य, पुरावे, संदर्भ आणि अनुमान यावर आधारित विवेकी मांडणी महत्वाची. मराठी भाषेत कैक कथा, कादंबरीत अशी ऐतिहासिक महापुरुषांची गाथा रंगवलेली आहे. लेखकाला जे वाचकांसमोर मांडावेसे वाटते तो ते लिहितो. वाचकाला आवडलं तर ते पुस्तकाची मागणी वाढते. वाचक वाढतात . तसाच प्रकार सिनेमाचा. त्यात दिग्दर्शकाचा 'पॉईंट ऑफ व्ह्यू' महत्वाचा. इतिहासात जे घडले त्याची मांडणी कोणी धर्माच्या आधारावर करतो. कोणी साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी इतिहासात अमुक तमुक घडलं वगैरे मांडतो. ज्याची त्याची दृष्टी. काहींना द्वेषमूलक लिहायला आवडतं. लिहितात. त्यांचेच बगलबच्चे, सगेसोयरे तेच खरं मानून फुशारकी मारतात. मराठ्यांचा इतिहास लिहिताना काही ठोकताळे खूप महत्त्वाचे. विशेषतः तारखा सनावळ्या. ऐतिहासिक दस्तावेज शोधले तर तिथी, मराठी महिने यांच्या नोंदी. त्यात ग्रेगोरियन कॅलेंडर स्विकारले गेल्यामुळे तारखांचे आणि तत्कालीन तिथीचे घोळ. जे जे उपलब्ध आहे ते अस्सल आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी समकालीन साहित्य संदर्भ पण तपासावे लागतात. एवढे सगळे सव्य अपसव्य करून एखादी घटना प्रकाशित झाली तर तीच्या वर साधकबाधक चर्चा झाली पाहिजे. सप्रमाण सिद्ध झाले पाहिजे. अशा सगळ्या कसोट्यांवर आधारलेली असते वैचारिक मांडणी. जे संशोधक, अभ्यासक आहेत तेच हा उहापोह करतील. बाकीचे रसिक प्रिय, वाचकप्रिय लेखक, नवलेखक मंडळी एखाद्या घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता मनातले विचार इतिहासात घुसडून मिरवतात. पायपोस राहिलेला नाही. 


भारतात व्यापारासाठी किंवा लूटमार करण्यासाठी युरोपियन आले ते पंधराव्या शतकाच्या अखेरीस. त्याआधी परकीय आक्रमणे झाली. इस्लामिक शासक भारतात राज्य करत होते. तेव्हा तत्कालीन भारतात राजे, महाराजे होते. मुघल होते. वेगवेगळी राज्यं विखुरलेली होती. मात्र १६३० ते १८१८ हा कालखंड मराठा साम्राज्याचा इतिहासात मानला जातो. १८१८ नंतर ब्रिटिश सक्रिय झाले. दरम्यान युरोपियन वसाहतींच्या पण एकमेकांवर कुरघोड्या होत होत्या. तत्कालीन इस्लामिक शासक यांच्याविरोधात पण ब्रिटिश लढले. ते काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी नव्हते तर आपलं साम्राज्य टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी लढले होते. तत्कालीन भारतीय भूखंडावरील लढाया ह्या अशा गुंतागुंतीच्या होत्या. ज्या त्या इतिहासकाराने त्या त्या दृष्टीने बघितल्या, लिहिल्या. असा हा समग्र समकालीन इतिहास बघितला पाहिजे. इतिहासाकडे बघताना नेहमी सजगदृष्टीने बघितलं पाहिजे. याचे मुख्य कारण असं की, इतिहास जेव्हा लिहिला जातो किंवा इतिहासावर जेव्हा संशोधन केलं जातं तेव्हा उपलब्ध कागदपत्रे जी असतात त्याचा आधार घेऊन काहीतरी नमूद केलं जातं आणि ते केलेले लिखाण हे आधार मानलं जातं. अशावेळी परकीय इतिहासकारांनी नोंदवलेली माहिती पुष्टीसाठी गरजेची असते. ह्या सर्व गोष्टी सर्वसामान्य जनतेला शैक्षणिक पाठ्यपुस्तकातून जेवढ्या परिचयाच्या असतात त्यातच त्यांची ऐतिहासिक समज असते. शैक्षणिक पाठ्यपुस्तकातून नेमकं काय द्यायचे ह्याचे सर्वाधिकार हे सत्ताधाऱ्यांना असतात. त्यामुळे जे शिकलो नाही किंवा शिकवलं नाही ते जर साहित्य, सिनेमा नाटक वगैरे माध्यमातून जनतेसमोर आले तर त्यावर चर्चा, वादविवाद होणारच. सर्वसामान्य जनतेला सिनेमा म्हणजे जनजागृती साठी आहे असे वाटतं अशावेळी. अशा प्रकारे लिहिलेले, दाखवलेले आणि भूतकाळात घडलेले प्रसंग हे नेहमी पडताळणी करून घेणं गरजेचं. तेवढा वकूब सर्वसामान्य जनतेचा नसतोच म्हणा! शैक्षणिक व्यवस्था ज्याप्रकारे उभी केली जाते किंवा लादली जाते त्याचीच ही फळं. सिनेमाची तीच खासियत आहे की कन्व्हिक्शन स्ट्रॉंग असेल तर लोकांवर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो. त्यामुळे सिनेमात दाखवली जाणारी हिंसा, मारधाड कधी पोएटिक जस्टीस वाटते किंवा शोकांतिका वाटते. महाराजांची हत्या भयानक छळले म्हणून झाली हे लिखाणातून एवढं भिडत नाही जेवढं दाखवण्यातून भिडतं. हीच तर दृश्यकला माध्यमाची मर्मस्थळे आहेत. याआधीही यांचा वापर खुबीने केला. आता होतोय आणि भविष्यात पण होईल. उदाहरणार्थ आपण एक उदाहरण घेऊ. गुजरात राज्यातील २००२ सालात ज्या दंगली झाल्या त्यात मुस्लिम समाजावर जे हल्ले झाले त्यावर रक्तरंजित प्रसंग जर एखाद्या सिनेमात दाखवले की कसे तत्कालीन हिंसक घोळके निष्पाप मुस्लिमांना टार्गेट करून मारत होते. तर आज छावा वर आज जे आक्षेप घेत आहेत तीच मंडळी ह्या सिनेमाला डोक्यावर घेतील. काश्मीर फाईल्स सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा शेवटी जो प्रसंग दाखवला त्यावेळेस असाच प्रभाव प्रेक्षकांवर पडला. गिरीजा टिक्कू यांना ज्या क्रूरतेने ठार मारले होते त्याच्या बातम्या, माहिती किंवा पुस्तकातून आधीच वाचकांना उपलब्ध होती. सिनेमाचा प्रभाव पडला आणि एकूणच त्याकाळी जे काही भयंकर घडलं यांची पुन्हा एकदा शोकात्म जाणीव सर्वसामान्य जनतेला झाली. भविष्यात समजा आजवरच्या दलितांवर जे हल्ले झाले किंवा सवर्णांच्या छळाच्या गोष्टी सिनेमातून कन्व्हिक्शनने दाखवल्या तर जनतेला अपील होणारच. 


सिनेमा संपतो आणि एक नैराश्य, हरल्याची भावना प्रेक्षक चित्रपटगृहातून बाहेर पडतो हे काही नवं नाही. २००५ सालच्या डोंबिवली फास्ट हा सिनेमात शेवटच्या फ्रेम मध्ये मेलेली घूस, घोंघावणाऱ्या माशा लोकांना आत्ममग्न करतात. २०१३ सालच्या फॅंन्ड्री सिनेमात शेवटचा मारलेल्या दगडाने कित्येक तास विचारमग्न होतात. सैराटचा शेवट पण तसाच सुन्न करणारा. असे कितीतरी कन्व्हिक्शन स्ट्रॉंग असणाऱ्या दिग्दर्शकांचे सिनेमे लोकांना आवडले. ते डोक्यावर घेतले. कैक चांगले सिनेमे लोकांना आवडले नाहीत. लोकांना काय आवडतं याच्यावर सगळं अवलंबून असते. दिग्दर्शक म्हणून मला काय सांगायचं आहे हे महत्त्वाचे. लक्ष्मण उत्तेकर सध्यातरी फस्ट क्लास मध्ये पास झाले आहेत. गंमत म्हणजे सिनेमात कुठंच हिंदू मुस्लिम असा धार्मिक उल्लेख नाही की अमुक एका जातीच्या लोकांना दोषी ठरवलं नाही. सिनेमात अभिनय, सिनेमॅटोग्राफी, दमदार डायलॉगबाजी लोकांना आकर्षित करते. सिनेमातून जनजागृती वगैरे म्हणजे गाव गप्पा मारल्या सारखं आहे. सिनेमातून जाणीव करून देऊन शकता. जनतेने त्यातून किती घ्यावं ते ठरवू शकत नाही. छावा सारख्या सिनेमा बघितल्यावर लोक थिएटरमधून तलवारी घेऊन बाहेर पडणार आहेत का संभाजी महाराजांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी? अर्थातच नाही! लोकांच्या डोक्यात इतिहास असतो त्याला जातपात धर्माची लेबलं नंतर लावली जातात. इतिहासात धर्माच्या नावाखाली, साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी आणि लूटमार करण्यासाठी लढाया झाल्या, हिंसा झाली. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. ते तरी कोणीही नाकारू शकत नाही. सध्याच्या काळात न आवडणाऱ्या लोकांची सत्ता आल्यानंतर खूप निराश झालेले लोक आहेत आणि भविष्यात बदल होईल असे वाटणारे पण खूप आशावादी लोक आहेत. सर्वसामान्य जनतेला ह्याच्याशी काहीएक देणंघेणं नाही. हीच ती सर्वसामान्य जनता आहे जी लोकशाही प्रक्रियेत सर्वात जास्त सहभागी होऊन जे जे सक्षम त्यांना संधी देते. त्यामुळे एखाद्या सिनेमामुळे सामाजिक सौहार्द बिघडणार नाही हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे.


सरतेशेवटी छावा बघायचा असेल तर उत्तम अभिनयासाठी, संभाजी महाराज यांच्यातील लढवय्या बघण्यासाठी बघावा. 


© भूषण वर्धेकर 
२६ फेब्रुवारी २०२५
पुणे 

मंगळवार, २४ डिसेंबर, २०२४

लेखनपरिषद

एकदा लेखन संघ सर्वसमावेशक लेखन परिषद आयोजित करण्याचं ठरवतं. लेखन संघाचे खूप वर्षांपासून सगळ्या प्रकारचे लेखन एकाच छताखाली येतील असे वातावरण तयार होण्यासाठी प्रयत्न चालू होते. पण ठराविक लेखनासाठी संघाला ओळखले जायचे. कधीकाळी संघ स्थापनेपासूनच शिक्का बसला होता. अभिजनांचं लेखन म्हणजे संघ. सुखवस्तू वर्गातील लोकांचं लेखन म्हणजे संघ हा शिक्का पुसायचाच असा नवीन संघ वरिष्ठांनी चंग बांधला होता. सगळ्या प्रकारचे लेखन म्हणजे कविता, कथासंग्रह, ललित, चरित्रे, वैचारिक लेख, कादंबरी, दलित, विद्रोही साहित्य, नाटकं, एकांकिका, चित्रपट, श्रुतिका, ऐतिहासिक , प्रवास वर्णने, वृत्तपत्र लेखन वगैरे वगैरे सगळं आणि त्यांच्या मधील सगळे उपप्रकार पण सर्वसामावेशक लेखन म्हणून एकत्रितपणे नांदायला पाहिजे असा प्रयत्न चालू झाला होता. पण सत्ता हाताशी नसल्याने व्यवस्थेचा पाठिंबा मिळात नव्हता. समविचारी लोक सत्तेवर आले की सर्वसमावेशक लेखन परिषद आयोजित करण्याचं कार्य राष्ट्रीय पातळीवर सुरू झाले. कारणही तसंच होतं बहुभाषिक राज्य आणि तिथलं सर्वप्रकारच्या लेखनाला एकत्रितपणे नांदायला एकछत्री अंमल असणं काळाची गरज आहे वगैरे बौद्धिकं जागोजागी वाटली जात होती. त्यासाठी एकदिवसीय चिंतन शिबिरात चर्चा सुरू झाली. एकाने कविता या एकमेव प्रांतात दोन डझन पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारांची यादी दिली. अभंग, ओवी, आर्या, दिंडी, पोवाडा, किर्तन, श्लोक, श्रुती, चारोळ्या, दशपदी, सुनीत, छंद, मुक्तछंद, हायकू, त्रिवेणी, नवकविता, विद्रोही कविता, विडंबने, वात्रटिका, महाकाव्य, खंडकाव्य, गाणी, बालगीते, चित्रपट गीते, भक्ती गीते, भावगीते, नाट्यगीते, भावगीते, अंगाई गीत वगैरे वगैरे. एवढं सगळं फक्त कवितेत असतं हे ऐकून बरेचसे नवलेखनवीर अचंबित झाले. तेवढ्यात कथा, कादंबरी, ललित, चरित्रे, निबंध, उपदेशपर लेखन, ऐतिहासिक लेखन, नाटक, एकांकिका, दिर्घांक, नाट्यछटा, चित्रपट, लघुपट, माहितीपट, ई-कंटेट वगैरे ची वर्गवारी उपप्रकारांसकट पुढ्यात आली. नवीन लेखना वरील वीररसयुक्त भाषणबाजी करणारे नवतरुण बुचकळ्यात पडले. कारण ते फक्त ऑनलाईन लेखनाचे भोक्ते होते. एवढी सगळी जंत्री अनेक भाषांमध्येही असेल याबद्दलची कुणकुण एव्हाना लागली होती. एकूणच या सगळ्या गोष्टींचा उहापोह करता करता जेवणाची वेळ झाली. मस्तपैकी पेटपुजा झाल्यावर पुन्हा चिंतन शिबिरात चर्चा सुरू झाली. एवढं सगळं अजस्त्र सर्वसमावेशक लेखन अंतर्गत सामाविष्ट करणार तरी कसं? एकाने भौगोलिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या लेखनाचा एकछत्री कारभार करणं किती गरजेचं आहे हे तळमळीने विषद केले. मुळातच तळमळीने प्रश्न समस्या मांडण्यासाठी ते फारच निष्णात होते. त्यामुळे त्यांना लेखनप्रचार करण्यासाठी प्रचारक म्हणून प्रतिष्ठेची मोहीम द्यावी असं ठरलं. मग तसं आठी दिशेचे प्रचारक  नेमले गेले. तोवर सांस्कृतिकदृष्ट्या सभ्यता, आचार, विचार आणि जीवन पद्धती यावर काथ्याकूट करायचा एका चमूने ठराव मांडला. समरसता, समता आणि एकात्मता यावर पण लेखनाचा प्रभाव असतो वगैरे धष्टपुष्ट बाळकडू मिळाले. तोवर चहापानाची वेळ झाली. मग शिबिर सांगता होण्याआधीचे अखेरच्या सत्रात लेखनसंघ वरीष्ठांनी सगळ्यांनाच उस्फुर्तपणे प्रेरणादायी प्रोत्साहन देण्यासाठी लेखनप्रपंच किती विशाल आणि व्यापक आहे हे ठशीवपणे सांगितले. त्यासाठी आपल्याला समाजातील तळागाळातील लोकांच्या मनात लेखनाची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी अहोरात्र मेहनत करावी लागेल असे बौद्धिक दिले. पण आपण ज्या लेखनाचे सर्वसमावेशक संघटन करू पाहतो ते लेखन लोकांनी वाचणे गरजेचे आहे. त्यामुळे किती वाचक, रसिक वाचक आणि अभ्यासू वाचक आहेत ह्याची नोंद घ्यावी असे प्रतिपादन केले. त्यासाठी वाचक महोत्सव सप्ताह साजरा केला जावा हे ठरले. या महोत्सवात जे जे वाचक येतील त्या त्या वाचकांच्या आवडीचे कोणकोणते लेखनप्रकार लोकांना आकर्षित करतात ह्यासाठी विशेष निरिक्षणे नोंदवली जावीत असा गुप्त आदेश दिला गेला. त्यासाठी विशेष अशी स्वयंसेवकांची फळी उभी केली जाईल असे सांगितले. ह्या वाचक महोत्सवात जास्तीत जास्त जनतेला सामावून घेण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न चालू झाले पाहिजे असा दंडक काढला गेला. आणि महोत्सवाची सांगता झाली की सर्वसमावेशक लेखनासाठी काय काय करावे लागेल याची चतूःसुत्री ठरवण्यासाठी पुन्हा चिंतन शिबिराचे आयोजन केले जाईल अशी घोषणा केली. अशा तऱ्हेने एकदिवसीय चिंतन शिबीर संपन्न झाले.

वाचक महोत्सव भव्यदिव्य होण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न चालू असल्याने सत्तेतील वरीष्ठ फक्त आणि फक्त वाढीव संख्याबळ, संख्यात्मक वाढ आणि गर्दीचा उच्चांक याच कसोटीवर खुष होतात हे माहिती असल्याने समाजातील तळागाळापर्यंत वाचक महोत्सवाची रुपरेषा पोहोचली जावी यासाठी कसोशीने प्रयत्न झाले. शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, खाजगी नोकरदार सगळ्यांना वाचक महोत्सव सहभागी होण्यासाठी संदेश पाठवले गेले. मग काय भव्यदिव्य कार्यक्रमांची रेलचेल आखली गेली. डोळे दिपवणारी इव्हेंटबाजी करणं तसं नवंव्यवस्थेला नवीन नव्हतं. त्यासाठी मनोरंजन होईल सदरहू कार्यक्रम वगैरे, खाद्यपदार्थ मेजवानी वगैरे करण्यासाठी वेगळी यंत्रणा उभी राहिली. महोत्सवात भेट देणाऱ्यांची संख्या शेकड्यांनी, हजारांनी लाखो पर्यंत गेलीच पाहिजे असे सक्तीचे आदेश वरुन आल्याचे समजले. कोट्यवधी लोकसंख्या असलेल्या शहरात लाखो वाचक महोत्सवात सहभागी झाले अशा बातम्यांचे रकाने भरवले गेले. पुस्तकांचं प्रकाशन, नवनवीन संग्रह, विविध प्रकारच्या विषयांवरील पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध केली होतीच. प्रदर्शनात भरघोस सवलती दिल्या गेल्या. गावोगावी तसे संदेशवहन झाले होते. वेळ पडली तर विशेष दळणवळण यंत्रणा उभी केली जाईल असेही ठरले होते. काहीही करून किर्तीमान विश्वव्यापी विश्वविक्रम झाला पाहिजे जेणेकरून महोत्सवाची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जाईल याचीही तजवीज केली होती. हॅशटॅग, ट्रेडिंग, सेलेब्रिटी, सेल्फी पॉइंट, जाहीराती, फ्लेक्स, न्यूज चॅनलचे बाईट्स, रील्स, शॉर्टस्, सोशल मीडिया पोस्ट, पॉडकास्ट वगैरे चा महौल बनवला होता. मेडिया क्रिएटिव्ह हेड पासून प्रिंट मेडिया करस्पॉडंट पर्यंत सगळ्यांना झाडून निमंत्रण दिले गेले. काहीही झालं तरी आपल्या वरीष्ठांना सर्वसमावेशक लेखनासाठी जे जे नोंदणीकृत वाचक उपलब्ध होतील ते करणं गरजेचे होते. त्यावरून सर्वसमावेशक लेखन अंतर्गत एकछत्री अंमल येण्यासाठीची चतूःसुत्री ठरणार होती. अखेरीस सप्ताह संपन्न झाला आणि आवश्यक असणारी अधिकृत आकडेवारी सूचीबद्ध झाली. 

मिळालेल्या माहितीनुसार चतूःसुत्री ठरवण्यासाठी पुन्हा एक दिवसीय राष्ट्रीय पातळीवर चिंतन शिबीर आयोजित करण्यात आले. तसा आता माहितीचा खजिना उपलब्ध झाला होता. मिळालेली माहिती अचंबित करणारी होती. वाचक महोत्सव सप्ताहात दहा लाख लोकांनी भेट दिली अशी संख्यात्मक माहिती पुढे आली. त्यात कोण कोण सहभागी झाले वयोमानानुसार त्याची संख्या किती, सक्तीचे केले म्हणून आलेले किती, उस्फुर्तपणे आलेले किती आणि कोणत्या प्रकारचे लेखन वाचकांना आकर्षित करते ह्याची विचारणा झाली. हाती आलेल्या माहितीनुसार महोत्सवात भेट देणाऱ्यांमध्ये सर्वाधिक हे शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये मधील मंडळी होती. उस्फुर्तपणे आलेले रसिक वाचक खरेदी करून गेले. त्याची उलाढाल झाली मोठी पण जी पुस्तके खपली त्याची माहिती विषण्ण करणारी आहे. सर्वाधिक विक्री झाली ती अभ्यासक्रमाच्या, परिक्षांच्या पुस्तकांची. धार्मिक पुस्तकांची पण विक्री बऱ्यापैकी झाली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कथा, कादंबरी, कविता वगैरे साहित्याची पुस्तके खूप कमी प्रमाणात खपली.  ऐतिहासिक, वैचारिक लेखनपर पुस्तके केवळ अभ्यासक लोकांनी खरेदी केली. प्रदर्शनात भाषांतरित पुस्तके भरपूर प्रमाणात उपलब्ध केली होती. इतर भाषिक पुस्तके पण उपलब्ध होती. जी काही नोंदणीकृत माहिती प्राप्त झाली होती ती फक्त आणि फक्त एकाच ठिकाणी एकाच वेळी एकाच शहरातील महोत्सवाची होती. त्यामुळे अशा त्रोटक माहिती सर्वसमावेशक लेखन एकाच छताखाली आणण्यासाठी अपुरी पडत होती. एक दिड कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात फक्त दहा लाख लोकांनी महोत्सवात हजेरी लावली हे काही सर्वसमावेशक लेखनप्रपंचास अनुकूल नव्हते. अखेरीस असे वाचक महोत्सव सप्ताह वेगवेगळ्या भौगोलिक ठिकाणी वेगवेगळ्या भाषिक पातळीवर करावेत असा सूर आळवला गेला. त्यामुळे त्या त्या ठिकाणी त्या त्या स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या माहितीमधून अजून भरीव विश्वसनीय विदा (डेटा) तयार करता येईल असं ठरलं. त्यानुसार पुढील काळात योग्य ती कार्यवाही केली जाईल याची ग्वाही दिली गेली. तत्पूर्वी लेखन संघाच्या वरिष्ठांनी हे वेळीच ताडले की, सर्वसमावेशक लेखन करण्यापेक्षा सजग आणि लेखनास आकर्षित होतील असे गुणात्मक वाचक वाढले पाहिजेत. तरच भविष्यातील वाचकांना लेखन सर्वसमावेशक होणं गरजेचं आहे ह्याची जाणीव होईल. लेखन हजारो वर्षे टिकलेलं आहे. समृद्ध होत गेलेलं आहे. तसे गुणग्राहक वाचकांची निर्मिती झाली पाहिजे. लोकांमध्ये वाचनसंस्कृती वृद्धिंगत होईल असे प्रयत्न केले पाहिजेत. जनजागृती वाचकांसाठी गरजेची आहे. सर्वसमावेशक लेखनाचा श्रीगणेशा होण्यासाठी खूप मोठा कालावधी लागेल याची जाणीव झाली.

© भूषण वर्धेकर 
डिसेंबर २०२४
पुणे

शुक्रवार, २० डिसेंबर, २०२४

बदलत जाणारे जनमानस

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल लागल्यापासून एकूणच वैचारिक वातावरण खूप बदललेलं आहे. कोणालाही अपेक्षा नव्हती असा निकाल लागलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडी सपशेल आपटलेली आहे तर महायुतीला अपेक्षा पेक्षा जास्त सीट्स मिळाल्यामुळे ते सुद्धा आश्चर्यचकित झालेले आहेत. आता मुद्दा असा आहे की एकीकडे लोकसभेच्या निवडणुकीत जेव्हा भाजपला हार सहन करावी लागली होती  तेव्हा महाराष्ट्रात कोणीही ईव्हीएम चे रडगाणं गायलं नाही. मात्र नंतरच्या चार महिन्यात भाजपालाच पुन्हा भरभरून मतदान झाल्यावर ईव्हीएमचे रडगाणं सुरू झालं विरोधकांकडून. याच्यावर चर्चा होतील वाद होतील. ईव्हीएम कसा हॅक होतं, ईव्हीएमची यंत्रणा कशी कुचकामी, बॅलेट वर घ्यायला काय होतं वगैरे विरोधकांच्या मागण्या आहेतच. मुख्य मुद्दा असा की असं काय नेमकं घडलं गेल्या चार महिन्यात जे इकडचं जनमानस तिकडं झुकलं गेलं यावर कोणीही लक्ष देत नाही. कारण नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी ईव्हीएमचं निमित्त मिळाले आहे. महाराष्ट्रात जनतेला बरोबर समजतं कोणाची काय लायकी आहे ते. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा वर सगळा राग काढला, विधानसभेत महाविकास आघाडीला झटका दिला.

जनता जनार्दन नेहमीच योग्य तो सक्षम असा पर्याय देत असते. उदाहरणार्थ महाराष्ट्राचा निकाल बघितल्यावर असं लक्षात येते की महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात जी काही चिखलफेक झाली होती, जनतेने त्या चिखल फेकीला कंटाळून एक खणखणीत कौल दिलाय. मग तो कौल महाविकास आघाडीला का जाऊ शकला नाही याची कारणं फार महत्त्वाची आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे गेल्या ३० ते ३५ वर्षात महाराष्ट्रात एका पक्षाचं सरकार कधीच नव्हतं. आता येणंही शक्य नाही कारण महाराष्ट्र हा वेगवेगळ्या विभागात, वेगवेगळ्या जातीपातीत, वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीत अडकल्यामुळं तिथलं प्रभावक्षेत्र हे त्या त्या पातळीवरच्या नेत्यांनी शाबूत ठेवलेले आहे. गेल्या चार महिन्यात मात्र महायुतीने ज्या पद्धतीने रणनीती आखून कार्यवाही केली त्याच्याविरुद्ध महाविकास आघाडीने ज्या ज्या गोष्टी करायला नको होत्या त्या त्या केल्या याचा सर्व परिपाक म्हणजे हा निकाल. या निकालाचं विश्लेषण करणं, पुढं काय काय होणार वगैरे ठोकताळे, तर्क वितर्क, भांडणं ही चालूच राहणार आहेत. त्या त्या पक्षाचा नेता, विरोधी पक्षनेता, हे गुऱ्हाळ सुरूच ठेवणार कारण कार्यकर्ते लोकांना कोणत्या तोंडाने सांगणार? आम्ही या चुकांमुळे हारलो म्हणून? गेल्या काही वर्षात जनमानस ज्या पद्धतीने बदलत गेले त्याच्यावर विचार चर्चा करण्यासाठी हा लेखप्रपंच. अर्थातच हे लेखन करताना महाराष्ट्रात झालेल्या निवडणुका हे जरी समोर असलं तरी जनमानसात जे बदल झाले त्याची जी काही कारणमीमांसा आहे ती कमी अधिक फरकाने इतर राज्यात किंवा देशात लागू पडू शकेल. फक्त त्या प्रदेशातील सामाजिक आणि राजकीय स्थित्यंतरे नीट अभ्यासली पाहिजेत.

महाराष्ट्रात आजपर्यंत शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर चालणारे पुरोगामी राज्य वगैरे नेहमी बोललं गेलं. प्रत्यक्षात मात्र सत्तेपुरतं शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाने जयघोष करून पुरोगामी भासवायचं आणि सत्ता आली की स्वतःची मक्तेदारी अधिक भक्कम करायची हे एका पिढीला समजलं नव्हतं. दुसऱ्या पिढीला समजत होतं पण वळत नव्हतं. काही वेळा दुर्लक्षित केले म्हणून सहन करत होते. तिसऱ्या पिढीला ते नाकारण्याची वेळ आली किंवा असं म्हणूया की ते नाकारण्यासाठी एक वेगळा पर्याय तयार झाला. १९६० साली महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर ते २०२४ या ६४ वर्षात बऱ्याच गोष्टी घडल्या. त्यापैकी जागतिकीकरणाच्या रेट्यात शहरी आणि ग्रामीण भागात बऱ्याच उलाढाली झाल्या. महाराष्ट्र हे एक प्रमुख औद्योगिक राज्य म्हणून संपूर्ण भारतात अग्रेसर. मुंबई सारखं आर्थिक केंद्र महाराष्ट्रात. ६४ वर्षांमध्ये जेवढ्या सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रात सत्ता गाजवल्या, त्या त्या सत्ताधाऱ्यांनी ज्या ज्या राजकीय उलाढाली केल्या, जे काही खटाटोप केले त्याचा हा थोडक्यात आढावा घेणे फार गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेपासूनच महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे वगैरे गोष्टी चर्चेला जाऊ लागल्या त्याचा प्रचार प्रसार केला जाऊ लागला पण प्रत्यक्षात पुरोगामी असणे आणि पुरोगामी विचार असणे आणि पुरोगामी आहोत हे सामाजिक जीवनात दाखवणं यात खूप मोठा फरक आहे. सर्वात महत्त्वाचे हे लक्षात घेतले पाहिजे की ज्या राजकीय विचारधारेला राजाश्रय मिळतो, सत्तेचा पाठिंबा मिळतो ती विचारधारा लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचू शकत नाही. त्या विचारधारेला एक सवय लागते सत्तेचा टेकू असण्याची. याच्या उलट जी विचारधारा कोणत्याही सत्तेच्या टेकूशिवाय केवळ लोकसहभागातून लोकांपर्यंत पोहोचते ती दीर्घकाळ टिकते. यामध्ये सामाजिक जाणिवा, सामाजिक बदल अंगीकारून लोकांपर्यंत पोहोचणं हे खूप महत्त्वाचं काम सामाजिक विचारवंत, कार्यकर्ते यांचे असते. आता इथे फार मोठी गफलत आहे जर तुम्हाला राजकीय आश्रय मिळाला, राजकीय पाठिंबा मिळाला तरच तुमची विचारधारा लोकांपर्यंत जाणार असेल तर त्या विचारधारेचा वापर पण केवळ राजकीय फायदा घेण्यासाठी होणार हे त्रिकालाबाधित सत्य. उदाहरणार्थ आम्ही पुरोगामी आहोत आम्ही शाहू फुले आंबेडकर यांचा विचारांचा वारसा पुढे नेणारे आहोत असं म्हणणं आणि प्रत्यक्षात मात्र आपापल्या कुटुंबकबिल्याची, घराण्याची सत्ता प्रस्थापित करणं, संस्थानिकं उभी करणं ह्याच गोष्टी महाराष्ट्रातल्या किमान तीन ते चार पिढ्यांनी बघितल्या. महाराष्ट्रातल्या जनमानस बदलण्यासाठी यातील पहिल्या दोन तीन पिढ्यांचा राजकीय प्रताप कारणीभूत आहे. महाराष्ट्रात सत्तेतील पहिली पिढी कृषी क्षेत्रावर अवलंबून होती. ह्या पिढीचा कार्यकाळ सर्वसाधारण १९६० ते १९८० असा वीस वर्ष मान्य करु. स्वतंत्र भारतात राजकीयदृष्ट्या सक्रिय पिढी किमान वीस वर्षे तरी समाजकारण करते हे गृहितक ढोबळमानाने मांडता येईल. गावपातळीवरील राजकारणात सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जाऊ असं स्ट्रॉंग कन्व्हिक्शन असणारी ह्या काळातील ही पहिली पिढी होती. लोकांवर प्रभाव टाकणारी पिढी होती. तसं नेतृत्व त्याकाळी जनतेने स्विकारले होते. कारण त्यांना नाकारण्यासाठी भक्कम पर्याय जनतेसमोर नव्हताच. त्यामुळे नकळतपणे खेडोपाडी तत्कालीन काँग्रेस पोहचलेली असताना सत्तेसाठी सहजपणे तीच उपलब्ध होती. त्यावेळेस लोकांना काँग्रेसच उत्तम पर्याय आहे सत्तेसाठी असं वाटत होतं. दुसरं कारण त्यावेळेस विरोधक हे खूपच कमकुवत होते किंवा त्यांच्याकडे असा कोणता मोटिव्ह नव्हता. विरोधक सत्तेत येण्यासाठी खूप मोठा कालाखंड लोटला. उदाहरणार्थ १९९५ साली आलेली भाजप सेनेची युती. त्याच्या आधी महाराष्ट्रात पुलोद प्रयोग झाला. पण कॉंग्रेसच्या विचारधारेतून आलेला राजकीय आकांक्षा असलेला गट सत्तेवर होता. अजून तत्सम तिसरी आघाडी वगैरे प्रयोग झाले. पण असे प्रयोग दीर्घकाळ टिकले नाहीत. कारण राजकीय फायदा बघितला की अशा तडजोडीच्या वातावरणात एकनिष्ठ राहण्याची क्षमता कमी होते. महाविकास आघाडीचे जे झाले हे एक समर्पक उदाहरण आहे. या अशा पार्श्वभूमीवर जनतेला पण लक्षात येतं की कोण कसा आहे आणि कोण किती विचारधारेशी प्रामाणिक आहे.

आता नेमकं गेल्या पंधरा वर्षात असं काय घडलं? त्याच्या आधीच्या पंधरा वर्षात असं काय घडलं, आणि त्याच्या आधीच्या तीस वर्षात असं काय घडलं हे बघणं फार महत्त्वाचं आहे. याचं कारण १९६० ते १९९० या ३० वर्षात काँग्रेसचा वरचष्मा महाराष्ट्राच्या राजकारणात होता. १९९० ते २०१४ या २५ वर्षांत शरद पवारांचं वर्चस्व महाराष्ट्रात राहिलेले आहे. या ६४ वर्षात राजकीय पक्षांचं, त्या त्या राजकीय व्यक्तींचं प्रभावक्षेत्र हे महाराष्ट्रात वेगवेगळ्या भौगोलिक ठिकाणी वाढत गेलं. त्यामुळे सहकारी क्षेत्रात घराणेशाही भक्कम होत गेली. मतदाराला केवळ रस्ते वीज पाणी शेती वगैरे गोष्टी विषयीचं आश्वासन देऊन आपण सत्तेत येऊ शकतो हा पायंडा वर्षानुवर्षे चालत आलेला आहे. मतदाराला जातीपातीच्या कोंडाळ्यात अडकवून आपण सत्तेत येऊ शकतो. यासाठी बहुजन, ब्राम्हणेतर वगैरे पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या संघटना गेल्या तीन दशकांत महाराष्ट्रात वाढल्या. राजकीय आशीर्वादाने पोसल्या. मतदाराला विकासाच्या गोष्टी सांगून, दाखवून आपण सत्तेत येऊ शकतो का? हे मात्र सिद्ध होण्यासाठी खूप दशकं जाऊ लागली. सोशल मीडिया जसा फोफावत गेला तसा अतिरेकी प्रचार पण वाढत गेला. हा बदल नकळतपणे गेल्या ६० वर्षात ज्या पद्धतीने झाला त्याच्या मागे योग्य अशी तत्कालीन राजकीय, सामाजिक पार्श्वभूमी फार महत्त्वाची आहे. पहिली तीस वर्ष ही विशेषतः कृषी आधारित अर्थव्यवस्था असलेला महाराष्ट्र त्याच्यासोबत औद्योगिक क्षेत्रात प्रगत असलेलं राज्य आणि १९९० नंतर नकळतपणे जागतिकीकरणाचे सर्वात मोठे फायदेशीर राज्य म्हणून महाराष्ट्राला मिळालेली संधी ही जमेची बाजू. विशेषतः २००० नंतर गेल्या २४ वर्षात महाराष्ट्रामध्ये जी काही राजकीय उलथापालथ झाली त्या राजकीय स्थित्यंतरामध्ये जनतेला खूप गोष्टी सहजतेने उपलब्ध झाल्या. कारण हाताशी असलेला सोशल मीडिया. यातून काही प्रमाणात जनजागृती झाली. त्यात मराठा आरक्षणासाठी जे काही घडत होते त्यामुळे दोन पिढ्या ह्यातून तावून सुलाखून बाहेर पडलेल्या होत्या. त्यामुळे त्यांना कॉंग्रेस राष्ट्रवादी वगैरे कसे सरंजामी लोकांसाठी कामे करतात हे समजलं. लोकसभेच्या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा भाजपाला फटका बसला. महाराष्ट्राच्या निवडणुकीत भाजपाच्या धुरिणांनी मराठेतर जातीपातीच्या आधारावर पेरणी सुरू केली. ह्यासाठी हरियाणाच्या निवडणूकांचा अनुभव पाठीशी होता. याचा चांगलाच फायदा झाला. त्यामुळे विरोधकांचे विशेषतः कॉंग्रेस राष्ट्रवादी चे पानीपत झाले. हे एकाएकी घडून आले नाही. त्यामागे गेल्या दोन दशकांपासून जे घडलं ते लोकांच्या समोर होतं. सलग सत्ता सर्वाधिक काळ जी होती ती होती काँग्रेसकडे नंतर १९९९ ते २०१४ पर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी या आघाडीची सत्ता महाराष्ट्रात होती. राष्ट्रवादी हा पक्ष काँग्रेस मधून फुटून काही मोजक्या सरंजामी लोकांचा प्रभाव असलेला सुरुवातीला होता पण कालांतराने त्याची व्याप्ती वाढली, खेडोपाडी जसे शरद पवारांचे नेटवर्क होते तसे शहरी निमशहरी भागात सुद्धा पवारांनी आपापली सगळी शक्ती पणाला लावून राष्ट्रवादी पक्ष मोठा केला आणि तीन टर्म सत्ता ठेवण्यात यशस्वी झाला होता. पण शरद पवारांना स्वबळावर सत्ता आणता आली नाही की काँग्रेसलाही स्वबळावर सत्ता आणता आली नाही हे लक्षात येते. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांना पूरक होते. याच तीन टर्म मध्ये कॉंग्रेसचे मुख्यमंत्री जरी असले तरी महत्वाची खाती शरद पवारांनी राष्ट्रवादी कडे ठेवून ग्रामीण भागात सहकारी संस्था, साखर उद्योग, शिक्षण संस्था, दूध संघ आणि बॅंका यावर हुकुमी पकड बसवली. त्यामुळे कॉंग्रेस वाले कमकुवत होत गेले. या पंधरा वर्षात नकळतपणे विरोधी पक्ष हा हळूहळू पर्यायी सत्ता केंद्र म्हणून उभा राहू शकतो. विरोधी पक्षाला जर सत्तेसाठी निवडून दिलं तर ते उत्कृष्टपणे सत्ता गाजवू शकतात. सत्ता मिळाल्यावर महाराष्ट्र हाकू शकतात हा आत्मविश्वास लोकांमध्ये येण्यासाठी विरोधकांनी खूप प्रयत्न केले. यामुळे २०१४ ला नरेंद्र मोदी यांच्या लाटेत महाराष्ट्रात सत्तांतर झाले. त्यांनतर गेल्या दहा वर्षांत भाजपा ची सत्ता केवळ साडेसात वर्षे. त्यातूनच महाराष्ट्रात भाजपा बद्दल एक खणखणीत जनमानस तयार झाले. त्यात होणारे प्रकल्प, दिसणारी विकासकामे, हिंदुत्ववादी विचारधारा वगैरे मालमसाला जनतेला प्रभावित करून गेला. सर्व विरोधकांनी एक विचार केला पाहिजे की भाजपा सारखा उजव्या विचारसरणीच्या पक्षाला महाराष्ट्रात एवढं मताधिक्य का बरं मिळत असेल? पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या संघटना, पक्ष आणि समाजात वावरणाऱ्या कार्यकर्ते लोकांचे हे अपयश नाही का? जर पुरोगामी म्हणवून घेत सत्तेवर येणारी मंडळी लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पुरोगामी विचार पोचवू शकत नसतील तर दोष कुणाचा?

लोकसभेत यश मिळाले म्हणून महाविकास आघाडी हवेत होते. महायुतीने सगळं प्लॅन करून उमेदवार जाहीर करण्यापासून ते प्रचारात सगळीकडे एकसंध कम्युनिकेशन ठेवले जनतेसमोर. गेल्या पंधरा वर्षांत कॉंग्रेसच्या मतांमध्ये वाढच झाली नाही. २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये महाराष्ट्रात जनतेने कॉंग्रेसला नाकारले आहे. म्हणजे महाराष्ट्रात कॉंग्रेस चुकीच्या लोकांच्या हातात आहे. कारण लोकांमध्ये जनजागृती करून मतदान वाढावं असं काय केले कॉंग्रेसने? कॉंग्रेस लोकसभेत जशी एग्रेसिव्ह होती महाराष्ट्रात तशी विधानसभेत का नव्हती. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सज्जद नोमानीने घोळ केला नंतर जरांगे यांनी माती केली. सज्जद नोमानीने उघड उघड महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आणि सगळं फिरलं. कोण उत्तरेकडील मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा कोणीतरी महाराष्ट्रात काय करावं हे सांगतो आणि इकडं मुस्लिम समाजातील लोकांनी त्यांचं ऐकून मतदान करावं! हे महाराष्ट्रातील लोकांना आवडेल का? जसं मोदी लोकसभेत भटकती आत्मा, नकली संतान वगैरे बोलून गेले आणि भाजपाला फटका बसला. त्यातून महाविकास आघाडीला सरळसोट विजय आपलाच. मुख्यमंत्री आपलाच अशीच दिवास्वप्नं पडू लागली. मतदानाचे टक्के वाढले की भाजपाला फायदा होतो म्हणजे वाढीव मतदान विरोधकांना जात नाही ह्याची कारणमीमांसा काय? एक कोटी सत्तर लाखांपेक्षा जास्त लोकांनी भाजपाला निवडून दिले म्हणजे सगळ्यांना पैसे वाटले का? २६% पेक्षा जास्त मतदान भाजपाला होतंय यावर विरोधकांनी विचार केला पाहिजे. फक्त शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करायचा आणि सरंजामी जहागिरदार कारखानादार वगैरे निवडून आणायचे हे कुठपर्यंत चालणार? भाजपा इज न्यू एज कॉंग्रेस हे लोकांनी स्विकारलेलं आहे. बाकी धर्माच्या आधारावर मतदान झाले म्हणून महायुतीचा विजय झाला असं म्हणायचं असेल तर महाविकास आघाडीला बहुमत मिळाले असते तर जातीपातीच्या आधारावर मतदान झाले हे मान्य झाले असते का? एकविसाव्या शतकातील दोन दशके उलटली तरी पुरोगामी, ब्राह्मणेतर, पेशवाई, मनुवादी, वैदिक, सनातनी वगैरे वगैरे गोष्टीत अडकत असाल विरोधकांनी आत्मपरीक्षण करावे. आकस्मिक हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर केल्या आहेत मुस्लिम द्वेष करा हिंदुत्ववादी व्हा! जसं सो कॉल्ड पुरोगाम्यांनी कधीकाळी स्तोम माजवले होते की ब्राम्हणांना शिव्या द्या पुरोगामी बाप्तिस्मा घ्या! भविष्यात मतदान वाढत जाईल नवीन पिढीला लोकशाही मार्गाने गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न सगळ्या पक्षाकडून होतच राहणार निरंतरपणे. अशावेळी वाढीव मतदान जर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कन्व्हर्ट होत नसेल तर सत्ताधाऱ्यांनी स्ट्रॉंग कन्व्हिक्शन तयार केले आहे समजायचं का? भाजपाचा परंपरागत मतदार पण दुखावला होता महायुतीत अजित पवारांना घेतल्यामुळे. पण कमी कालावधीत भाजपाने त्यांना कन्व्हीन्स केले ना? सभोवताली बदल घडवायचे असतील तर घरापासून बदलण्याची तयारी सुरू केली पाहिजे. तीच घराणी, त्याच कुटुंबातील, नवीन पिढी राहणार तालुका पातळीवर आणि राज्यात बदल घडवून आणू म्हणून फुशारक्या मारणार! हे कसं जनतेच्या गळी उतरेल? जो समाज जातपात धर्म बघू एकाच राजकीय पक्षाच्या दावणीला बांधलेल्या असतो त्याचा सामाजिकदृष्ट्या विकास खुंटला जातो. कारण तीच राजकारणाची सेफ गुंतवणूक असते. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात जेव्हा बहुसंख्य असलेला मराठा समाज रस्त्यावर उतरला आरक्षणासाठी तेव्हाच प्रस्थापित मराठा नेत्यांची सर्वात मोठी हार होती. गावागावांत एकेकाळी प्रबळ असलेला मराठा देशोधडीला लागला तो एकाच जातीच्या नेतृत्वाखाली दिर्घकाळ सत्ता अडवली म्हणून. त्यामुळे या विषयावर कितीतरी लिहिले किंवा चर्चा झाली तरी प्रत्यक्षात मात्र ग्राऊंडवर जातीपातीचं ध्रुवीकरण होणारच आहे. ते व्हावे हीच व्यवस्था मजबूत केली आहे. त्यात यंदा भर पडली धर्माच्या अजेंड्यावर मतदान करण्यासाठी. वाढीव मतदान कदाचित यामुळेच भाजपाच्या पथ्यावर पडले असावे. जर भविष्यात फक्त आणि फक्त हिंदुत्ववादी अजेंड्यावर मतदान होत राहिले तर हिंदू समाजातील सर्वसामान्य मध्यमवर्गीय हा गोत्यात येणार. कारण तोच सध्याचा भाजपाचा हक्काचा मतदार आहे. जनतेला जो सक्षम पर्याय वाटतो त्यालाच सत्तेवर आणतात. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. कधीकाळी हे अहोभाग्य कॉंग्रेस वाले अनुभवत होते आता भाजपा लाभार्थी आहे. सत्ताधाऱ्यांच्या स्ट्रॉंग कन्व्हिक्शन ला काउंटर करताना विरोधकांनी जनतेला कन्व्हीन्स केले पाहिजे आम्ही सत्तेवर येण्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू. ही गोष्ट विरोधकांना समजलेली नाही. संविधाना बचाव, अदानी, अंबानी वगैरे टेप रिपिट करून तेच तेच रटाळ प्रयत्न चालू होते. सिलॅबस बदलून जमाना झाला तरी जुन्याच सिलॅबसचा अभ्यास करून परिक्षा देणार आणि नापास झालो की परिक्षा कशी वाईट आहे बकवास आहे यावर काथ्याकूट करायचा हेच विरोधकांचे एकमेव टास्क झाले आहे. यंदा मात्र एक भुतो न भविष्य अशी गोष्ट दिसली, ती म्हणजे नक्षलवादाशी निगडित संघटना, विचारवंत वगैरे संविधाना बचाव वगैरे घोषणा करत होत्या. हे एक परस्पर विरोधी आहे. त्यात अंबानी, अदानी वगैरे लोकांना टार्गेट करून विरोधकांना नक्की काय साध्य करायचे आहे? जर भाजपा सत्तेवर आहे म्हणून अंबानी, अदानीचे सुगीचे दिवस आले आहेत असे जर कोणाला वाटत असेल तर लक्षात ठेवा अदानी अंबानी यांना सत्तेवर कोणीही असो काहीही फरक पडत नाही. अदानी अंबानी यांच्या उद्योगांमध्ये पैसा सर्वपक्षीय राजकारणी लोक गुंतवणूक करतात. जर कॉंग्रेस वाले सत्तेवर आले तर अंबानी, अदानी काय भिकेला लागणार आहेत का? कधीकाळी धिरुभाई अंबानी यांनी सरकारी नियम धाब्यावर बसवून कसा उद्योग व्यवसाय वाढवला हे सर्वश्रुत आहे. त्याकाळी भाजपा सत्तेवर नव्हतं. कॉर्पोरेट क्षेत्रात करचोरी करून सगळ्यात जास्त अंबानी ने पैसा उभा केला आहे हे शेअर बाजारात इंटरेस्ट असणाऱ्या कोणालाही माहीत आहे. सरकार दरबारी असलेल्या पॉलिसी मेकर्स ला हाताशी धरून सगळ्यात जास्त फ्रेंडली कॉम्प्लायन्सेस कोणी तयार केले याची माहिती घेतली की समजेल अंबानी यांच्या उद्योगांनी उंच भरारी का आणि कशी घेतली ते! जागतिकीकरण झाल्यामुळे भांडवलदारांच्या पथ्यावर पडतील अशी धोरणे राबविली गेली या देशात. आता त्याच धोरणांमुळे गर्भश्रीमंत झालेल्या धंदेवाईक लोकांना टार्गेट करून जनतेमध्ये क्रांती कशी होईल? जनतेला असं सहन करायची सवय लागली आपल्या क्रोनी कॅपिटालिस्ट व्यवस्थेमुळे.

विशेषतः गेल्या पंचवीस वर्षात शैक्षणिक क्षेत्रात सर्वात मोठी आणि फसली गेलेली योजना म्हणजे कायमस्वरूपी विनाअनुदानित संस्कृती. या कायमस्वरूपी विनाअनुदानित संस्कृतीमुळे गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवरच्या शाळा महाविद्यालये यामधून एक पिढी खडतर अनुभव पाठीशी घेऊन जगत आहे. या पिळवणुकीतून बाहेर पडणारी एक पिढी आणि ह्या शिक्षण व्यवस्थेतून शिक्षित होऊन बाहेर पडणारी एक पिढी महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर आहे. नकळतपणे कुठे ना कुठेतरी जनमानस बदलण्यासाठी ह्या पिढीचा प्रभाव आहे. याच्यानंतर औद्योगिक क्षेत्रात पुणे मुंबई नाशिक या पट्ट्यामध्येच सर्वाधिक उद्योगधंदे एकवटले गेले. पर्यायाने पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाली झाल्या त्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रातला विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, खानदेश, कोकण वगैरे या भागामध्ये नकळतपणे एक बॅकलॉग वाढत गेला विकास कामांचा. तिथल्या धष्टपुष्ट राजकीयदृष्ट्या धनदांडग्या मंडळींना गेली वीस वर्षे आपण सत्तेत असू तरच आपले प्रभावक्षेत्र अबाधित राहील ह्याची जाणीव झाली. त्यामुळे भाजपाच्या वळचणीला लगोलग भगवे उपरणं घालून हिंदू हिंदू म्हणून बसले. कधीकाळी हीच मंडळी पुरोगाम्यांच्या गळ्यातील ताईत होती. यावर सर्वसामान्य जनतेला कन्व्हीन्स कसं करणार? त्यामुळे ह्या अशा बेडूक उड्या बघून काही प्रमाणात का होईना पण जनमानसावर परिणाम झाला हे निश्चित. संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्रात जेव्हा राजकीय प्रभावक्षेत्र तयार होत होते त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्राचा वरचा क्रमांक येत होता याचं कारण पश्चिम महाराष्ट्र मध्ये सर्वाधिक असलेले सहकार साखर कारखाने आणि सहकार क्षेत्र. आता ही सहकाराची सर्वात मोठी बीजं काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेवर असेपर्यंत ताब्यात होती. गेल्या वीस वर्षात या सहकाराचे जे काही वाभाडे निघाले त्यामुळे नकळतपणे या सहकार क्षेत्रावर उपजीविका करणारी खूप मोठी पिढी ही शहराकडे स्थलांतरित झाली. आता शहराकडे स्थलांतरित झाल्यावर त्यांना मिळणारे उद्योग किंवा नोकऱ्या याचा जर विचार केला तर त्यात सर्वात मोठा होरपळला गेलेला जो तरुण होता तो बहुजन वर्गातलाच. कारण महाराष्ट्रात किमान ६५ टक्के समाज हा बहुजन वर्गातून येतोय. मराठा सवर्ण असला तरी गेल्या काही वर्षात मराठा म्हणजे बहुजन हे एक समीकरण रुजवलं गेलं कारण काय तर मराठा सत्तेत नाही म्हणून आम्ही बहुजन आणि जेव्हा मराठा सत्तेत येतो तेव्हा बहुजनाची सत्ता न राहता मराठ्यांची सत्ता होती हे नकळतपणे सुप्त वास्तव जनतेला हळूहळू समजू लागलं. याचा परिपाक हा मराठेतर समाज एकत्र होण्यामध्ये झाला. सर्वात महत्त्वाचं मराठा आरक्षण हा लढा जेव्हा सुरू झाला त्या लढ्याला सर्वात मोठं पाठबळ जे दिलं गेलं ते मराठा नेत्यांकडूनच. कारण गेल्या दहा वर्षात आमची सत्ता नाही म्हणून जे सत्ताधारी आहेत त्यांना कोंडीत पकडण्यासाठी मराठा आरक्षण सारखा मुद्दा आयताच विरोधकांच्या हातात आला. तरीही पहिल्या पाच वर्षात भाजपाने जी काही काम केली, ज्या काही गोष्टी केल्या मराठा समाजासाठी, ज्या काही योजना आणल्या त्या नकळतपणे मराठा समाजातील कित्येक तरुणांपर्यंत पोहोचल्या. त्या योजनांचा कित्येक तरुणांना फायदा झाला मात्र ही गोष्ट विरोधक स्विकारण्याची शक्यता कमीच. मराठा समाजाला रस्त्यावर उतरून आंदोलन करून सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करायचं ही रणनीती विरोधकांची. असे सगळे प्रयत्न जनतेने २०२४ च्या निवडणुकीत हाणून पाडले. विशेषतः १९९० नंतर एकूण हिंदुत्ववादी राजकारण जे पसरलं गेलं त्याचा परिपाक म्हणजे २०१४ ला महाराष्ट्रात झालेला सत्ता बदल हा महत्त्वाचा टप्पा. २०१९ ला ही सत्ता बदल झाला होता पण अडीच वर्ष महाविकास आघाडीने एक प्रयोग म्हणून सत्ता राखली मात्र ती टिकवता आली नाही. खरंतर भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी तो प्रयोग म्हणून बघावा तर यशस्वीपणे राबवला असता तर खूप मोठा संदेश इतर राज्यात गेला असता. सध्या भाजपा सर्वदूर पसरत असताना प्रांतीय पक्ष विरोधक म्हणून एक झाले तर भाजपाला रोखू शकतात हा आत्मविश्वास निर्माण झाला असता. पर्यायाने भाजपाला फटका बसला असता. पण २०१९ ते २०२१ याकाळात भाजपाने विरोधक कसा असावा आणि महाविकास आघाडीने सत्ताधारी कसा नसावा हे जनतेला दाखवून दिले. सरकार डूख धरून विरोधकांवर कारवाई करतात हे एक समीकरण रुढ झाले आहे. मग विरोधकांनी असे चेहरे नेते म्हणून पुढे आणावेत की ज्यांच्यावर भ्रष्टाचाराच्या केसेस टाकता येणार नाहीत. सत्ता मिळाली तेव्हा भ्रष्टाचार करून घेतल्यानंतर पुरावे आले की कारवाई होणारच. तीच राजशिष्टाचाराची रीत आहे व्यवस्थेची. अशी कारवाई सोयीनुसार होणार हे जनतेने स्विकारले आहे. जनतेला भ्रष्टाचार सहन करायची सवय झाल्यावर भ्रष्टाचार का सहन करता वाईट असतो त्यामुळे तुमची लुबाडणूक होतेय वगैरे बोलून काय फायदा? २०२९ पर्यंत खूप मोठा कालावधी आहे. विरोधकांनी विशेषतः कॉंग्रेस पक्षाने तरी सगळ्या विद्यमान नेत्यांना घरी बसवावे नवीन तरुण कार्यकर्ते लोकांना पुढं आणावे. म्हणजे जनतेला विश्वास बसेल बदल होतोय म्हणून. तेच तेच चेहरे द्यायचे नंतर हारले की ईव्हीएमवर खापर फोडत बसायचं. किती वर्ष चालणार हे? त्यामुळे २०२४ मध्ये काय झालं हे सर्वश्रुत आहे. 

जनमानसावर फक्त आणि फक्त जातपात धर्म ह्याचाच प्रभाव असतो का? तर माझं प्रांजळ मत आहे की, असा प्रभाव खूप कमी टक्के जनतेवर असतो. चाळीशी पार केलेली पिढी फार विचारपूर्वक निर्णय घेते. कारण त्यांनी ज्या राजकीय उलाढाली झालेल्या असतात त्यांचे परिणाम भोगलेले असतात. विशेषतः ग्रामीण भागात शेतकऱ्यांची, महिलांची जी पिळवणूक होत होती ती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर सारख्या योजनांमुळे काही प्रमाणात कमी झाली. त्याशिवाय वेगवेगळे मोठे प्रोजेक्ट्स, इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प सामाजिक जीवनावर प्रभाव टाकतात. रस्ते वीज पाणी सारख्या सामाजिक मूलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी सरकार कडून केले जाणारे प्रयत्न दिसून आले. जनतेचं मन परावर्तित होण्यापर्यंत इतके लाभार्थी महाराष्ट्र खरोखरच वाढले का? ह्याची कारणे शोधली की समजतं गावागावांत एखादी नवीन गोष्ट होत असेल तर ती मोदी सरकारची ही बिरुदावली मिरवली गेली. दळणवळणाची साधनं सुधारली ती मोदी सरकारमुळे. एरव्ही 'सरकार' हाच शब्द रुढार्थाने वापरला जात होता. आता त्याची जागा मोदी सरकार ह्याने घेतली. त्यामुळे सहाजिकच चांगले झाले किंवा वाईट झाले की लागलीच मोदींच्या नावानं चांगभलं. हे विरोधकांच्या पथ्यावर पडले आणि समर्थक पण मोदी घोषात तल्लीन झाले. मुळातच सामाजिक आयक्यू कमी असलेल्या देशात अशी बिरुदावली तळागाळापर्यंत पोहोचली आहे म्हणजे सक्षम पर्याय उपलब्ध झाला आहे हे ठशीवपणे लोकांना सांगणारी मंडळी तयार झाली हे समजतं. १९६० ते १९८० या काळात कॉंग्रेस म्हणजे सरकार आणि सरकार म्हणजे कॉंग्रेस ही तळागाळापर्यंत पोचलेली बिरूदावली ही अशीच होती. तीला तडा गेल्यावर पर्यायाने विरोधक जनमानसावर प्रभाव टाकू लागले. महाराष्ट्रात सर्वाधिक शहरीकरण झालेले जिल्हे, त्यामुळे नागरीकरणाच्या ज्या समस्या निर्माण झाल्या त्या सोडविण्यासाठी पुर्ण झालेल्या योजना हा महत्त्वाचा विषय चर्चेला जाणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ मुंबई ही औद्योगिक नगरी. गेल्या काही दशकांत मुंबईतील जनसामान्यांच्या सर्वाधिक अडचणी ह्या दळणवळणाशी निगडित आहेत. अस्ताव्यस्त वाढलेल्या शहरीकरणामुळे दळणवळण यंत्रणा कशी अपुरी पडते हे जनतेने सहन केलेले असते. यावर अगदी रामबाण उपाय म्हणून मेट्रो, रेल्वे, रिंग रोड वगैरे लाखो करोडो रुपयांच्या योजना पूर्णत्वास आल्या की जनतेला पण हायसं वाटतं. मात्र या शहरात रोजच्या गरजेच्या वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी जी यंत्रणा उभी राहिली ती महाराष्ट्रात मुख्यत्वे करून बहुजन समाजातील तरुणांची. अगदी स्टार्ट अप ची दारे खुली झाली म्हणून चहा, वडापावच्या मध्यम व्यवसायांपासून ते कृषीमालाच्या पुरवठादार कंपन्या ह्या उद्यमी महाराष्ट्रात बहुतेक शिकलेल्या बहुजन तरुणांच्या आहेत. ह्याची व्याप्ती फक्त शहरांपुरती मर्यादित आहे. ग्रामीण भागात असे उद्यमी वातावरण तयार होण्यासाठी कस्टमर बेस तयार होणं गरजेचं. ग्रामीण भागात कृषी क्षेत्रातील अनेक प्रयोग सोशल मीडिया मार्फत जनतेपर्यंत पोचले. यासाठी डिजिटल इंडिया, मुद्रा लोन योजना, इज ऑफ डुईंग बिझनेस वगैरे योजनांचा निश्चितच काही प्रमाणात उपयोग झाला असावा. पण नवीन पिढीतील कृतीशील तरुणांपर्यंत हा प्रभाव मर्यादित असतो. कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरी किंवा खाजगी नोकरी मध्ये असेल तर आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मोठा कालावधी लागतो. तो कालावधी ज्यांनी बघितला त्यांना नकळतपणे एक जाणीव होते की सरकारी असलेल्या कार्यपद्धती बदलण्यासाठी पण तसाच वेळ लागतो. याचा परिणाम जनतेला अमुक पार्टीला अजून एकदा संधी देऊन बघू. फरक पडेल. ही सहनशीलता वाढते. माझ्या मते गेल्या दहा वर्षांत ज्या पद्धतीने कर्ज मिळणं स्वस्त झाले त्यानुसार कित्येकांचा आर्थिक आलेख वाढत गेला. एकार्थाने ही एक नवशोषणाची सुरुवात असते आर्थिक गुलामीचं दुष्टचक्र. पण हे समजेपर्यंत त्यात पुर्णपणे गुरफटून जातो. या मिळणाऱ्या कर्जामुळे उद्यमी पिढीला फायदा झाला तसेच शैक्षणिकदृष्ट्या संधी उपलब्ध झाल्या. विशेषतः गेल्या दोन दशकभरात उच्च शिक्षण घेण्यासाठी देशाबाहेर जाणाऱ्यांची संख्या वाढली. महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रात इंजिनिअर, डॉक्टर वगैरे क्षेत्रापलिकडे ही नवनवीन संधी उपलब्ध झाल्या हे नवीन पिढीसाठी आश्वासक आहे. वीस वर्षांपूर्वी जेवढ्या इंग्रजी शाळा, इंजिनिअरिंगची कॉलेजेस महाराष्ट्रात होती त्या पेक्षा जास्त संख्या गेल्या दोन दशकांत वाढली. यात राजकारणी लोकांनी 'शिक्षण ही सेवा नसून उद्योगधंदा आहे' हे अंगिकारून आपापली शैक्षणिक संकुलं उभी केली. अशा शिक्षण सम्राटांच्या संकुलातून बाहेर पडणारी शिक्षित पिढी आणि उपलब्ध असणाऱ्या रोजगाराच्या संधी यांचं प्रमाण व्यस्त आहे. यावर प्रामुख्याने निवडणुकीत घमासान होणं गरजेचं होतं. पण ते सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही परवडलं नसतं. म्हणून जातपात धर्म ही आयुधे हाताशी घेऊन सगळे टिनपाट लढू लागले. ज्या जनतेला जातीपातीच्या विषाची सवय लागली होती यंदा त्यांना धर्माची मात्रा देऊन केली. त्यासाठी नॅरेटिव्ह सेट करून स्युडो वातावरण निर्माण केले, जसे विरोधकांनी '४०० पार झाले की संविधान बदलणार' चे लोकसभेत वातावरण निर्माण केले होते. या अशा पार्श्वभूमीवर सर्व मतदान हे एकाच फॅक्टर वर होत नाही. हे लक्षात घेणं खूप गरजेचं. महाराष्ट्रात तरी पुढील पाच वर्षांत भव्यदिव्य स्वप्नं दाखवून प्रत्यक्षात काय काय पदरात पडेल हे बघणं औत्सुक्याचे आहे.

सरतेशेवटी एवढंच नमूद करावेसे वाटते की बदलणाऱ्या जनमानसची कल्पना विरोधकांपेक्षा सत्ताधाऱ्यांना अधिक होती. त्यामुळे सत्ताधारी हे विरोधकांना पुरुन उरले.

© भूषण वर्धेकर 
डिसेंबर २०२४, पुणे

पवित्र कुराणातील काही निवडक आयातींची चिकित्सा

कुराणातील सूरह २ (आल-इम्रान) मदीना येथे अवतरली. ही कुराणातील सर्वात लांब सूरह आहे. या सूरहमध्ये ही इस्लामच्या मूलभूत तत्त्वांचे मार्गदर्शन क...