पोस्ट्स

जुलै, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

साधना साप्ताहिक लेख प्रतिसाद

साधना साप्ताहिक १३ जूलै २०२४ मराठा आरक्षण: युक्तिवादांचा सुकाळ, तर्काचा दुष्काळ हा प्रतिक कोसके यांचा लेख वाचला. त्या लेखावरचा माझा प्रतिसाद: आरक्षण मिळाल्याने समाजाचा विकास होतो ही एक सामाजिक अंधश्रद्धा आहे. आरक्षण हे साधन आहे संधी न मिळालेल्या वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी. पण राजकीयदृष्ट्या वापर करून लोकांनी आरक्षण हेच साध्य बनवलं आहे. कागदोपत्री आकडेवारी दिली की काहीतरी पुराव्यानिशी आपण युक्तिवाद करतोय असं वाटतं. प्रत्यक्षात मात्र आकडेवारी देऊन जेव्हा तुलना केली जाते तेव्हा लोकसंख्येच्या प्रमाण ही बाब फार महत्त्वाची. दुसरं तुलनेत कोणकोणत्या घटकांना प्राधान्य दिले आहे याचं. त्यामुळे आकडेवारी देऊन सांगितले की कोर्टात आपली बाजू भक्कमपणे उभी होईल आणि वेळ पडली तर संविधानाच्या चौकटीत राहून तरतूद करण्यासाठी दुरूस्ती विधेयक वगैरे आणण्यासाठी परत आंदोलनं, चर्चा, चिखलफेक हे निर्विवादपणे चालत राहणार आहे. समजा माणसाला आजार झाला असेल आणि त्यावर एखाद्या औषधाची मात्रा लागू होत नसेल तर औषध बदलायला हवं. किंवा आजार होऊ नये म्हणून जीवनशैली बदलणं गरजेची आहे. औषध तेच ठेवायचं आणि डॉक्टर बदलायचे.

लोकसत्ता विशेष लेख प्रतिसाद

ऐसी अक्षरे लेख  https://www.loksatta.com/sampadkiya/features/husain-dalwai-article-about-muslims-need-to-get-adequate-representation-and-opportunities-zws-70-4487601/ हुसेन दलवाई यांचा लोकसत्तामध्ये आलेला लेख वाचून खालीलप्रमाणे प्रतिसाद लिहिला होता. 'मुस्लिमांना संधी हव्यात आणि प्रतिनिधित्वही...' १८/७/२०२४ रोजीच्या लोकसत्ता मध्ये छापून आलेला विशेष लेख वाचला. लेखात मांडलेले सगळे मुद्दे वाचल्यावर समजतं की लेखकाचा आग्रह प्रतिनिधित्व देणं कसं गरजेचं आहे आणि ते न मिळाल्याने मुस्लिम समाज राजकीय, सामाजिक मागासलेपणा सहन करतोय हे अधोरेखित करतोय. मुळातच महत्वाचा प्रश्न हा आहे की प्रतिनिधित्व मिळाल्यानंतर समाज सुधारणा होते का? ताजं उदाहरण आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रतिनिधित्व मराठा समाजाला सामाजिक, राजकीय आणि आर्थिक आघाडीवर आहे. तरीही आरक्षणाची मागणी होते. याचा अर्थ फक्त राजकीय प्रतिनिधित्व किंवा संधी मिळाल्या की समाज सुधारणा होते ही सामाजिक अंधश्रद्धा आहे. मुळातच समाजातील तळागाळापर्यंत दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा आणि सेवा का मिळत नाहीत याचा विचार केला पाहिजे. साम

आरक्षणाच्या बैलाला ऽ ऽ ऽ

त्याचं असं झालं, समाजाचं एकदमच बिनसलं जातीपाती एकवटल्या, आरक्षणाला कंटाळून संगनमताने सर्वांनी एकच ठराव केला संमत आम्हाला करा ब्राह्मण, तरच सोडू आरक्षण एकीकडे प्रत्येकाला पाहिजे होती ब्राह्मण जात आरक्षणाच्या ठेकेदारांना पटत नव्हते अजिबात जातीपातीच्या राजकारणाचे नेते झाले उदास सगळेच झाले ब्राह्मण तर चालणार कसे दुकान वाटलं होतं सुटेल पेच, पुढ्यात होती खरी मेख ब्राह्मणात नक्की कोण, होत्या डझनभर शाखा सगळे ब्राम्हण एकदम, आंदोलनात आले थेट आधी सांगा कोणते ब्राह्मण, मग ठरवा कोटा चित्पावन, देशस्थ, कऱ्हाडे की कायस्थ  सारस्वत चिडले, का आम्हाला वगळता! सर्वात आधी ठरवा, गौड की द्राविडी  लगेचच यजुर्वेदींनी मांडल्या पोटजाती  तेवढ्यात आले देवरुखे, खोत आणि खिस्ती  सोबतीला होते कनौजी, दैवज्ञ आणि कानडी अय्यर सरसावले तोच, नंबुद्रींचा वेगळा नारा कोकणस्थ झाले सावध, देशस्थ उठले भराभरा शेवटी कोटा ठरवण्यासाठी ठरली बैठक उत्तरेतील पंचगौड, की दक्षिणेचे पंचद्रविड नंतर मांडून पोटजाती ठरवा क्रीमी लेअर  शिक्कामोर्तब होऊन कोटा झाला सूकर लिखित पाहिजे म्हणून ठरले एकछत्री सूत्र  तेवढ्यात आला प्रश्न, कोणतं घ्यायचं गोत्र तया